शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

चांगला दर देण्यासाठी इथेनॉल प्रकल्प

By admin | Updated: January 9, 2016 01:21 IST

हसन मुश्रीफ : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात इथेनॉल निर्यात प्रारंभ

सेनापती कापशी : कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच घोरपडे साखर कारखाना उभा करू शकलो. हा कारखाना उभा करताना टोकाची राजकीय ईर्षा झाली. या सगळ्यावर मात करीत महाराष्ट्रातील आदर्श साखर कारखाना उभा करण्यात यशस्वी झालो. फक्त ऊस गाळून शेतकऱ्यांना चांगला दर देता येणार नाही, म्हणूनच वर्षभर चालणारा इथेनॉल प्रकल्प उभा केला, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) कार्यस्थळावर कारखान्याने उत्पादित केलेल्या इथेनॉल निर्यात प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, वर्षभर इथेनॉल प्रकल्प चालणारा हा देशातील दुसरा किंवा तिसरा प्रकल्प आहे. भविष्यात इथेनॉल निर्मितीला मोठी किंमत येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणारा प्रकल्प उभा केला जाईल. कारखान्यात ३५ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जात.जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, वर्षभर घाम गाळून ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर देण्यासाठीच हा इंटिग्रेटेड प्रकल्प उभा केला आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता अशी मुश्रीफ यांची ओळख आहे. पंजाब नॅशनल बँकेचे वसिष्ट यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी स्वागत केले. डिस्टिलरी विभागाचे प्रमुख संतोष मोरबाळे यांनी प्रास्ताविक, तर कार्यकारी संचालक महेश जोशी यांनी आभार मानले. दरम्यान, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅईल कॉर्पोरेशनला इथेनॉल पुरवठा करणाऱ्या टँकरचे पूजन केले. शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, अबिद मुश्रीफ, सूर्याजी घोरपडे, ‘पंजाब नॅशनल’चे सौरभ कुमार, युनियन बँक आॅफ इंडियाचे शंभव चटोपाध्याय, जांगले, बँक आॅफ इंडियाचे बेहरा, बँक आॅफ महाराष्ट्राच्या बोरगावे, आदी उपस्थित होते. शेअर्स वाटप ३१ मार्चपर्यंतकारखान्याच्यावतीने ३१ मार्चपर्यंत शेअर्स वाटप करण्यात येणार असून, ३१ मार्चपूर्वी शेअर्स खरेदी केलेल्यांनाच एक फेब्रुवारीपासून साखर वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.