शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

बालकल्याण संकुलामध्ये हुरहुर, अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : दोन दिवसांच्या अंतराने तब्बल ५१ जण कोरोनाबाधित झाल्याने बालकल्याण संकुलामध्ये अस्वस्थता पसरली आहे. सर्व ती काळजी घेऊनही ...

कोल्हापूर : दोन दिवसांच्या अंतराने तब्बल ५१ जण कोरोनाबाधित झाल्याने बालकल्याण संकुलामध्ये अस्वस्थता पसरली आहे. सर्व ती काळजी घेऊनही लहानग्यांच्या वाट्याला कोरोनाचे जीवघेणे उपचार आल्याने आता सुरक्षिततेच्या उपाययोजनांची फेररचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले सहकारी कोरोनाग्रस्त झाल्याचे पाहून संकुलातील मुले, कर्मचारी भेदरले आहेत.

बालकल्याण संकुलामध्ये समाजातील अनाथ, निराधार, गोरगरिबांची बालके वास्तव्यास असतात. आजच्या घडीला २५० मुले-मुली तेथे आहेत. सरकारी अनुदानासह समाजातील दानशुरांच्या मदतीवर ही संस्था चालविली जाते. कोरोनाची साथ गेल्या वर्षी आल्यापासून तेथे एकही रुग्ण आढळला नव्हता; पण कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मात्र एकापाठोपाठ एक अशी २५० पैकी ४७ मुले मुली पॉझिटिव्ह आढळली. या मुलांची काळजी घेणाऱ्या चौघा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने गाठले.

या सर्वांवर उपचार सुरू आहेत. फारशी लक्षणे नसल्याने काळजी करण्याचे कारण नाही; पण कोरोनाने शिरकाव करीपर्यंत येथील यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्न पुढे येत आहे. संकुल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सर्व प्रकारची खबरदारी घेतली गेली होती. बाहेरून येणाऱ्यांच्या सॅनिटायझेशनसह कपडे बदलूनच आत प्रवेशाचा कडक नियम केल्याचे सांगण्यात येत आहे; पण एक चूक सगळ्या प्रयत्नांवर कशी पाणी फिरवते, ते यानिमित्ताने बालकल्याण संकुलाला अनुभवता आले. ६ ते १८ वयोगटातील तब्बल ४७ मुले-मुली व ४ कर्मचारी असे ५१ जण कोरोनाग्रस्त होऊन दवाखान्यात पोहोचले आहेत.

या मुलांचे स्राव तपासणीसाठी दिल्यानंतर त्याचा अहवाल हातात पडायला दोन दिवस लागले. या दोन दिवसांत स्राव दिलेली मुले व कर्मचारी एकत्रच संकुलात राहत होती. निदान स्रावाचा अहवाल हाती येईपर्यंत तरी विलगीकरण आवश्यक होते; पण त्याबाबतीतही हलगर्जीपणा झाल्याचे दिसत आहे. बुधवारी (दि. १२) रिपोर्ट आल्यानंतर रात्रीच ३७ जणांना रुग्णालयात हलविण्यात आले. तोपर्यंत स्वॅब निगेटिव्ह आलेली मुलेही या पॉझिटिव्ह मुलांसमवेतच होती. त्यामुळे तीन दिवस पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात ही मुले आली असल्याने पुुन्हा स्राव घेणार की नाही याबाबतीत संकुल प्रशासनाकडून काही सांगण्यात आलेले नाही.

चौकट

...तरच संसर्गाचा धोका टळणार

कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी पोक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या मुलीच कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष गृहीत धरून संकुलाच्या प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोक्सोच्या मुली तपासणीशिवाय इकडे पाठवू नयेत, असे विनंती केली आहे. पोलीस प्रशासनाने ते मान्य केले तर भविष्यातील आणखी संसर्गाचा धोका टळणार आहे.