शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

‘युरोटेक्स’ कंपनीला टाळेबंदीने खळबळ

By admin | Updated: May 21, 2016 00:11 IST

बाराशे जणांची कुटुंबे उघड्यावर : वेतनवाढीबाबत वर्षभर चालढकल; अधिकाऱ्यांचाही संपर्क नाही

कोल्हापूर : वेतनवाढीच्या मुद्द्यावरून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील युरोटेक्स इंडस्ट्रीज एक्सपोर्ट लिमिटेड या सूतगिरणीच्या व्यवस्थापनाने टाळेबंदी केली आहे. त्यामुळे कंपनीच्या विविध विभागांतील बाराशे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. शिवाय त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.या कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीचा करार ३१ डिसेंबर २०१४ रोजी संपला. यानंतर कामगारांनी नव्या करारात आठ हजार रुपयांची वेतनवाढ मागितली. मात्र, वर्ष संपले तरी याबाबत कंपनीकडून वेतनवाढीची कार्यवाही झाली नाही. अशा स्थितीतही करार होईल या अपेक्षेने कामगारांनी आपले काम सुरू ठेवले. यातच १४ जानेवारी २०१६ रोजी कंपनीने टाळेबंदी नोटीस दिली. पण, कामगारांच्या विरोधानंतर व्यवस्थापनाने ती मागे घेतली. यानंतर २ मेपासून अचानकपणे कंपनीच्या युनिट क्रमांक एक आणि दोनमध्ये टाळेबंदी केली. त्यामुळे बाराशे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. कंपनीने वेतनवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कंपनी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे. दरम्यान, याबाबत वेतनवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन व्यवस्थापनाने कंपनी सुरू करावी. शिवाय बेरोजगार झालेल्या संबंधित कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन कामगार उत्कर्ष सभेच्या युरोटेक्स शाखेचे अध्यक्ष सतीश भोसले व सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी आणि सहायक कामगार आयुक्त यांना गेल्या आठवड्यात दिले आहे. नागरिका, इंडोकाउंट इंडस्ट्रीज, रेमंड झंबायटी, सोक्टास जीन्स, मॉन्टी टीशुटिरा यांनी समन्वय, सामंजस्याने वेतनवाढ दिली आहे. त्यानुसार युरोटेक्सच्या व्यवस्थापनाने कार्यवाही करून कंपनी सुरू करावी, अशी कामगारांची मागणी असल्याचे अध्यक्ष भोसले यांनी सांगितले. निवेदनावर त्यांच्यासह महादेव मानकर, तानाजी चौगले, लहू बरकाळे, संभाजी सुतार, पांडुरंग जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. टाळेबंदीबाबत व्यवस्थापनाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी कंपनीमध्ये दूरध्वनी केला असता, कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे सरव्यवस्थापक पी. डी. चौधरी हे कोल्हापूरच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)वेतनकराराबाबत आम्ही कंपनीच्या व्यवस्थापनाला २४ नोव्हेंबर २०१४ रोजी एल फॉर्म दिला होता. यानंतर कंपनीची परिस्थिती नाही, असे सांगत वेतनवाढीबाबत व्यवस्थापनाने चालढकल केली. तसेच २ मेपासून अचानक टाळेबंदी केली. त्यामुळे बाराशे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्य सूतगिरण्यांनी केलेली पगारवाढ लक्षात घेऊन कंपनीने आम्हांला वेतनवाढ द्यावी. - सिकंदर नायकवडी, अध्यक्ष, शाहू सूत कापड कामगार संघ.