शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

प्रेक्षकांसाठी अखेर जोहार मायबाप जोहार...

By admin | Updated: February 13, 2015 00:45 IST

सकारात्मक हालचाली : नाट्यगृह व्यवस्थापनांची सुविधांसाठी तयारी; प्रेक्षकांना न्याय मिळणार

अविनाश कोळी - सांगली रसिकप्रेक्षकांची सुरक्षा, त्यांच्यासाठीच्या सेवा-सुविधा, नियमांचे पालन याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेस नाट्यगृह व्यवस्थापनांनी आज (गुरुवारी) सकारात्मक प्रतिसाद दिला. मायबाप रसिकांसाठी सर्व काही करण्याची तयारी असल्याचे मत महापालिका प्रशासन तसेच सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृह व्यवस्थापनाने व्यक्त केले. भावे नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू झाले असून, लवकरच नाट्यगृहाचा कायापालट होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपासून ‘लोकमत’ने सांगली, मिरजेतील नाट्यगृहांच्या प्रश्नांवर मालिका सुरू केली आहे. या वृत्तमालिकेस नाट्यगृह व्यवस्थापनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘लोकमत’ने योग्य गोष्टी मांडल्या असून, रसिकप्रेक्षकांच्या समाधानासाठी नाट्यगृह व्यवस्थापन बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच सांगली, मिरजेतील नाट्यगृहे नाट्यपंढरीला साजेशी होतील, असेही त्यांनी सांगितले. (समाप्त)‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या मालिकेची दखल आम्ही घेतलेली आहे. मालमत्ता व्यवस्थापकांना सांगली, मिरजेतील दोन्ही नाट्यगृहांची वस्तुस्थिती आणि उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच नाट्यगृहांमधील उणिवा दूर करून ती सुसज्ज करण्यात येतील. - अजिज कारचे, आयुक्त, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकारसिकप्रेक्षकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांच्यावरच नाट्यगृहांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षक हाच केंद्रबिंदू मानून नाट्यगृह व्यवस्थापनांनी सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत. असे झाले तरच नाट्यगृहांकडील रसिकप्रेक्षकांचा ओढा वाढेल. - शफी नायकवडी, रंगकर्मी, सांगलीनाट्यगृहांनी प्रिमायसेस परवान्यासाठी अर्जच दाखल केलेले नाहीत. विनापरवाना नाट्यगृहे सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. अजून एकाही नाट्यगृहाकडून आमच्याकडे परवान्यासाठी अर्ज आलेला नाही. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. - संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगलीदिशाभूल नको...नाट्य संमेलनात विषय नियामक मंडळासमोर प्रिमायसेस किंवा अन्य परवान्यांचा विषयच चर्चेला आला नाही. विषय नियामक मंडळासमोर जे ठराव मांडले जातात तेच ठराव संमेलनाच्या समारोपावेळी मांडले जातात. यापूर्वी ९४ संमेलनात जे ठराव पारीत झालेत व या संमेलनात मांडले गेलेले ठराव याचा पाठपुरावा करण्यासाठी ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. परवान्यांचा आणि पूर्तता समितीशी संबंध लावून दिशाभूल केली जाऊ नये, असे मत मंडळाचे सदस्य शफी नायकवडी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.