शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सुविधा पुरविल्यास कोविड सेंटर सुरू करण्यास ‘ईएसआयसी’ तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:23 IST

येथील ताराबाई पार्क परिसरातील ईएसआयसी रुग्णालयात गेल्या वर्षी जूनमध्ये ५० बेडचा अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. पण, त्यासाठी रुग्ण ...

येथील ताराबाई पार्क परिसरातील ईएसआयसी रुग्णालयात गेल्या वर्षी जूनमध्ये ५० बेडचा अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. पण, त्यासाठी रुग्ण पाठविण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ईएसआयसीकडून ३० बेडचे दोन वॉर्डमध्ये नॉन कोविड विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ॲॅडमिट करून घेण्याची वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली. या दोन्ही वॉर्डमध्ये दर महिन्याला सरासरी ५० रूग्ण ॲॅडमिट होतात. त्यात हदयविकार, दमा, मधुमेह, बऱ्या न होणाऱ्या जखमा असणारे रुग्ण, लहान मुले आणि गरोदर महिलांचा समावेश आहे. एक ते दहा दिवसांपर्यंत रुग्णांना ॲडमिट केले जाते. बाह्यरुग्ण विभागामध्ये (ओपीडी) रोज दोनशे रुग्ण औषधोपचार घेतात. कोरोनाच्या कालावधीत नॉन कोविड विमाधारक कामगार रुग्णांना अन्य रुग्णालयात सेवा घेणे अडचणीचे ठरत आहे. अशा रुग्णांसाठी ईएसआयसीची सेवा आधार ठरत आहे.

चौकट

तर, विमाधारक कामगारांची अडचण होणार

दरमहा विमाधारक कामगार आणि उद्योजकांकडून ईएसआयसीची वर्गणी जमा होते. त्यामुळे या कामगारांना प्राधान्याने सेवा देणे आम्हाला आवश्यक आहे. त्यांच्या ऐवजी अन्य रुग्णांना सेवा दिल्यास या विमाधारक कामगारांची अडचण होणार आहे. कोविडबाबतचे उपचार, सेवा देण्याबाबत आम्हाला अद्याप ईएसआयसीच्या दिल्लीतील मुख्यालयातून कोणतीही सूचना मिळालेली नाही. कोविडचे रुग्ण वाढल्यास आवश्यक सेवा देण्याची आमची तयारी आहे. पण, त्यासाठी ऑक्सिजन, औषधे, पीपीई किट, रुग्णवाहिका, पुरेसे मनुष्यबळ राज्य शासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे या ईएसआयसी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र पवार यांनी सोमवारी सांगितले.