शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

पर्यावरणतज्ञांनी सुचवले कोल्हापुरातील महापूर नियंत्रणाचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वर्षभराच्या अंतरानेच आलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवणारे उपाय सुचविण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी पुढाकार घेतला आहे. सन ...

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वर्षभराच्या अंतरानेच आलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवणारे उपाय सुचविण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी पुढाकार घेतला आहे. सन १९८९, २००५, २०१९ , २०२१ या चार मोठ्या महापुरांतील नोंदी, निरीक्षणासह येथून पुढे कसा महापूर टाळणे शक्य आहे, याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यासंबंधी विस्तृत चर्चेची तयारीदेखील दर्शवली आहे. या अहवालात वडनेरे समितीचे समर्थन करताना एकात्मिक पूर नियंत्रण प्रणालीवर भर दिला असून, आपत्ती व्यवस्थापनाऐवजी आपत्ती नियंत्रणावर कसे लक्ष केंद्रीत करायला हवे, याबाबत काही सूचना केल्या आहेत.

पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, निसर्ग मित्रचे अनिल चौगुले, शिवाजी विद्यापीठातील माजी पर्यावरण विभागप्रमुख प्रा. डॉ. जय सामंत, निवृत्त सचिव दि. बा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८९, २००५, २०१९ व २०२०मधील दोनवेळा उद्भवलेली पूर व २०२१मधील पूरपरिस्थितीबाबत प्रत्यक्ष निरीक्षणे, नोंदी, आकडेवारी, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान व हवामानात झालेले स्थानिक पातळीवर बदल या बाबींचा अभ्यास करून पंचगंगा नदी व कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर रोखण्यासाठी उपाय सुचवले आहेत. याबाबत मतभेद असू शकतात, मात्र वडनेरे समितीने सुचवलेल्या उपायांपेक्षा शक्य, व्यवहार्य, कायदेशीर, निरपेक्ष, वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुचवले आहेत. त्यांचा गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी पुढील पूर येण्याआधी व्हावी, अशी अपेक्षा मांडली आहे.

पूर रोखण्यासाठी उपाय

१) राधानगरी धरणाचे जुने यांत्रिक दरवाजे सेवाद्वार (स्वयंचलित सात वगळून) काढून त्याठिकाणी अत्याधुनिक तंत्र असलेले (ऑटोमाईझड गेट) त्वरित बसवून कार्यान्वित करावे.

२) जिल्ह्यातील सर्व धरणांच्या, साठवण तलावांच्या डूब क्षेत्रातील गाळाचे मोजमाप करा.

३) धामणी धरण त्वरित पूर्ण करावे. फ्री कॅचमेट नियोजित व संभाव्य लघु प्रकल्पाला प्राधान्य द्यावे.

४) पश्चिम घाटातील सर्व खाणकाम प्रकल्प बंद करा.

५) नदी, उपनदी, ओढा, नाला अशा किमान चार टप्प्यांवर रुंदी व गाळाचे मोजमाप करून खोली निश्चित करा.

६) पुराची सरासरी व महत्तम रेषा पूर्ण खोऱ्यात आखून शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील पूर क्षेत्रात होणारी भराव, बांधकामे रोखा.

७) राष्ट्रीय महामार्ग पूल शिरोली, रुई येथील पूल, इचलकरंजी पूल, बालिंगा, हळदी, राशिवडे, कळे येथे पाणी मार्गस्थ होणारे पूल बांधावेत.

८) रेडे डोहातून पाणी पुढे निचरा होण्यासाठी मोऱ्या बांधाव्यात.

९) कोल्हापूर शहरातील पेरूची बाग ते जयंती नाला (ब्रम्हपुरी टेकडीच्या दक्षिण बाजूने) असा अतिरिक्त पूर वाहून नेणारा जुना चॅनल अधिक रुंद करावा, तेथे पूल बांधून पाणी पुढे जाईल, अशी रचना करावी.

१०) संपूर्ण पाणलोट क्षेत्रात धूप नियंत्रण उपक्रम प्रभावीपणे राबवावा.

११) पाणलोट क्षेत्रात जमिनीचे रूप (उतार काढणे, सपाटीकरण) बदलणारी यांत्रिक कृती परवानगी व अटीला अधिन राहून असावी.

१२) कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्या व उपनद्या या दरम्यान नव्याने होणारे पूल, बंधारे व अनुषंगाने विकासकामांच्या परवानग्यांचे पुनरावलोकन करून श्वेतपत्रिका काढावी.

१३) अलमट्टी धरणासह धरणांतील पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त नियंत्रण समिती नेमली जावी.

कोल्हापूर शहराच्या अनुषंगाने पूर नियंत्रणासाठी मुद्दे...

१) कळंबा व रंकाळा या तलावातील गाळ काढणे, परिसरातील भराव व अनावश्यक बांधकाम काढण्यासह वर्षभरातील पाण्याचा वापर लक्षात घेऊन त्यामध्ये येणारे पाणी आणि विसर्ग याचे नियोजन करावे.

२) शहरातील सर्व नाले-ओढे यांची नोंद करून त्याचे प्रवाह, रुंदी - खोली याचा विकास आराखड्यात विचार व्हावा.

३) संपूर्ण शहरातील सांडपाणी निचरा करणाऱ्या वाहिन्यांचा अभ्यास करून वारंवार पाणी साचणे, तुंबणे असे प्रकार घडणारी ठिकाणे तपासावीत.

४) नाले, ओढे यावरील पूल आणि त्याचे पाणलोट क्षेत्र याचा अभ्यास करून उच्चतम पूरपरिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या मोऱ्या पुरेशा आहेत का? याचा अभ्यास करावा.