शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

अपेक्षांचा डोंगर... आश्वासनांचे गाजर

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

शंभर कोटींच्या अपेक्षांचे गाठोडे आदर्श गाव योजनेतून गावातील सर्व समस्या मार्गी लागणार, अशी आशा ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची होती

दत्ता पाटील - तासगाव -सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी तासगाव तालुक्यातील आरवडे गावाची ११ नोव्हेंंबर २०१४ रोजी आदर्श ग्रामसाठी निवड केली. मात्र, सहा महिन्यांच्या कालखंडानंतर ढिम्म प्रशासन, अपेक्षांचा डोंगर आणि आश्वासनांचे गाजर दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया गावातील सामान्य जनतेतून उमटत आहे.वर्षभरात दोन वेळा खासदारांचा दौराआदर्श गाव म्हणून आरवडेची निवड झाली. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित आले. निवड जाहीर करण्यासाठी स्वत: खासदार संजय पाटील अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले. गावाची निवड झाल्यानंतर योजनेच्या निमित्ताने खासदारांनी केवळ दोनवेळा गावाला भेट दिली. दोन्ही दौऱ्यावेळी जिल्हा पातळीवरील अधिकारीही गावात आले. त्यांनी लोकांच्या समस्या, आणि अपेक्षा जाणून घेतल्या एवढेच.शंभर कोटींच्या अपेक्षांचे गाठोडे आदर्श गाव योजनेतून गावातील सर्व समस्या मार्गी लागणार, अशी आशा ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची होती. गावाच्या अपेक्षा वाढल्या. जिल्हा स्तरावरील सरकारी अधिकाऱ्यांकडून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले. कारभाऱ्यांचा उत्साह वाढला. वीजपुरवठा, पाणीपुरवठा, शेतीच्या समस्या, शाळांची समस्या अशा एक ना अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गाव सरसावले. एक-एक करत गावाच्या विकासाचा शंभर कोटींचा आराखडा तयार झाला.डिसेंबर २०१४ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागाकडे मागण्यांच्या आराखड्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले. तेव्हापासून अद्याप गावाचे डोळे लागले आहेत, ते या आराखडा मंजुरीकडे. निधी मंजूर होईल आणि कामे मार्गी लागतील, असा विश्वास असणाऱ्या ग्रामस्थांनी आता वेगळे काहीतरी होईल, अशी अपेक्षाच करणे सोडून दिले आहे.केवळ एका योजनेला मंजुरीमात्र, वर्षभराच्या काळात केवळ एकाच योजनेला मंजुरी मिळाली. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी ५२ लाखांची पाणीपुरवठा योजनाच काय ती या आदर्श योजनेचे फलित ठरली!खासदार फंडाची अपेक्षा फोल गावाची निवड झाल्यानंतर सर्वच योजनांतून तात्काळ निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षा असलेल्या जिल्हा नियोजन समितीतून आतापर्यंत एकही रुपयाचा निधी मिळाला नाही. एवढेच नव्हे तर खासदारांनी स्वत: गावाची निवड केली, योजनाही खासदारांसाठी असल्यामुळे खासदार फंड मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गावाची ही अपेक्षाही फोल ठरली.ग्रामपंचायतीने गावच्या विकासाचा आराखडा तयार करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत. आजपर्यंत शासकीय यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यापुढे सर्व प्रस्ताव तत्काळ मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. - गंगुताई मोरे, सरपंच, ग्रामपंचायत, आरवडेसंजय पाटील--आरवडे