शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पर्यावरणतज्ञांनी सुचवले कोल्हापुरातील महापूर नियंत्रणाचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वर्षभराच्या अंतरानेच आलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवणारे उपाय सुचविण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी पुढाकार घेतला आहे. सन ...

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वर्षभराच्या अंतरानेच आलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवणारे उपाय सुचविण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी पुढाकार घेतला आहे. सन १९८९, २००५, २०१९ , २०२१ या चार मोठ्या महापुरांतील नोंदी, निरीक्षणासह येथून पुढे कसा महापूर टाळणे शक्य आहे, याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यासंबंधी विस्तृत चर्चेची तयारीदेखील दर्शवली आहे. या अहवालात वडनेरे समितीचे समर्थन करताना एकात्मिक पूर नियंत्रण प्रणालीवर भर दिला असून, आपत्ती व्यवस्थापनाऐवजी आपत्ती नियंत्रणावर कसे लक्ष केंद्रीत करायला हवे, याबाबत काही सूचना केल्या आहेत.

पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, निसर्ग मित्रचे अनिल चौगुले, शिवाजी विद्यापीठातील माजी पर्यावरण विभागप्रमुख प्रा. डॉ. जय सामंत, निवृत्त सचिव दि. बा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८९, २००५, २०१९ व २०२०मधील दोनवेळा उद्भवलेली पूर व २०२१मधील पूरपरिस्थितीबाबत प्रत्यक्ष निरीक्षणे, नोंदी, आकडेवारी, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान व हवामानात झालेले स्थानिक पातळीवर बदल या बाबींचा अभ्यास करून पंचगंगा नदी व कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर रोखण्यासाठी उपाय सुचवले आहेत. याबाबत मतभेद असू शकतात, मात्र वडनेरे समितीने सुचवलेल्या उपायांपेक्षा शक्य, व्यवहार्य, कायदेशीर, निरपेक्ष, वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुचवले आहेत. त्यांचा गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी पुढील पूर येण्याआधी व्हावी, अशी अपेक्षा मांडली आहे.

पूर रोखण्यासाठी उपाय

१) राधानगरी धरणाचे जुने यांत्रिक दरवाजे सेवाद्वार (स्वयंचलित सात वगळून) काढून त्याठिकाणी अत्याधुनिक तंत्र असलेले (ऑटोमाईझड गेट) त्वरित बसवून कार्यान्वित करावे.

२) जिल्ह्यातील सर्व धरणांच्या, साठवण तलावांच्या डूब क्षेत्रातील गाळाचे मोजमाप करा.

३) धामणी धरण त्वरित पूर्ण करावे. फ्री कॅचमेट नियोजित व संभाव्य लघु प्रकल्पाला प्राधान्य द्यावे.

४) पश्चिम घाटातील सर्व खाणकाम प्रकल्प बंद करा.

५) नदी, उपनदी, ओढा, नाला अशा किमान चार टप्प्यांवर रुंदी व गाळाचे मोजमाप करून खोली निश्चित करा.

६) पुराची सरासरी व महत्तम रेषा पूर्ण खोऱ्यात आखून शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील पूर क्षेत्रात होणारी भराव, बांधकामे रोखा.

७) राष्ट्रीय महामार्ग पूल शिरोली, रुई येथील पूल, इचलकरंजी पूल, बालिंगा, हळदी, राशिवडे, कळे येथे पाणी मार्गस्थ होणारे पूल बांधावेत.

८) रेडे डोहातून पाणी पुढे निचरा होण्यासाठी मोऱ्या बांधाव्यात.

९) कोल्हापूर शहरातील पेरूची बाग ते जयंती नाला (ब्रम्हपुरी टेकडीच्या दक्षिण बाजूने) असा अतिरिक्त पूर वाहून नेणारा जुना चॅनल अधिक रुंद करावा, तेथे पूल बांधून पाणी पुढे जाईल, अशी रचना करावी.

१०) संपूर्ण पाणलोट क्षेत्रात धूप नियंत्रण उपक्रम प्रभावीपणे राबवावा.

११) पाणलोट क्षेत्रात जमिनीचे रूप (उतार काढणे, सपाटीकरण) बदलणारी यांत्रिक कृती परवानगी व अटीला अधिन राहून असावी.

१२) कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्या व उपनद्या या दरम्यान नव्याने होणारे पूल, बंधारे व अनुषंगाने विकासकामांच्या परवानग्यांचे पुनरावलोकन करून श्वेतपत्रिका काढावी.

१३) अलमट्टी धरणासह धरणांतील पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त नियंत्रण समिती नेमली जावी.

कोल्हापूर शहराच्या अनुषंगाने पूर नियंत्रणासाठी मुद्दे...

१) कळंबा व रंकाळा या तलावातील गाळ काढणे, परिसरातील भराव व अनावश्यक बांधकाम काढण्यासह वर्षभरातील पाण्याचा वापर लक्षात घेऊन त्यामध्ये येणारे पाणी आणि विसर्ग याचे नियोजन करावे.

२) शहरातील सर्व नाले-ओढे यांची नोंद करून त्याचे प्रवाह, रुंदी - खोली याचा विकास आराखड्यात विचार व्हावा.

३) संपूर्ण शहरातील सांडपाणी निचरा करणाऱ्या वाहिन्यांचा अभ्यास करून वारंवार पाणी साचणे, तुंबणे असे प्रकार घडणारी ठिकाणे तपासावीत.

४) नाले, ओढे यावरील पूल आणि त्याचे पाणलोट क्षेत्र याचा अभ्यास करून उच्चतम पूरपरिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या मोऱ्या पुरेशा आहेत का? याचा अभ्यास करावा.