शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटींच्या द्राक्षांची निर्यात थांबली

By admin | Updated: March 7, 2015 00:00 IST

‘अवकाळी’चा फटका : द्राक्षमणी तडकल्याने खरेदी बंद; खानापूर, बलवडीमधील शेतकऱ्यांचे नुकसान

अशोक डोंबाळे / सांगलीअवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या स्वप्नांचा यंदा चक्काचूर झाला. खानापूर, तासगाव तालुक्यांतील सात हजार ५०० एकरांतील निर्यातक्षम द्राक्षांना तडे गेल्यामुळे, व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीसह निर्यातीस नकार दिला आहे. युरोपीयन राष्ट्रांत ७५ रुपये किलोने विक्री होणाऱ्या या द्राक्षांना किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो इतका दरही कोणी द्यायला तयार नाही. त्यामुळे या दोन तालुक्यांतील २५० शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटींचा फटका बसला आहे.जिल्ह्यात एक लाख एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. यापैकी दहा हजार एकरातील द्राक्षे युरोपीयन राष्ट्रांत दरवर्षी निर्यात होतात. तेथे चांगला दरही मिळतो. म्हणून खानापूर, तासगाव तालुक्यांतील शेतकरी निर्यातक्षम द्राक्षे पिकविण्याकडे वळला आहे. खूप कष्टातून द्राक्षबागाही उत्तम दर्जाच्या तयार केल्या. द्राक्षांची निर्यात होईपर्यंत शेतकरी पै-पाहुणे, यात्रा-जत्रांना दुय्यम स्थान देऊन, चोवीस तास बागेतच राबतात. औषधांवर तर लाखो रुपये खर्च होतो. परंतु, यावर्षी दि. १ व २ मार्च रोजी अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यालाच झोडपून काढले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार रब्बी पिकांसह ६५ हजार एकरांतील द्राक्षे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीच्या तडाख्यात द्राक्षबागायतदार मात्र पुरता उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यातून दहा हजार एकरातील द्राक्षांची निर्यात होणार होती. यापैकी २५ टक्केक्षेत्रातील म्हणजे केवळ २५० एकरांतील द्राक्षांची निर्यात झाली आहे. उर्वरित सात हजार ५०० एकरांतील द्राक्षांची निर्यात झालेली नसून, द्राक्षे बागेतच आहेत तोपर्यंतच अवकाळी पावसाचा तडाखा निर्यातक्षम द्राक्षांना बसला. या पावसामुळे द्राक्षांच्या मण्यांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन द्राक्षे खराब होऊ लागली आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर पळशी (ता. खानापूर) येथील दहा टन द्राक्षे निर्यात करायची म्हणून निर्यातदार व्यापारी विशाल जोशी यांनी कुलिंगसाठी अंजनी (ता. तासगाव) येथील शीतगृहात ठेवली होती. शुक्रवारी शीतगृहातील द्राक्षे पाहिली असता, त्यांना पूर्ण तडे गेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे जोशी यांनी द्राक्षांची निर्यात थांबविल्याचे सांगितले. जोशी यांच्याप्रमाणेच अन्य पाच ते सहा निर्यातदारांनीही द्राक्षांना तडे गेल्यामुळे निर्यात थांबविली आहे. यामुळे खानापूर तालुक्यातील खानापूर, पळशी, हिवरे, बलवडी, तासगाव तालुक्यातील जरंडी, सावळज परिसरातील सात हजार ५०० एकरांतील १५ हजार टन द्राक्षांची निर्यात थांबविली आहे. निर्यातीसाठी बनविलेल्या द्राक्षापासून बेदाणाही बनविता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षे किरकोळ बाजारपेठेतच विकावी लागणार आहेत. युरोपीय बाजारपेठेत ७५ रुपये किलोने विक्री होणाऱ्या या द्राक्षांना किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये दरही कोणी देत नाही. यामुळे द्राक्षबागायतदार अस्मानी संकटात सापडला आहे. युरोपीयन राष्ट्रांना द्राक्षे पाठवून लाखो रुपये मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात बागेत फवारणी केलेल्या औषधाचाही खर्च पडण्याची शक्यता नाही. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत. विमा कंपन्यांनीही सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर- अवकाळी पावसाच्या धास्तीने काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागांचा पीक विमा उतरविला आहे. परंतु, या विमा कंपन्यांनी १५ आॅक्टोबर ते ३० जानेवारी हा कालावधी ठरविला आहे. या कालावधीत पाऊस झाला तरच द्राक्षबागायतदारांना भरपाई मिळते, अन्यथा मिळत नाही. - त्यामुळे मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची विमा कंपन्यांकडून भरपाई मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र घुळी यांनी सांगितले. याशिवाय, विमा कंपन्यांचे अन्य जाचक नियमही असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.