शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गांधीनगर शहराला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

लँडमाफियांनी मोक्याच्या आणि मिळेल त्याठिकाणी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. काहींनी खोट्या सनदी काढल्या आहेत.

बाबासाहेब नेर्ले -गांधीनगर -पश्चिम महाराष्ट्रात तयार कपड्यांची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेल्या गांधीनगरला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. दररोज लाखोंची उलाढाल होत असलेल्या या बाजारपेठेत लँडमाफियांनी तसेच अनेकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. ही बाब माहीत असूनही ‘गांधारी’ची भूमिका शासन का घेत आहे? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी, उचगाव, चिंचवाड या पाचही गावांच्या हद्दीत ही व्यापारपेठ वसली आहे. येथील व्यापारीकरण पाहता येथील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे येथे काही लँडमाफियांनी मोक्याच्या आणि मिळेल त्याठिकाणी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. काहींनी खोट्या सनदी काढल्या आहेत. तसेच काही आरक्षित शासनाच्या जागा आहेत त्याही गिळंकृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गांधीनगर मुख्य रस्ता तर अतिक्रमितच आहे. वास्तविक ६० फुटांचा रस्ता असतानाही तो आता ३० फुटांवर येऊन ठेपला आहे. म्हणजे निम्म्या रस्त्यावरच अतिक्रमण झाले आहे. सिंधी मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी रोडच व्यापला आहे. त्यांना दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा देऊनही ते मोक्याच्या ठिकाणीच ठाण मांडून बसले आहेत. परिणामी, गांधीनगरचे एकंदरीत अस्तित्वच धोक्यात आले आहे; पण याचे सोयरसूतक शासनास नाही. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे फावते आहे. गांधीनगरच्या अतिक्रमण प्रश्नाविषयी दलित संघटना, शिवसेनेचे आंदोलनही झाले. पण, त्या आंदोलनाची धार तात्पुरती राहिली. काही संघटनांची निवेदने धूळ खात पडली आहेत. तर काहींना केराची टोपली दाखविली आहे.एकंदरीत गांधीनगरचे अस्तित्व टिकवावयाचे असेल, तर येथील शासकीय आरक्षित जागांचे तसेच अनधिकृत बांधकामे थांबविण्याचे मोठे आवाहन संबंधित विभागाला असणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे.