शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

‘राजाराम’च्या विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प निर्मितीचा घाट कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:25 IST

बावड्यातील शेतकऱ्यांची कारखान्याकडे लेखी मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : राजाराम कारखान्यावर २६८ कोटी रुपयांचे कर्ज व ...

बावड्यातील शेतकऱ्यांची कारखान्याकडे लेखी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : राजाराम कारखान्यावर २६८ कोटी रुपयांचे कर्ज व देणी आहेत. कारखान्याच्या एकूण मिळकतीपेक्षा हे कर्ज व देणे जादा आहे. असे असताना राजाराम कारखाना विस्तारीकरण व सहवीज निर्मिती प्रकल्प राबवणार आहे. त्यासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. हा विस्तारीकरणाचा व सहवीज प्रकल्पाचा घाट कोणाच्या हट्टासाठी घातला जात आहे, याचा कारखान्याने वार्षिक सर्वसाधारण सभेत खुलासा करावा. तसेच कारखान्याकडे लेखी स्वरूपात पाठविलेल्या इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत, अशी मागणी नितीन बाळासाहेब पारखे व जयवंत लक्ष्मण पाटील यांच्यासह अन्य बारा सभासदांनी केली आहे.

कारखान्याकडे पाठविलेल्या प्रश्नांची प्रत माहितीसाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.

कसबा बावडा (ता. करवीर ) येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २२ ) रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे. या सभेसाठी कसबा बावड्यातील १२ व हातकणंगले तालुक्यातील दोन अशा एकूण चौदा सभासदांनी लेखी प्रश्न कारखान्याला पाठवले असून या प्रश्नांची उत्तरे व माहिती सभेत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

या विचारलेल्या प्रश्नांत माल खरेदी ॲडव्हान्स कोणाची आहे, ऑडिट रिपोर्टमधील गंभीर आक्षेपांचे स्पष्टीकरण द्यावे, तोडणी कामगार व कंत्राटदार यांचेकडून किती रक्कम येणे आहे, येणे वसूल भागभांडवलाबाबत खुलासा करावा, उपसा सिंचन योजनेवर कारखान्याने आतापर्यंत किती खर्च केला, हंगामातील साखर शिल्लक ठेवण्याचे प्रयोजन काय, कमी दराने मोलॅसिसची विक्री का केली, आदी प्रश्नांचा समावेश आहे.