शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

प्रेक्षकांसाठी अखेर जोहार मायबाप जोहार...

By admin | Updated: February 13, 2015 00:45 IST

सकारात्मक हालचाली : नाट्यगृह व्यवस्थापनांची सुविधांसाठी तयारी; प्रेक्षकांना न्याय मिळणार

अविनाश कोळी - सांगली रसिकप्रेक्षकांची सुरक्षा, त्यांच्यासाठीच्या सेवा-सुविधा, नियमांचे पालन याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेस नाट्यगृह व्यवस्थापनांनी आज (गुरुवारी) सकारात्मक प्रतिसाद दिला. मायबाप रसिकांसाठी सर्व काही करण्याची तयारी असल्याचे मत महापालिका प्रशासन तसेच सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृह व्यवस्थापनाने व्यक्त केले. भावे नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू झाले असून, लवकरच नाट्यगृहाचा कायापालट होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपासून ‘लोकमत’ने सांगली, मिरजेतील नाट्यगृहांच्या प्रश्नांवर मालिका सुरू केली आहे. या वृत्तमालिकेस नाट्यगृह व्यवस्थापनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘लोकमत’ने योग्य गोष्टी मांडल्या असून, रसिकप्रेक्षकांच्या समाधानासाठी नाट्यगृह व्यवस्थापन बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच सांगली, मिरजेतील नाट्यगृहे नाट्यपंढरीला साजेशी होतील, असेही त्यांनी सांगितले. (समाप्त)‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या मालिकेची दखल आम्ही घेतलेली आहे. मालमत्ता व्यवस्थापकांना सांगली, मिरजेतील दोन्ही नाट्यगृहांची वस्तुस्थिती आणि उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच नाट्यगृहांमधील उणिवा दूर करून ती सुसज्ज करण्यात येतील. - अजिज कारचे, आयुक्त, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकारसिकप्रेक्षकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांच्यावरच नाट्यगृहांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षक हाच केंद्रबिंदू मानून नाट्यगृह व्यवस्थापनांनी सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत. असे झाले तरच नाट्यगृहांकडील रसिकप्रेक्षकांचा ओढा वाढेल. - शफी नायकवडी, रंगकर्मी, सांगलीनाट्यगृहांनी प्रिमायसेस परवान्यासाठी अर्जच दाखल केलेले नाहीत. विनापरवाना नाट्यगृहे सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. अजून एकाही नाट्यगृहाकडून आमच्याकडे परवान्यासाठी अर्ज आलेला नाही. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. - संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगलीदिशाभूल नको...नाट्य संमेलनात विषय नियामक मंडळासमोर प्रिमायसेस किंवा अन्य परवान्यांचा विषयच चर्चेला आला नाही. विषय नियामक मंडळासमोर जे ठराव मांडले जातात तेच ठराव संमेलनाच्या समारोपावेळी मांडले जातात. यापूर्वी ९४ संमेलनात जे ठराव पारीत झालेत व या संमेलनात मांडले गेलेले ठराव याचा पाठपुरावा करण्यासाठी ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. परवान्यांचा आणि पूर्तता समितीशी संबंध लावून दिशाभूल केली जाऊ नये, असे मत मंडळाचे सदस्य शफी नायकवडी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.