शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:28 IST

कोल्हापूर : महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय वॉर्डरचनेनुसार होणार असून, या निवडणुकीतून सर्वसामान्य कार्यकर्ते हद्दपार होण्याचा दावा काही जाणकारांकडून केला ...

कोल्हापूर : महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय वॉर्डरचनेनुसार होणार असून, या निवडणुकीतून सर्वसामान्य कार्यकर्ते हद्दपार होण्याचा दावा काही जाणकारांकडून केला जात आहे. राजकीय पक्षात तिसऱ्या, चौथ्या फळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक लढविण्याची अपेक्षा असते. परंतु वाॅर्डाचे कार्यक्षेत्र तसेच मतदार संख्या मोठी होणार असल्यामुळे अशा कार्यकर्त्यांना निवडणूक लढविणे अशक्य होणार आहे.

कोणतीही निवडणूक असली की त्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. महानगरपालिका निवडणूक त्याला अपवाद ठरलेली नाही. एका प्रभागातून निवडून येण्यासाठी उमेदवारांना दहा-वीस लाख रुपये खर्च करावे लागतात. एखाद्या ठिकाणी काटाजोड लढत असली, तर तीस-चाळीस लाखांपर्यंत हा खर्च वाढतो. त्यामुळे राजकीय पक्षाचे नेते मुलाखतीवेळी ‘निवडणुकीत तुम्ही किती खर्च करू शकता’ असा पहिला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे गेल्या तीन-चार निवडणुकीतून सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्ष म्हणून उभे राहात होते. पण आता तेही कायमचे बंद होणार आहे.

सर्वसामान्य कार्यकर्ता प्रभागात काम करीत असतो, लोकांच्या अडीअडचणीवेळी उपयोगी पडत असतो, पक्षाच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांचा थेट संपर्क मतदारांपर्यंत असतो. परंतु निवडणुकीसाठी होणारा खर्च त्याला परवडणारा नसतो. त्यामुळे आपली हौस भागविण्यासाठी म्हणून का होईना निवडणूक लढवायचा प्रयत्न करायचा. मात्र पैशाने मजबूत असणाऱ्या उमेदवारापुढे त्यांचा टिकाव लागत नाही.

- शहराच्या विकासाला बसणार खीळ -

निवडणुकीनंतर काही प्रश्न निर्माण होणार आहेत. एखाद्या वॉर्डातून तीन उमेदवार तीन पक्षाचे निवडून आले, तर विकास कामांना निधी कोणी, कसा द्यायचा, विकासाची कामे कोणत्या गल्लीत करायची, कोणती कामे बजेटमध्ये धरायची, याबाबतही नगरसेवकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉर्डातील विकास कामांना खीळ बसू शकते.

- राजकीय अपेक्षांवरही पाणी-

कोट १.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होणार आहे. जो पैशाने भक्कम आहे तोच विजयापर्यंत जाईल आणि पैसा नाही, पण प्रामाणिक कार्यकर्ता आहे, तो मात्र मागे पडणार आहे. जनतेपर्यंत पोहोचणे आणि जनतेने अशा उमेदवारांना स्वीकारणे या गोष्टी ‘जरतर’ च्या आहेत.

दत्ताजी टिपुगडे.

कोट २.

समाजाशी सतत संपर्कात, ज्यांचे काम चांगले आहे, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाचे जर पाठबळ मिळाले तरच ते निवडून येतील. राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही आता अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिकिटे दिली पाहिजेत.

अनिल कदम.

कोट ३.

निवडणुकीच्या राजकारणात ज्याची आर्थिक परिस्थिती नाही, असा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीच मेला आहे. पैशावर राजकारण चालले आहे. त्यामुळे यापुढे ज्याच्याकडे पैसा अधिक त्यालाच उमेदवारी मिळेल. सामान्य कार्यकर्त्यांनी आता घरात बसायचे.

पांडुरंग आडसुळे.

कोट ४.

निवडणुकीत पैशाचा वापर होतो, हे आता लपून राहिलेले नाही. पुढील निवडणुकीत सामान्य कार्यकर्ता कसा टिकून राहतो, हे सांगणे अवघड आहे; पण पक्षांनी आता आपल्या कार्यकर्त्यांना मोठे केले पाहिजे.

रमेश पुरेकर.