शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणतज्ञांनी सुचवले कोल्हापुरातील महापूर नियंत्रणाचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वर्षभराच्या अंतरानेच आलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवणारे उपाय सुचविण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी पुढाकार घेतला आहे. सन ...

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वर्षभराच्या अंतरानेच आलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवणारे उपाय सुचविण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी पुढाकार घेतला आहे. सन १९८९, २००५, २०१९ , २०२१ या चार मोठ्या महापुरांतील नोंदी, निरीक्षणासह येथून पुढे कसा महापूर टाळणे शक्य आहे, याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यासंबंधी विस्तृत चर्चेची तयारीदेखील दर्शवली आहे. या अहवालात वडनेरे समितीचे समर्थन करताना एकात्मिक पूर नियंत्रण प्रणालीवर भर दिला असून, आपत्ती व्यवस्थापनाऐवजी आपत्ती नियंत्रणावर कसे लक्ष केंद्रीत करायला हवे, याबाबत काही सूचना केल्या आहेत.

पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, निसर्ग मित्रचे अनिल चौगुले, शिवाजी विद्यापीठातील माजी पर्यावरण विभागप्रमुख प्रा. डॉ. जय सामंत, निवृत्त सचिव दि. बा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८९, २००५, २०१९ व २०२०मधील दोनवेळा उद्भवलेली पूर व २०२१मधील पूरपरिस्थितीबाबत प्रत्यक्ष निरीक्षणे, नोंदी, आकडेवारी, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान व हवामानात झालेले स्थानिक पातळीवर बदल या बाबींचा अभ्यास करून पंचगंगा नदी व कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर रोखण्यासाठी उपाय सुचवले आहेत. याबाबत मतभेद असू शकतात, मात्र वडनेरे समितीने सुचवलेल्या उपायांपेक्षा शक्य, व्यवहार्य, कायदेशीर, निरपेक्ष, वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुचवले आहेत. त्यांचा गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी पुढील पूर येण्याआधी व्हावी, अशी अपेक्षा मांडली आहे.

पूर रोखण्यासाठी उपाय

१) राधानगरी धरणाचे जुने यांत्रिक दरवाजे सेवाद्वार (स्वयंचलित सात वगळून) काढून त्याठिकाणी अत्याधुनिक तंत्र असलेले (ऑटोमाईझड गेट) त्वरित बसवून कार्यान्वित करावे.

२) जिल्ह्यातील सर्व धरणांच्या, साठवण तलावांच्या डूब क्षेत्रातील गाळाचे मोजमाप करा.

३) धामणी धरण त्वरित पूर्ण करावे. फ्री कॅचमेट नियोजित व संभाव्य लघु प्रकल्पाला प्राधान्य द्यावे.

४) पश्चिम घाटातील सर्व खाणकाम प्रकल्प बंद करा.

५) नदी, उपनदी, ओढा, नाला अशा किमान चार टप्प्यांवर रुंदी व गाळाचे मोजमाप करून खोली निश्चित करा.

६) पुराची सरासरी व महत्तम रेषा पूर्ण खोऱ्यात आखून शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील पूर क्षेत्रात होणारी भराव, बांधकामे रोखा.

७) राष्ट्रीय महामार्ग पूल शिरोली, रुई येथील पूल, इचलकरंजी पूल, बालिंगा, हळदी, राशिवडे, कळे येथे पाणी मार्गस्थ होणारे पूल बांधावेत.

८) रेडे डोहातून पाणी पुढे निचरा होण्यासाठी मोऱ्या बांधाव्यात.

९) कोल्हापूर शहरातील पेरूची बाग ते जयंती नाला (ब्रम्हपुरी टेकडीच्या दक्षिण बाजूने) असा अतिरिक्त पूर वाहून नेणारा जुना चॅनल अधिक रुंद करावा, तेथे पूल बांधून पाणी पुढे जाईल, अशी रचना करावी.

१०) संपूर्ण पाणलोट क्षेत्रात धूप नियंत्रण उपक्रम प्रभावीपणे राबवावा.

११) पाणलोट क्षेत्रात जमिनीचे रूप (उतार काढणे, सपाटीकरण) बदलणारी यांत्रिक कृती परवानगी व अटीला अधिन राहून असावी.

१२) कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्या व उपनद्या या दरम्यान नव्याने होणारे पूल, बंधारे व अनुषंगाने विकासकामांच्या परवानग्यांचे पुनरावलोकन करून श्वेतपत्रिका काढावी.

१३) अलमट्टी धरणासह धरणांतील पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त नियंत्रण समिती नेमली जावी.

कोल्हापूर शहराच्या अनुषंगाने पूर नियंत्रणासाठी मुद्दे...

१) कळंबा व रंकाळा या तलावातील गाळ काढणे, परिसरातील भराव व अनावश्यक बांधकाम काढण्यासह वर्षभरातील पाण्याचा वापर लक्षात घेऊन त्यामध्ये येणारे पाणी आणि विसर्ग याचे नियोजन करावे.

२) शहरातील सर्व नाले-ओढे यांची नोंद करून त्याचे प्रवाह, रुंदी - खोली याचा विकास आराखड्यात विचार व्हावा.

३) संपूर्ण शहरातील सांडपाणी निचरा करणाऱ्या वाहिन्यांचा अभ्यास करून वारंवार पाणी साचणे, तुंबणे असे प्रकार घडणारी ठिकाणे तपासावीत.

४) नाले, ओढे यावरील पूल आणि त्याचे पाणलोट क्षेत्र याचा अभ्यास करून उच्चतम पूरपरिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या मोऱ्या पुरेशा आहेत का? याचा अभ्यास करावा.