शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शक्ती कायद्यातही तृयीयपंथियांकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:38 IST

कोल्हापूर : समाजाच्या तिरकस नजरामुळे जगणे बेजार झालेल्या तृतीयपंथियांना निदान कायद्याचे तरी संरक्षण मिळेल अशी अपेक्षा होती, पण ...

कोल्हापूर : समाजाच्या तिरकस नजरामुळे जगणे बेजार झालेल्या तृतीयपंथियांना निदान कायद्याचे तरी संरक्षण मिळेल अशी अपेक्षा होती, पण शासनाने महिला व बालकासाठी जाहीर केलेल्या शक्ती कायद्यानेही त्यांच्याकडे पाठच फिरविल्याचे दिसत आहे. या क्षेत्रात गेली २५ वर्षे काम करणाऱ्या साधना झाडबुके यांनी याबाबत खंत व्यक्त करताना सरकारच पाठ फिरवत असेल तर दाद तरी कुणाकडे मागायची असा खडा सवाल केला आहे.

महिला व बालकांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी म्हणून राज्य सरकारने आंध्रप्रदेशच्या धर्तीवर शक्ती कायदा शुक्रवापासून राज्यभर लागू केला आहे. या कायद्याच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या साधना झाडबुके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कायद्याचे स्वागत केले पण खंतही व्यक्त केली. महिला व बालकांइतकेच किंबहुना जरा जास्त तृतीयपंथियांना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे निरीक्षण त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना थर्ड जेन्डर म्हणून मान्यता दिली असतानाही त्यांना या कायद्यात समाविष्ट करू नये हे आश्चर्य वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.

तृतीयपंथियांकडे बघण्याची समाजाची दृष्टी निकोप नाही. त्यांनी कोणतेही काम करायचे म्हटले तरी त्यांना त्रास दिला जातो. नोकरीच्या ठिकाणीही त्यांना शेरेबाजीला सामोरे जावे लागते. सार्वजनिक ठिकाणीही त्यांना अत्याचाराला बळी पडावे लागते. महिला व बालकांना कायद्याचे संरक्षण मिळाल्याने ते अत्याचार झाला तर दाद मागू शकतात, पण या तृतीयपंथियांनी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न आहे. समाजातील एक भाग अजूनही न्यायाकडे डोळे लावून बसला आहे, पण कोणी दखल घेत नाही. मी इतकी वर्षे या वर्गासाठी काम करते, पण त्यांच्या पुनर्वसनाासाठी आतापर्यंत कांही करु शकले नाही, याचे मनस्वी दु:ख होते. निदान कायद्याचे संरक्षण मिळवून देण्यात मी यशस्वी ठरले तरी मला थोडे समाधान मिळेल, असे झाडबुके यांनी सांगितले.

चौकट ०१

तृतीयपंथियांची स्वतंत्र जनगणना होत नाही. त्यामुळे नेमका आकडा कळत नाही. स्वयंसेवी संस्थांनी दोन वर्षांपूर्वी आकडेवारी जमा केली होती. त्यानुसार देशात ४ लाख ८७ हजार ८०३ तर राज्यात ४० हजार ८९१ तृतीयपंथी आहेत. कोल्हापुरात ३१२ संख्या आहे. निदान पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेत तरी यांची मोजणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.