शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

शिवडावला दफनभूमीच्या जागेसाठी मुस्लिम समाजाला ताकतुंबा, जिल्हाधिकारी कार्यालयाचा अनुभव : साडेपाच किलोमीटर खांद्यावरून न्यावे लागते पार्थिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST

गारगोटी : शिवडाव (ता. भुदरगड) येथील मुस्लिम समाजाला तब्बल साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दफनभूमीत शव दफन करण्यासाठी खांद्यावरून वाहून ...

गारगोटी : शिवडाव (ता. भुदरगड) येथील मुस्लिम समाजाला तब्बल साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दफनभूमीत शव दफन करण्यासाठी खांद्यावरून वाहून न्यावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालये ना हरकत दाखल्याचे कागदी घोडे नाचवत असल्याने ग्रामस्थांना गेली आठ वर्षे मनस्ताप होत आहे. एका बाजूला जुनी कागदपत्रे शोधून जिल्हाधिकारी दौलत देसाई हे लोकांच्या जमिनी मालकीच्या करत असताना त्यांचेच कार्यालय मात्र दफनभूमीसाठी गावाने दिलेली जागाही नावावर करून द्यायला तयार नाही.

भुदरगड तालुक्याच्या पश्चिमेला आणि पाटगाव धरणाच्या पायथ्याला शिवडाव गाव आहे. जेथून शिवडाव- सोनवडे घाट रस्ता होणार आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव. आजपर्यंत कधीही चर्चेत नसलेले हे गाव घाट रस्त्याला दिलेल्या नावामुळे सर्वज्ञात झाले. भुदरगड तालुक्यात गारगोटी, अनफ, तांबाळे, कडगाव, शिवडाव यासारखी मोजकी गावे वगळता इतर कोणत्याही गावात मुस्लिम समाज नाही. अल्प म्हणण्यापेक्षा अत्यल्प असलेला हा समाज हिंदू बांधवांशी एकरूप झाला आहे. शिवडाव येथील मुस्लिम बांधवांना शव दफन करण्यासाठी साडेपाच किलोमीटर अंतरावरील पाटगाव दफनभूमीत घेऊन जावे लागते. शव नेण्यासाठी शववाहिका किंवा तत्सम कोणतेही वाहन नसल्याने चालत खांद्यावरून वाहून न्यावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन २०१३ साली तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी गावसभेत ठराव मंजूर करून हिंदू दफनभूमी शेजारील गायरान (गट क्रमांक १०९) मधील दहा गुंठे जमीन मुस्लिम दफनभूमीसाठी दिली. ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर तलाठी, मंडल अधिकारी यांनी डायरी घालून तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवली. त्यांनी डायरी मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव गेल्यावर हेलपाटे सुरू झाले. प्रत्येक सहा महिन्याला एक त्रुटी सांगायची आणि वेगळाच दाखला मागायचा, त्याची पूर्तता केली की मग पुन्हा दुसऱ्या विभागाचा दाखला मागायचा, अशा वाऱ्या गेली आठ वर्षे सुरू आहेत. यामध्ये पाटबंधारे, वनविभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती यांच्याकडून ना-हरकत दाखले आणावयास सांगितले. ही सर्व शासकीय कार्यालयांची ना-हरकत दाखले देऊन झाल्यावर आता एका खासगी मालकाचा ना-हरकत दाखला हवा आहे.

चौकट

अडचण कोणती..

ज्या ठिकाणी अगोदरच दफनभूमी अस्तित्वात आहे, त्या ठिकाणी दुसरी दफनभूमी मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्यांना कोणती अडचण येत आहे, अशी संतप्त विचारणा मुस्लिम बांधव करत आहेत. अशी कोणती ‘अडचण’आहे जी आमची ‘अडचण दूर’ करण्यासाठी ‘अडचण निर्माण’ करीत आहेत, हे न उलगडलेलं कोड आहे. दफनभूमीची जागा समाजाला न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जल्लाउद्दीन काझी यांनी सांगितले आहे.