शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

बनावट बियाणे शेतकर्‍यांच्या माथी

By admin | Updated: May 27, 2014 00:41 IST

कृषी विभागाचे दुर्लक्ष : हजारो रुपयांचा फटका

 आमजाई व्हरवडे : लाखो रुपयांचे बनावट बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारून खासगी दुकानदारांकडून शेतकर्‍यांची राजरोस लुटमार केली जात आहे. एवढी मोठी शेतकर्‍यांची लूट होत असताना राधानगरीतील दोन्ही कृषी विभागांचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेत असल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भात व गळिताची पिके घेतली जातात. खरीप हंगामात भातपिकाखाली मोठे क्षेत्र असते. शेतकर्‍यांच्या माथी बनावट भात बियाणे मारणारे रॅकेट गेली अनेक वर्षे सक्रिय आहे. गतवर्षी तालुक्यात कर्नाटकातील एका कंपनीने वितरित केलेले भात पोसवण्यास तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. परिणामी शेतकर्‍यांना हजारो रुपयांचा फटका बसला होता. याबाबत तक्रारी होऊनही राज्य शासनाचे कृषी खाते व पंचायत समितीच्या कृषी खात्याने केवळ पंचनामे करण्याचे काम तेवढे युद्धपातळीवर केले. त्यानंतर शेतकर्‍यांना त्यांची नुकसानभरपाई मात्र काहीच मिळाली नाही. यंदाच्या रब्बी हंगामात तर सूर्यफुलाला दाणेच धरलेले नाहीत. अनेक गावांत हा प्रकार घडूनही कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी कानावर हात ठेवले आहेत. मशागत, खते, पाणी व मजुरीचे पैसेही शेतकर्‍यांच्या अंगावर बसले आहेत. शेतकर्‍यांना हजारो रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, एवढे घडूनही कोणत्याही खासगी दुकानदारावर कारवाई करण्याचे धाडस कृषी अधिकार्‍यांनी केलेले नाही. पंचायत समितीचा गुणनियंत्रण विभाग केवळ नावालाच आहे. शेतकर्‍यांची खुलेआम लूट होत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीने ‘ब्र’ शब्द काढलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना ‘वाली’ कोण आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासन व पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. (वार्ताहर)