शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

हद्दवाढ विरोधात आता एल्गार

By admin | Updated: June 7, 2014 01:04 IST

संपतराव पवार : जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा

कोल्हापूर : महानगरपालिकेने उपनगरांसह शहरात काय विकास केला आहे, हे आतापर्यंत ग्रामीण जनतेने पाहिले आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नसताना गुण्यागोविंदाने ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला हद्दवाढीत का अडकविता? असा सवाल करत कोणत्याही परिस्थितीत १७ गावांचा समावेश शहरात होऊ देणार नाही, यासाठी जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा माजी आमदार संपतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पवार म्हणाले, एखादा निर्णय घेताना जनमानसाच्या भावनेचा विचार न करता तो लादण्याचा प्रयत्न केल्याने टोलसारखे भूत जनतेच्या मानेवर बसले आहे. आताही तीच चूक महापालिकेचे पदाधिकारी करीत आहेत. ग्रामीण जनतेचा विरोध असताना त्यांना कायद्याचे भय दाखवून शहरात आणले जाते, हे चुकीचे आहे. आमच्या जमिनी बागायती आहेत, शेतीपूरक व्यवसाय करून तरुण उपजीविका करीत आहेत. शहरात येऊन कोणाची तरी भांडी धुण्या पलीकडे काहीच मिळणार नाही. नाथाजी पोवार (मोरेवाडी) म्हणाले, हा प्रश्न न्यायालयीन पातळीवर असला तरी जनभावनेचा विचार करावाच लागेल. १७ गावांच्या अकृषक रोजगाराची टक्केवारी चुकीची सादर केली आहे. एकीकडे भूसलगतेचे कारण सांगायचे, मग त्यात पुलाची शिरोली, नागाव कसे आले आणि शिंगणापूर, हणमंतवाडी कशी बाहेर गेली, याचे उत्तर महापालिकेला द्यावेच लागेल. शिरोली व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींचा जाणीवपूर्वक शहरात समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथील नागरी सुविधा औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविल्या जातात. केवळ विकास निधी मिळविण्याच्या नादात सतरा गावांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेणार नाही. ‘भोगावती’चे माजी संचालक बी. ए. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत, आमचे शेतीपूरक व्यवसाय आहेत. ग्रामीण भागात घरबांधणी परवाना पाचशे रुपयांना मिळतो, महापालिकेत त्यासाठी ५० हजार मोजावे लागतात. शहराचा विकास झाला पाहिजे, पण ग्रामीण जनतेला कोणी वेठीस धरू नये. प्रसंगी कायदेशीर लढाईची तयारीही आहे. राजू माने (उजळाईवाडी), प्रकाश पाटील (कळंबा), भगवान पलसे (वळीवडे), आदी उपस्थित होते.