शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शिवडावला दफनभूमीच्या जागेसाठी मुस्लिम समाजाला ताकतुंबा, जिल्हाधिकारी कार्यालयाचा अनुभव : साडेपाच किलोमीटर खांद्यावरून न्यावे लागते पार्थिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST

गारगोटी : शिवडाव (ता. भुदरगड) येथील मुस्लिम समाजाला तब्बल साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दफनभूमीत शव दफन करण्यासाठी खांद्यावरून वाहून ...

गारगोटी : शिवडाव (ता. भुदरगड) येथील मुस्लिम समाजाला तब्बल साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दफनभूमीत शव दफन करण्यासाठी खांद्यावरून वाहून न्यावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालये ना हरकत दाखल्याचे कागदी घोडे नाचवत असल्याने ग्रामस्थांना गेली आठ वर्षे मनस्ताप होत आहे. एका बाजूला जुनी कागदपत्रे शोधून जिल्हाधिकारी दौलत देसाई हे लोकांच्या जमिनी मालकीच्या करत असताना त्यांचेच कार्यालय मात्र दफनभूमीसाठी गावाने दिलेली जागाही नावावर करून द्यायला तयार नाही.

भुदरगड तालुक्याच्या पश्चिमेला आणि पाटगाव धरणाच्या पायथ्याला शिवडाव गाव आहे. जेथून शिवडाव- सोनवडे घाट रस्ता होणार आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव. आजपर्यंत कधीही चर्चेत नसलेले हे गाव घाट रस्त्याला दिलेल्या नावामुळे सर्वज्ञात झाले. भुदरगड तालुक्यात गारगोटी, अनफ, तांबाळे, कडगाव, शिवडाव यासारखी मोजकी गावे वगळता इतर कोणत्याही गावात मुस्लिम समाज नाही. अल्प म्हणण्यापेक्षा अत्यल्प असलेला हा समाज हिंदू बांधवांशी एकरूप झाला आहे. शिवडाव येथील मुस्लिम बांधवांना शव दफन करण्यासाठी साडेपाच किलोमीटर अंतरावरील पाटगाव दफनभूमीत घेऊन जावे लागते. शव नेण्यासाठी शववाहिका किंवा तत्सम कोणतेही वाहन नसल्याने चालत खांद्यावरून वाहून न्यावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन २०१३ साली तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी गावसभेत ठराव मंजूर करून हिंदू दफनभूमी शेजारील गायरान (गट क्रमांक १०९) मधील दहा गुंठे जमीन मुस्लिम दफनभूमीसाठी दिली. ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर तलाठी, मंडल अधिकारी यांनी डायरी घालून तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवली. त्यांनी डायरी मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव गेल्यावर हेलपाटे सुरू झाले. प्रत्येक सहा महिन्याला एक त्रुटी सांगायची आणि वेगळाच दाखला मागायचा, त्याची पूर्तता केली की मग पुन्हा दुसऱ्या विभागाचा दाखला मागायचा, अशा वाऱ्या गेली आठ वर्षे सुरू आहेत. यामध्ये पाटबंधारे, वनविभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती यांच्याकडून ना-हरकत दाखले आणावयास सांगितले. ही सर्व शासकीय कार्यालयांची ना-हरकत दाखले देऊन झाल्यावर आता एका खासगी मालकाचा ना-हरकत दाखला हवा आहे.

चौकट

अडचण कोणती..

ज्या ठिकाणी अगोदरच दफनभूमी अस्तित्वात आहे, त्या ठिकाणी दुसरी दफनभूमी मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्यांना कोणती अडचण येत आहे, अशी संतप्त विचारणा मुस्लिम बांधव करत आहेत. अशी कोणती ‘अडचण’आहे जी आमची ‘अडचण दूर’ करण्यासाठी ‘अडचण निर्माण’ करीत आहेत, हे न उलगडलेलं कोड आहे. दफनभूमीची जागा समाजाला न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जल्लाउद्दीन काझी यांनी सांगितले आहे.