शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षांचा डोंगर... आश्वासनांचे गाजर

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

शंभर कोटींच्या अपेक्षांचे गाठोडे आदर्श गाव योजनेतून गावातील सर्व समस्या मार्गी लागणार, अशी आशा ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची होती

दत्ता पाटील - तासगाव -सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी तासगाव तालुक्यातील आरवडे गावाची ११ नोव्हेंंबर २०१४ रोजी आदर्श ग्रामसाठी निवड केली. मात्र, सहा महिन्यांच्या कालखंडानंतर ढिम्म प्रशासन, अपेक्षांचा डोंगर आणि आश्वासनांचे गाजर दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया गावातील सामान्य जनतेतून उमटत आहे.वर्षभरात दोन वेळा खासदारांचा दौराआदर्श गाव म्हणून आरवडेची निवड झाली. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित आले. निवड जाहीर करण्यासाठी स्वत: खासदार संजय पाटील अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले. गावाची निवड झाल्यानंतर योजनेच्या निमित्ताने खासदारांनी केवळ दोनवेळा गावाला भेट दिली. दोन्ही दौऱ्यावेळी जिल्हा पातळीवरील अधिकारीही गावात आले. त्यांनी लोकांच्या समस्या, आणि अपेक्षा जाणून घेतल्या एवढेच.शंभर कोटींच्या अपेक्षांचे गाठोडे आदर्श गाव योजनेतून गावातील सर्व समस्या मार्गी लागणार, अशी आशा ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची होती. गावाच्या अपेक्षा वाढल्या. जिल्हा स्तरावरील सरकारी अधिकाऱ्यांकडून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले. कारभाऱ्यांचा उत्साह वाढला. वीजपुरवठा, पाणीपुरवठा, शेतीच्या समस्या, शाळांची समस्या अशा एक ना अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गाव सरसावले. एक-एक करत गावाच्या विकासाचा शंभर कोटींचा आराखडा तयार झाला.डिसेंबर २०१४ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागाकडे मागण्यांच्या आराखड्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले. तेव्हापासून अद्याप गावाचे डोळे लागले आहेत, ते या आराखडा मंजुरीकडे. निधी मंजूर होईल आणि कामे मार्गी लागतील, असा विश्वास असणाऱ्या ग्रामस्थांनी आता वेगळे काहीतरी होईल, अशी अपेक्षाच करणे सोडून दिले आहे.केवळ एका योजनेला मंजुरीमात्र, वर्षभराच्या काळात केवळ एकाच योजनेला मंजुरी मिळाली. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी ५२ लाखांची पाणीपुरवठा योजनाच काय ती या आदर्श योजनेचे फलित ठरली!खासदार फंडाची अपेक्षा फोल गावाची निवड झाल्यानंतर सर्वच योजनांतून तात्काळ निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षा असलेल्या जिल्हा नियोजन समितीतून आतापर्यंत एकही रुपयाचा निधी मिळाला नाही. एवढेच नव्हे तर खासदारांनी स्वत: गावाची निवड केली, योजनाही खासदारांसाठी असल्यामुळे खासदार फंड मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गावाची ही अपेक्षाही फोल ठरली.ग्रामपंचायतीने गावच्या विकासाचा आराखडा तयार करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत. आजपर्यंत शासकीय यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यापुढे सर्व प्रस्ताव तत्काळ मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. - गंगुताई मोरे, सरपंच, ग्रामपंचायत, आरवडेसंजय पाटील--आरवडे