शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बनावट बियाणे शेतकर्‍यांच्या माथी

By admin | Updated: May 27, 2014 00:41 IST

कृषी विभागाचे दुर्लक्ष : हजारो रुपयांचा फटका

 आमजाई व्हरवडे : लाखो रुपयांचे बनावट बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारून खासगी दुकानदारांकडून शेतकर्‍यांची राजरोस लुटमार केली जात आहे. एवढी मोठी शेतकर्‍यांची लूट होत असताना राधानगरीतील दोन्ही कृषी विभागांचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेत असल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भात व गळिताची पिके घेतली जातात. खरीप हंगामात भातपिकाखाली मोठे क्षेत्र असते. शेतकर्‍यांच्या माथी बनावट भात बियाणे मारणारे रॅकेट गेली अनेक वर्षे सक्रिय आहे. गतवर्षी तालुक्यात कर्नाटकातील एका कंपनीने वितरित केलेले भात पोसवण्यास तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. परिणामी शेतकर्‍यांना हजारो रुपयांचा फटका बसला होता. याबाबत तक्रारी होऊनही राज्य शासनाचे कृषी खाते व पंचायत समितीच्या कृषी खात्याने केवळ पंचनामे करण्याचे काम तेवढे युद्धपातळीवर केले. त्यानंतर शेतकर्‍यांना त्यांची नुकसानभरपाई मात्र काहीच मिळाली नाही. यंदाच्या रब्बी हंगामात तर सूर्यफुलाला दाणेच धरलेले नाहीत. अनेक गावांत हा प्रकार घडूनही कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी कानावर हात ठेवले आहेत. मशागत, खते, पाणी व मजुरीचे पैसेही शेतकर्‍यांच्या अंगावर बसले आहेत. शेतकर्‍यांना हजारो रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, एवढे घडूनही कोणत्याही खासगी दुकानदारावर कारवाई करण्याचे धाडस कृषी अधिकार्‍यांनी केलेले नाही. पंचायत समितीचा गुणनियंत्रण विभाग केवळ नावालाच आहे. शेतकर्‍यांची खुलेआम लूट होत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीने ‘ब्र’ शब्द काढलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना ‘वाली’ कोण आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासन व पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. (वार्ताहर)