शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पाण्याचा अतिवापर शेतीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST

सेनापती कापशी : शेती हाच शाश्वत तरणोपाय आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा ...

सेनापती कापशी : शेती हाच शाश्वत तरणोपाय आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पीक काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाण्याचा अतिवापर हा शेतीसाठी धोकादायक आहे. यामुळे जमीन नापीक होण्याची शक्यता आहे. याकरिता शेतकऱ्यांनी स्वयंचलित ठिबक यंत्रणेचा वापर करावा. त्यासाठी अनुदान मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

ते हसूर बुद्रुक (ता. कागल) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना यांच्यातर्फे आयोजित स्वयंचलित ठिबक प्रणाली, समर्थ कृषी पर्यटन व अंकुर फार्मासिस या शेती व्यवस्थापन ॲपच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जनरल मॅनेजर संजय शा. घाटगे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर वाकुरे, अंकुर फार्मासिसचे गिरीश कुलकर्णी, आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी युवराज पाटील, शशिकांत खोत, अंकुश पाटील, ‘समन्यायी’चे आनंदराव पाटील, आदींसह कारखान्याचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीवर प्रेम

मुश्रीफ म्हणाले, वडिलांच्या मृत्यूनंतर ५० एकर शेतीची जबाबदारी दहा वर्षे माझ्यावर होती. मी स्वतः हाडाचा शेतकरी आहे. शेतात मी वाकुरी मारलेली असून पाण्यासाठी नदीत खड्डेही खोदायचो. मी शेतीवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. अलीकडच्या काळात मला शेतात जाता येत नाही. माझ्या शेतीची जबाबदारी माझी पत्नी बघते.

फोटो : हसुर बुद्रुक (ता. कागल) येथे स्वयंचलित ठिबक, कृषी पर्यटन व शेती व्यवस्थापन ॲपचे लाँचिंग करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी भैया माने, युवराज पाटील, शशिकांत खोत, गिरीश कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाकुरे, आदी उपस्थित होते.