शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

रेडझोनमधील अतिक्रमण पूरस्थितीला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : नंदकुमार वडनेरे समितीने पूरस्थितीला रेड झोनमधील अतिक्रमण जबाबदार धरले असून ती वस्तुस्थिती आहे. ही सगळीच अतिक्रमणे आता ...

कोल्हापूर : नंदकुमार वडनेरे समितीने पूरस्थितीला रेड झोनमधील अतिक्रमण जबाबदार धरले असून ती वस्तुस्थिती आहे. ही सगळीच अतिक्रमणे आता काढणेही शक्य नाही. ज्याठिकाणी नदी, नाले व ओेढ्याच्या पात्रांमध्येच गंभीर अतिक्रमण झाले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मर्यादेपेक्षा जास्त पाऊस होऊन पूरस्थितीची शक्यता दिसून आली की येथील धरणातील पाण्याचा विसर्ग व त्याच प्रमाणात अलमट्टीतील विसर्ग सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-सांगली येथील संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते काेल्हापुरात आले होते, या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. वडनेरे समितीने पूरस्थितीला रेडझोनमधील बांधकामांना जबाबदार धरले आहे, या अतिक्रमणांवर कारवाई करणार का, या प्रश्नावर मंत्री पाटील म्हणाले की, अतिक्रमणांमुळे पुराचा धोका जास्त आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामु‌ळे नैसर्गिक नाले, ओढे, नद्यांमधील पाणी वाहून नेण्यात अडथळा येऊन पाणी तुंबून राहते. शिवाय कॉंक्रिटीकरण, डांबरीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. फुगवट्यामुळे पंचगंगा, कृष्णा आणि वारणेचे पाणी लवकर खाली जात नाही. यापूर्वी झालेल्या अतिक्रमण काढायचे म्हटल्यास नवा वाद निर्माण होतो. त्यामुळे यापुढे अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जाईल, त्यामुळे पूरावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. मात्र नैसर्गिक प्रवाहात मोठा अडथळा निर्माण करणारे गंभीर अतिक्रमण झाले असेल तर ते नागरिकांनी निदर्शनास आणून द्यावे त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

मंत्री जयंत पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी कर्नाटक सरकारने अलमट्टीतील विसर्ग वाढवून चांगले सहकार्य केले आहे, त्यामुळे पुराचा धोका टळला. यंदादेखील मुख्य सचिव स्तरावर चर्चा झाली असून मंत्रीस्तरावरदेखील पुढील काही दिवसांत चर्चा होणार आहे. पुराचा धोका निर्माण होण्याआधीच कोल्हापूरमधील धरणांतील पाण्याचा विसर्ग व त्याच प्रमाणात अलमट्टीतून विसर्ग होईल याचे नियोजन केले जात आहे. कर्नाटक सरकारकडून देखील बॅकवॉटरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कर्नाटकसोबत दहा दिवसांत चर्चा

कर्नाटककडून अलमट्टीची उंची वाढवण्याचा विचार केला जात आहे याबाबत ते म्हणाले की, अलमट्टीबाबत कर्नाटकशी आमचा संवाद चांगला आहे, आमची याबद्दलची मते त्यांनी मान्य केली असून एकमेकांना सहाय्य करण्याचीच भावना आहे. पुढील १० दिवसांत मंत्रीस्तरावर आम्ही चर्चा करू.

पूरस्थितीचा आराखडा व कोरोनाची स्थिती

पाण्याची पातळी अधिकाधिक किती वाढू शकेल, कोणत्या गावांमध्ये, शहरांमध्ये किती पाणी शिरेल, किती कुटुंबं बाधित होतील याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील पंधरा दिवसांत त्याचा नकाशा करून संबंधित ग्रामपंचायती व तालु्क्यांना ते देण्यात येणार आहे. त्यानुसार जलसपंदा विभाग व महसूलकडून उपाययोजना केल्या जातील. नागरिकांचे स्थलांतर आणि त्या काळातील कोरोनाची स्थिती याचा विचार करून पालकमंत्री व जिल्हाधिकारी नियोजन करतील.

---