शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

लाॅकडाऊन काळातील विमा मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:22 IST

कोल्हापूर : लाॅकडाऊन काळात रिक्षा व्यवसाय ठप्प होता. याकाळात व्यवसाय नसल्याने वाहने घरीच उभी होती. त्यामुळे हा काळ वगळून ...

कोल्हापूर : लाॅकडाऊन काळात रिक्षा व्यवसाय ठप्प होता. याकाळात व्यवसाय नसल्याने वाहने घरीच उभी होती. त्यामुळे हा काळ वगळून किमान १०० ते १४० दिवस विमा मुदतवाढ मिळावी, यासाठी भारतीय विमा नियामक प्राधिकरणकडे ‘आप‘च्यावतीने पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला यश आले असून, पुण्यामध्ये अशा पद्धतीने वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापुरात हा निर्णय लागू झाल्यास त्याचा फायदा हजारो रिक्षाचालकांना होऊ शकतो.

लाॅकडाऊन काळात किमान तीन महिने रिक्षाचालकांना व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांनी आपली वाहने दारात उभी केली होती. दरवर्षी रिक्षाचा विमा उतरवणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे हजारो रिक्षाचालकांनी तो उतरवला. मात्र, तीन महिने रिक्षा दारात उभी असल्याने याकाळात वाहनाची कोणतीही झीज अथवा अपघात किंवा अन्य नुकसान झाले नाही. त्यामुळे विम्याची मुदत संपल्यानंतरही तीन महिने वाढवून द्यावी, अशी मागणी ‘आप’तर्फे पुण्यातील रिक्षाचालक किरण कांबळे यांनी हैदराबाद येथील भारतीय विमा नियामक प्राधिकरणकडे केली होती. प्राधिकरणने मुदतवाढ देण्यास मंजुरी दिल्यामुळे पुण्यातील हजारो रिक्षाचालकांना फायदा झाला. त्याप्रमाणे कोल्हापुरातील हजारो रिक्षाचालकांना विमा कंपन्यांनी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टी, कोल्हापूरतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली जाणार आहे.

कोट

लाॅकडाऊन काळात रिक्षाच बंद होत्या. त्यामुळे न वापरलेल्या वाहनांचा विमा कालावधी कंपन्यांनी वाढवून दिला पाहिजे. माणुसकी म्हणून कंपन्यांनी ही बाब मान्य करून हजारो रिक्षाचालकांचे जगणे सुसह्य करावे.

- संदीप देसाई, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, आम आदमी पार्टी