शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

रणरागिणी ताराराणींचा समग्र इतिहास येणार समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:23 IST

समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे समग्र आणि संशोधनात्मक चरित्र लवकरच वाचकांना ...

समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे समग्र आणि संशोधनात्मक चरित्र लवकरच वाचकांना उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेले हे चरित्र मराठीतील समग्र असे पहिले चरित्र ठरणार आहे.

डॉ. पवार यांनी ४० वर्षांपूर्वी ताराराणी यांचे चरित्र लिहिले होते. परंतु त्यामध्ये १७०७ पर्यंतच्या घटनांचा आढावा घेण्यात आला होता. ऐतिहासिक साधनांच्या अभावामुळे त्यामध्ये फार विस्तार करता आला नव्हता. परंतु गेल्या ४० वर्षांत उजेडात आलेल्या अस्सल ऐतिहासिक साधनांच्या आधारे पुन्हा एकदा ताराराणी यांचे समग्र आणि संशोधनात्मक चरित्र लिहिण्याचा संकल्प डॉ. पवार यांनी सोडला होता.

दोन खंडांमध्ये हा ग्रंथ प्रकाशित होणार असून, यामध्ये ताराराणी यांच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणि त्यानंतर ताराराणी यांच्या मृत्यूपर्यंत अशा दोन भागांचा समावेश आहे. औरंगजेबाच्या अखबाराचे जे संशोधन सेतुमाधवराव पगडी यांनी केले होते, त्याचा भक्कम आधार या चरित्राला आहे. त्यामुळे ताराराणी यांच्या प्रचंड कर्तबगारीचे पुरावेच ठायी ठायी सापडले आहेत.

औरंगजेबाचे जे तीन चरित्रकार आहेत, ते तिघेही ताराराणी यांच्या प्रचंड पराक्रमाने प्रभावित झालेले होते. ही एक विलक्षण स्त्री आहे. एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहेत. मराठ्यांच्या लष्करी मोहिमांचे संयोजन त्या करतात, असे स्पष्ट उल्लेख या चरित्रकारांनी करून ठेवले आहेत. सध्या या ग्रंथाचे मुद्रण सुरू असून, येत्या दोन महिन्यांत हा ग्रंथ वाचकांसाठी तयार होईल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

चौकट

छत्रपती परिवाराकडून साडेसात लाखांचा निधी

ताराराणी यांचे समग्र चरित्र सिध्द व्हावे, यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती परिवाराकडून साडेसात लाख रुपयांचा निधी या ग्रंथ निर्मितीसाठी देण्यात आला आहे. याचा धनादेश गुरुवारी डॉ. जयसिंगराव पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कोट

महाराणी ताराराणी यांनी केवळ राज्यकारभार केला नाही, तर त्या लष्करी मोहिमांचेही संयोजन करत होत्या. जेव्हा औरंगजेबाची सेना करवीर प्रांतात झगडत होती, तेव्हा ताराराणी यांच्या २५/३० हजाराच्या फौजा गुजरात, मावळ, कर्नाटक प्रांतामध्ये धुमाकूळ घालत होत्या. ही त्यांची वैविध्यपूर्ण कर्तबगारी अस्सल ऐतिहासिक साधनांच्या आधारे या दोन खंडांमधून मांडण्यात येणार आहे.

डाॅ. जयसिंगराव पवार,

ज्येष्ठ इतिहास संशोधक