शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फकिराचा खून आर्थिक व्यवहारातून

By admin | Updated: July 1, 2016 23:42 IST

जमलेल्या ८0 हजारांतून हा वाद होत होता. त्यामुळे एक वर्षापूर्वी रिझवानने सैफुल्लावर कर्नाटक येथील कुमठा येथे गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता.

रत्नागिरी : भीक मागून जमवलेल्या पैशाच्या वाटपावरूनच सैफुल्ला याचा रिझवान शेख याने गोळ्या घालून निर्घृण खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. कोल्हापूर शहरातील राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका भिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातही रिझवानचा हात असण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली.सैफुल्ला आणि रिझवान हे गेली १२ वर्षे एकत्र भीक मागून राहत होते. परंतु गेली दोन वर्षे भीक मागून जमवलेल्या पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. त्यांच्याकडे जमलेल्या ८0 हजारांतून हा वाद होत होता. त्यामुळे एक वर्षापूर्वी रिझवानने सैफुल्लावर कर्नाटक येथील कुमठा येथे गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता. परंतु, त्यामध्ये सैफुल्ला बचावला होता. तेव्हापासून रिझवान त्याच्यावर पाळत ठेवून होता.रिझवान तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीत दाखल झाला होता. या अगोदरही तो रत्नागिरीत असल्याने त्याला रत्नागिरीतील रस्त्यांची माहिती होती. २९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याचा सुमारास सैफुल्ला जेवण करण्यासाठी पऱ्याची आळी परिसरातून जात असताना रिझवान बुरखा घालून तेथे गेला आणि त्याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून सैफुल्लावर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये सैफुल्ला ठार झाला.रत्नागिरीची सर्व माहिती असल्याने तेथून पळ काढण्यात रिझवान यशस्वी झाला. पोलिसांना चकवा देत तो चालत पावस येथे गेला. तेथून त्याने राजापूर गाठले. परंतु रत्नागिरी शहर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोबाईल नंबरच्या आधारे रिझवानचा शोध घेऊन त्याला राजापूर जकात नाका येथे अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे, रोख पाच हजार रूपये, मोबाईल हॅण्डसेट, बुरखा जप्त केल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली.याअगोदर कोल्हापूर शहरामध्ये राजवाडा पोलीस ठाण्याचा हद्दीत एका भिकाऱ्याचा गोळी घालून खून झाला होता. त्यामध्येही रिझवानचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्या दुष्टीने पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी रिझवानला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, मारूती जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय जाधव, सुशील पंडीत, संदीप कोळंबेकर, विष्णू नागले, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, प्रवीण बर्गे, ससंदीप काशिद, रमीज शेख, संदीप मालप, विजय आंबेकर यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)आरोपी रिझवान शेख याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी समोर येऊन तपासकामी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.