शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

यंत्रमाग कामगारांच्या बोनसला कात्री

By admin | Updated: October 30, 2015 23:26 IST

तीस टक्क्यांची घट : कापडास मागणी नसल्याने यंत्रमागधारकही चिंतेत; यंत्रमागांसह सायझिंग, प्रोसेसिंग कामगारांमध्ये अस्वस्थता

राजाराम पाटील -- इचलकरंजीवर्षभर असलेले आर्थिक मंदीचे सावट आणि ५२ दिवस चाललेला सायझिंग कामगारांचा संप यामुळे वस्त्रनगरीच्या कापड उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, यंत्रमाग क्षेत्राबरोबर सायझिंग-वार्पिंग, प्रोसेसिंग उद्योगातील सुमारे ७५ हजार कामगारांच्या बोनस रकमेत सरासरी ३० टक्क्यांची घट होणार असल्यानेकामगार वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. तसेच आगामी हंगामासाठी कापडाची मागणी नसल्याने कापड उत्पादक यंत्रमागधारक आणि व्यापारीसुद्धा चिंतेत आहेत.इचलकरंजी परिसरामध्ये दीड लाख यंत्रमाग असून, त्यावर सुमारे ५५ हजार कामगार कार्यरत आहेत. याचबरोबर सायझिंग-वार्पिंग उद्योगात साडेतीन हजार, प्रोसेसर्स उद्योगात तीन हजार आणि सूतगिरण्यांमध्ये दोन हजार असे कामगार आहेत. अशा यंत्रमाग उद्योगामध्ये यंत्रमाग कामगार, जॉबर, कांडीवाला, कापड तपासणीस-घडीवाला, दिवाणजी असे कामगार असतात; तर सायझिंगमध्ये सायझर्स, बॅक सायझर्स, वार्पर, हेल्पर, फायरमन आणि प्रोसेसिंग उद्योगामध्ये कामगारांबरोबरच पॅकिंग विभागात काम करणारे कामगार, तसेच कार्यालयीन कर्मचारी कार्यरत असतात. यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांना दहा हजारांपासून ते पंचवीस हजारांपर्यंत बोनसची रक्कम मिळते. सायझिंग उद्योगामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये, प्रोसेसिंग उद्योगामध्ये सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये आणि सूतगिरण्यांसाठी दहा ते वीस हजार रुपये असा कामगारांच्या वर्गवारीनुसार बोनस मिळतो. मात्र, गेल्या वर्षभरात कापड उद्योगात जागतिक व देशांतर्गत स्तरावर अभूतपूर्व मंदीचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणून कापडास असलेली मागणी घटली आहे. त्यामुळे कापडाच्या किमती कमी होण्याबरोबरच यंत्रमाग व आॅटोलूम क्षेत्रासाठी मिळणारा जॉब रेट घटला आहे आणि वस्त्रोद्योगात आर्थिक मंदी जाणवत आहे.मंदीच्या वातावरणामुळे कापडाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच किमान वेतनाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी २१ जुलैपासून सुरू झालेला सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप ५२ दिवस चालला. याचा अनिष्ट परिणाम यंत्रमाग कापडाच्या उत्पादनावर झाला आहे. एकूणच मंदीमुळे आणि संपामुळे कापडाचे उत्पादन तीस ते पस्तीस टक्क्यांनी घसरले. वस्त्रनगरीत कापडाच्या उत्पादनाशी निगडित कामगारांचे वेतन व वेतनाच्या टक्केवारीवर दीपावली बोनस मिळत असल्याने बोनस रकमेतसुद्धा सरासरी तीस टक्क्यांनी घट होणार आहे. हंगामी कापडाची मागणी नाहीप्रत्येक वर्षी लग्नसराईच्या हंगामासाठी कापडाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असते. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कापडाची मागणी वाढत असते; पण यंदा जागतिक मंदी व राज्यात असलेला दुष्काळ यामुळे दीपावली सणानंतर होणाऱ्या कापडाच्या खरेदीचा कोणताही कार्यक्रम बड्या व्यापाऱ्यांकडून मिळालेला नाही. याचा परिणाम म्हणून दीपावली सणासाठी बंद झालेले कारखाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बंदच राहतील, अशीही चर्चा शहरातील कापड बाजारात आहे.