शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

हद्दवाढ विरोधात आता एल्गार

By admin | Updated: June 7, 2014 01:04 IST

संपतराव पवार : जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा

कोल्हापूर : महानगरपालिकेने उपनगरांसह शहरात काय विकास केला आहे, हे आतापर्यंत ग्रामीण जनतेने पाहिले आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नसताना गुण्यागोविंदाने ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला हद्दवाढीत का अडकविता? असा सवाल करत कोणत्याही परिस्थितीत १७ गावांचा समावेश शहरात होऊ देणार नाही, यासाठी जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा माजी आमदार संपतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पवार म्हणाले, एखादा निर्णय घेताना जनमानसाच्या भावनेचा विचार न करता तो लादण्याचा प्रयत्न केल्याने टोलसारखे भूत जनतेच्या मानेवर बसले आहे. आताही तीच चूक महापालिकेचे पदाधिकारी करीत आहेत. ग्रामीण जनतेचा विरोध असताना त्यांना कायद्याचे भय दाखवून शहरात आणले जाते, हे चुकीचे आहे. आमच्या जमिनी बागायती आहेत, शेतीपूरक व्यवसाय करून तरुण उपजीविका करीत आहेत. शहरात येऊन कोणाची तरी भांडी धुण्या पलीकडे काहीच मिळणार नाही. नाथाजी पोवार (मोरेवाडी) म्हणाले, हा प्रश्न न्यायालयीन पातळीवर असला तरी जनभावनेचा विचार करावाच लागेल. १७ गावांच्या अकृषक रोजगाराची टक्केवारी चुकीची सादर केली आहे. एकीकडे भूसलगतेचे कारण सांगायचे, मग त्यात पुलाची शिरोली, नागाव कसे आले आणि शिंगणापूर, हणमंतवाडी कशी बाहेर गेली, याचे उत्तर महापालिकेला द्यावेच लागेल. शिरोली व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींचा जाणीवपूर्वक शहरात समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथील नागरी सुविधा औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविल्या जातात. केवळ विकास निधी मिळविण्याच्या नादात सतरा गावांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेणार नाही. ‘भोगावती’चे माजी संचालक बी. ए. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत, आमचे शेतीपूरक व्यवसाय आहेत. ग्रामीण भागात घरबांधणी परवाना पाचशे रुपयांना मिळतो, महापालिकेत त्यासाठी ५० हजार मोजावे लागतात. शहराचा विकास झाला पाहिजे, पण ग्रामीण जनतेला कोणी वेठीस धरू नये. प्रसंगी कायदेशीर लढाईची तयारीही आहे. राजू माने (उजळाईवाडी), प्रकाश पाटील (कळंबा), भगवान पलसे (वळीवडे), आदी उपस्थित होते.