शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

माजी संचालकांना ‘केडीसीसी’चा दरवाजा बंद

By admin | Updated: January 20, 2015 00:52 IST

गैरव्यवहाराची चौकशी भोवणार : नावावर ठराव करण्यात अडचण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) माजी संचालकांना महाराष्ट्र सहकार कायदा कलम ‘८८’ अन्वये सुरू असलेली गैरव्यवहाराच्या चौकशीवरील कारवाई चांगलीच भोवणार असून, त्यांच्या नावावर कोणत्याही संस्थेचा ठराव करता येणार नाही. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होणार असल्याने त्यांना ही जबाबदारीची रक्कम भरूनच पात्र व्हावे लागणार आहे; पण या रकमेचा आकडा पाहिला तर सुमारे चार कोटी असल्याने बहुतांश माजी संचालकांना बॅँकेचे दरवाजे बंद होण्याची चिन्हे आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने विनातारण कर्जवाटप, अपुऱ्या तारणांसह सदोष कर्जवाटप केल्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २००९ ला बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक धनंजय डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक मंडळाने बॅँकेच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या ४५ आजी-माजी संचालकांसह चार अधिकाऱ्यांना दोषी धरत त्यांच्यावर तब्बल ११७ कोटी ६८ लाख २५ हजार ४५० रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. या जबाबदारी संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी संचालकांना मुभा दिली. डोईफोडे यांनी संचालकांवरील ७२ (१), (२) व (३) ची कारवाई पूर्ण केली. त्यानंतर पुढील कारवाई सचिन रावल यांनी पूर्ण केली आहे. रावल पुढील आठवड्यात विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांच्याकडे अहवाल सादर करणार आहेत. केंद्र शासनाच्या ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे संस्थाचालकांवर कमालीचे निर्बंध आले आहेत. संस्था विश्वस्तांच्या कारनाम्यामुळेच चांगल्या संस्था अडचणीत आल्याने पोटनियम दुरुस्तीमध्ये संचालकांवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. ‘केडीसीसी’ बॅँकेच्या संचालकांवर कलम ‘८८’ अन्वये कारवाई सुरू आहे. चौकशी मध्ये ११७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार स्पष्ट होत आहे. यातील काही रक्कम बॅँकेने वसूल केली आहे; पण उर्वरित रक्कम व्याजासह १४० कोटींपर्यंत जाणार आहे. संचालकांची संख्या व वसूलपात्र रक्कम पाहता प्रत्येकाच्या अंगावर सुमारे साडेचार कोटी रुपये बसणार आहेत. यामुळे सहकार नियमानुसार हे माजी संचालक निवडणूक लढविण्यास अपात्र ठरत आहेत. त्यांच्या नावावर ठराव झाला तरीही अंतिम मतदार यादी तयार करताना ते अवैध ठरण्याची शक्यता आहे. अंतिम मतदार यादी तयार करण्यापूर्वी संबंधितांना ही रक्कम भरावी लागणार आहे. (प्रतिनिधी)पोटनियम दुरुस्तीनुसार कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार मतदार असणार नाही. त्यामुळे ज्या संस्थेच्या संचालकावर ‘८८’अन्वये कारवाई सुरू आहे, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केल्यानंतर तेही कायद्यानेच अपात्र ठरतात. - राजेंद्र दराडे (विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर) दाद मागावी लागणारजबाबदारी निश्चितीवर संचालक न्यायालयात दाद मागू शकतात; पण तत्पूर्वी त्यांना राज्य शासनाकडे दाद मागावी लागणार आहे. शासनाचे म्हणणे घेतल्यानंतर न्यायालयापुढे आपली बाजू मांडू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.