शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

फकिराचा खून आर्थिक व्यवहारातून

By admin | Updated: July 1, 2016 23:42 IST

जमलेल्या ८0 हजारांतून हा वाद होत होता. त्यामुळे एक वर्षापूर्वी रिझवानने सैफुल्लावर कर्नाटक येथील कुमठा येथे गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता.

रत्नागिरी : भीक मागून जमवलेल्या पैशाच्या वाटपावरूनच सैफुल्ला याचा रिझवान शेख याने गोळ्या घालून निर्घृण खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. कोल्हापूर शहरातील राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका भिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातही रिझवानचा हात असण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली.सैफुल्ला आणि रिझवान हे गेली १२ वर्षे एकत्र भीक मागून राहत होते. परंतु गेली दोन वर्षे भीक मागून जमवलेल्या पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. त्यांच्याकडे जमलेल्या ८0 हजारांतून हा वाद होत होता. त्यामुळे एक वर्षापूर्वी रिझवानने सैफुल्लावर कर्नाटक येथील कुमठा येथे गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता. परंतु, त्यामध्ये सैफुल्ला बचावला होता. तेव्हापासून रिझवान त्याच्यावर पाळत ठेवून होता.रिझवान तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीत दाखल झाला होता. या अगोदरही तो रत्नागिरीत असल्याने त्याला रत्नागिरीतील रस्त्यांची माहिती होती. २९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याचा सुमारास सैफुल्ला जेवण करण्यासाठी पऱ्याची आळी परिसरातून जात असताना रिझवान बुरखा घालून तेथे गेला आणि त्याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून सैफुल्लावर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये सैफुल्ला ठार झाला.रत्नागिरीची सर्व माहिती असल्याने तेथून पळ काढण्यात रिझवान यशस्वी झाला. पोलिसांना चकवा देत तो चालत पावस येथे गेला. तेथून त्याने राजापूर गाठले. परंतु रत्नागिरी शहर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोबाईल नंबरच्या आधारे रिझवानचा शोध घेऊन त्याला राजापूर जकात नाका येथे अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे, रोख पाच हजार रूपये, मोबाईल हॅण्डसेट, बुरखा जप्त केल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली.याअगोदर कोल्हापूर शहरामध्ये राजवाडा पोलीस ठाण्याचा हद्दीत एका भिकाऱ्याचा गोळी घालून खून झाला होता. त्यामध्येही रिझवानचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्या दुष्टीने पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी रिझवानला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, मारूती जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय जाधव, सुशील पंडीत, संदीप कोळंबेकर, विष्णू नागले, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, प्रवीण बर्गे, ससंदीप काशिद, रमीज शेख, संदीप मालप, विजय आंबेकर यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)आरोपी रिझवान शेख याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी समोर येऊन तपासकामी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.