शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मनुष्यबळाचा तुटवडा, कच्चा मालाच्या दरवाढीचा सामना करत उद्योगचक्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कुशल, अनुभवी मनुष्यबळाचा तुटवडा आणि कच्च्या मालाची दरवाढ या अडचणींचा सामना करत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सुरू ...

कोल्हापूर : कुशल, अनुभवी मनुष्यबळाचा तुटवडा आणि कच्च्या मालाची दरवाढ या अडचणींचा सामना करत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सुरू आहेत. कोरोनाच्या स्थितीमध्येही काम असूनदेखील या अडचणींमुळे उद्योगचक्राची गती काहीशी मंदावली आहे.

गेल्यावर्षी उद्योगांना कोरोनाचा फटका बसला. त्यातून सावरत नोव्हेंबरपासून बऱ्यापैकी उद्योग पूर्वपदावर आले. निर्यात आणि देशाअंतर्गत बाजारपेठेत पुरवठा करणाऱ्या उद्योगांतील कामांचे प्रमाण वाढले. त्यातच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रासमोर अडचण निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी फौंड्रीची संख्या अधिक आहे. त्यामध्ये बिहार, उत्तरप्रदेशमधून आलेले मजूर, कामगार कार्यरत आहेत. कोरोना वाढत असल्याने हे मजूर, कामगार आपआपल्या राज्यांमध्ये जात आहेत. त्यामुळे उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. स्टील, सीआरसी स्क्रॅॅप, पिग आर्यन, आदी कच्चा मालाचे दर हे मार्चपासून वाढत आहेत. त्यांच्या दरांमध्ये सध्या १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्कऑर्डर आणि उत्पादन पुरवठा करण्याचा दर आधी निश्चित झाल्याने जिल्ह्यातील उद्योजकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. कच्च्या मालाच्या दर नियंत्रणामध्ये केंद्र, राज्य सरकारने लक्ष घालण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.

उद्योजक काय म्हणतात?

फौंड्रीमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर, कामगार हे कोरोनामुळे त्यांच्या गावी जात आहेत. त्यामुळे या फौंड्री स्पेशालिस्ट असलेल्या मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. कच्च्या मालाचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे उद्योगांची अडचण झाली आहे. कच्च्या मालाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने लवकर लक्ष द्यावे.

-अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅॅक.

उद्योगांतील कामांचे प्रमाण चांगले आहे. मात्र, कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाची कमतरता, कच्च्या मालाची दरवाढ सध्या अडचणीची ठरत आहे. या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने उद्योगांची गती काहीशी मंदावली आहे.

- श्रीकांत पोतनीस, अध्यक्ष, गोशिमा.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत उद्योग सुरू आहेत. उद्योगांना कामे आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून कच्चा माल, इंधन आणि मालवाहतुकीची दरवाढ होत असल्याने आमच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्या लवकर कमी होणे आवश्यक आहे.

- उत्तम पाटील, उद्योजक, शिरोली एमआयडीसी.

चौकट

आधी पैसे, मग कच्च्या मालाचा पुरवठा

जिल्ह्यातील उद्योगांना स्टील, ऑईल, पिग आर्यन, ग्राफाईट, आदी कच्चा माल लागतो. त्याचा पुरवठा मुंबई, पुणे, जालना, नागपूर, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम येथून होतो. पूर्वी कच्चा माल घेताना ३० ते ४५ दिवसांचे क्रेडिट उद्योजकांना मिळत होते मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांनी हे क्रेडिट बंद केले आहे. आधी पैसे दिले, तरच त्यांच्याकडून कच्च्या मालाचा पुरवठा होत आहे. ही नवी अडचण निर्माण झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.