शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सात दशकानंतरही पुन्हा एकदा खाशाबाना पद्म पुरस्काराची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST

कोल्हापूर : स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांनी देदीप्यमान कामगिरी करून सात दशके उलटली आहेत. ...

कोल्हापूर : स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांनी देदीप्यमान कामगिरी करून सात दशके उलटली आहेत. मात्र, त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरविणे उचित होते. मात्र, यंदाही प्रस्ताव परिपूर्ण असूनही त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. त्यांच्यासह कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे, सांगलीची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधने यांचेही प्रस्ताव पद्म पुरस्कारासाठी होते. मात्र, त्यांच्याही नावाचा विचार या पुरस्कारासाठी झाला नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवून देशाला पहिले पदक मिळवून दिले. या कामगिरीनंतर १९९४ साली टेनिसपटू लिएंडर पेस याने देशाला ऑलिम्पिकमधील कांस्य पदक मिळवून दिले. त्यानंतर त्याला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन गौरविले. मात्र, पाच दशकांपूर्वी पदक मिळवून देणारे खाशाबा यांच्या कामगिरीची दखल केंद्राने घेतली नाही. त्यांच्या हयातीत त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. यंदा मात्र, राज्याच्या पद्म पुरस्कार समितीने शिफारस करूनही केंद्र सरकारने त्यांच्या नावाचा विचार पद्म पुरस्कारासाठी केला नाही. त्यामुळे कुस्ती क्षेत्रातून मरणोत्तर पद्म पुरस्काराची अपेक्षा असताना घोर निराशा झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

खाशाबांसह यंदा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे यानेही आपल्या कामगिरीची दखल घेत आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा, याकरिता प्रस्ताव दाखल केला होता. त्याच्याही प्रस्तावाचा विचार केंद्राने केला नाही. त्याच्यासोबत भारतीय महिला क्रिकेट संघाची आधारस्तंभ असलेली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधने हिनेही प्रस्ताव दाखल केला होता. तिच्याही प्रस्तावाचा विचार केंद्राच्या पद्म पुरस्कार समितीने विचार केला नाही. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोट

सात दशकांनंतर तरी केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कार समितीने मरणोत्तर पुरस्कार जाहीर करणे अपेक्षित होते.

-रणजित जाधव, खाशाबांचे सुपुत्र

प्रतिक्रीया

कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने वीरधवलला पद्म पुरस्कार जाहीर करणे अपेक्षित होते.

- विक्रम खाडे, वीरधवलचे वडील

प्रतिक्रीया

बीसीसीआयकडून शिफारस जाणे गरजेचे होते. तरीसुद्धा यंदा नाही तर पुढील वर्षी तिला पद्म पुरस्कार प्राप्त होईल.

- श्रीनिवास मानधने, स्मृतीचे वडील