शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मनुष्यबळाचा तुटवडा, कच्चा मालाच्या दरवाढीचा सामना करत उद्योगचक्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कुशल, अनुभवी मनुष्यबळाचा तुटवडा आणि कच्च्या मालाची दरवाढ या अडचणींचा सामना करत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सुरू ...

कोल्हापूर : कुशल, अनुभवी मनुष्यबळाचा तुटवडा आणि कच्च्या मालाची दरवाढ या अडचणींचा सामना करत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सुरू आहेत. कोरोनाच्या स्थितीमध्येही काम असूनदेखील या अडचणींमुळे उद्योगचक्राची गती काहीशी मंदावली आहे.

गेल्यावर्षी उद्योगांना कोरोनाचा फटका बसला. त्यातून सावरत नोव्हेंबरपासून बऱ्यापैकी उद्योग पूर्वपदावर आले. निर्यात आणि देशाअंतर्गत बाजारपेठेत पुरवठा करणाऱ्या उद्योगांतील कामांचे प्रमाण वाढले. त्यातच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रासमोर अडचण निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी फौंड्रीची संख्या अधिक आहे. त्यामध्ये बिहार, उत्तरप्रदेशमधून आलेले मजूर, कामगार कार्यरत आहेत. कोरोना वाढत असल्याने हे मजूर, कामगार आपआपल्या राज्यांमध्ये जात आहेत. त्यामुळे उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. स्टील, सीआरसी स्क्रॅॅप, पिग आर्यन, आदी कच्चा मालाचे दर हे मार्चपासून वाढत आहेत. त्यांच्या दरांमध्ये सध्या १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्कऑर्डर आणि उत्पादन पुरवठा करण्याचा दर आधी निश्चित झाल्याने जिल्ह्यातील उद्योजकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. कच्च्या मालाच्या दर नियंत्रणामध्ये केंद्र, राज्य सरकारने लक्ष घालण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.

उद्योजक काय म्हणतात?

फौंड्रीमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर, कामगार हे कोरोनामुळे त्यांच्या गावी जात आहेत. त्यामुळे या फौंड्री स्पेशालिस्ट असलेल्या मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. कच्च्या मालाचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे उद्योगांची अडचण झाली आहे. कच्च्या मालाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने लवकर लक्ष द्यावे.

-अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅॅक.

उद्योगांतील कामांचे प्रमाण चांगले आहे. मात्र, कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाची कमतरता, कच्च्या मालाची दरवाढ सध्या अडचणीची ठरत आहे. या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने उद्योगांची गती काहीशी मंदावली आहे.

- श्रीकांत पोतनीस, अध्यक्ष, गोशिमा.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत उद्योग सुरू आहेत. उद्योगांना कामे आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून कच्चा माल, इंधन आणि मालवाहतुकीची दरवाढ होत असल्याने आमच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्या लवकर कमी होणे आवश्यक आहे.

- उत्तम पाटील, उद्योजक, शिरोली एमआयडीसी.

चौकट

आधी पैसे, मग कच्च्या मालाचा पुरवठा

जिल्ह्यातील उद्योगांना स्टील, ऑईल, पिग आर्यन, ग्राफाईट, आदी कच्चा माल लागतो. त्याचा पुरवठा मुंबई, पुणे, जालना, नागपूर, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम येथून होतो. पूर्वी कच्चा माल घेताना ३० ते ४५ दिवसांचे क्रेडिट उद्योजकांना मिळत होते मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांनी हे क्रेडिट बंद केले आहे. आधी पैसे दिले, तरच त्यांच्याकडून कच्च्या मालाचा पुरवठा होत आहे. ही नवी अडचण निर्माण झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.