शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी सरकारच्या यशापयशाची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:46 IST

वसंत भोसले लोकसभेची सतरावी निवडणूक सात टप्प्यांत होत आहे. येत्या गुरुवारी (११ एप्रिल) पहिल्या टप्प्याचे मतदानही होईल. शेवटचा टप्पा ...

वसंत भोसलेलोकसभेची सतरावी निवडणूक सात टप्प्यांत होत आहे. येत्या गुरुवारी (११ एप्रिल) पहिल्या टप्प्याचे मतदानही होईल. शेवटचा टप्पा १९ मे रोजी संपेल आणि २३ मे रोजी निकाल जाहीर होतील. या निवडणुकीनिमित्त सत्तर वर्षांच्या भारतीय लोकशाहीला बळकट करणाऱ्या सर्व निवडणुका, त्यांचे निकाल, मतदारांची संख्या, विविध पक्षांचे यशापयश, पंतप्रधानांची कामगिरी, आणीबाणी, सत्तांतरे, आदींचा धावता आढावा बावीस भागांत घेतला. आज ‘इतिहासाची पाने’ या सदराचा शेवटचा भाग आहे. त्यामध्ये चार दिवसानंतर सुरू होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीचा विचार करून थांबत आहोत. गेल्या सोळा निवडणुकांपैकी चार मुदतपूर्व झाल्या. उर्वरित बारा दर पाच वर्षांनी पार पडल्या. तुलनेने राजकीय अस्थिरता कमी आहे. मात्र, सन १९८४ नंतर सन २०१४ पर्यंत तीस वर्षे कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते. त्यापैकी विरोधकांना दोनच वेळा (सन १९९० आणि सन २०१४) पूर्ण बहुमत मिळाले. अन्यथा तीन वर्षांपैकी पंचवीस वर्षे भाजप, जनता दल व कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीची सरकारे सत्तेवर होती. या काळात कॉँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असला तरी त्यांची सदस्यसंख्या प्रथमच नीचांकी राहिली (कॉँग्रेस ४४ जागा) त्यांच्या घटक पक्षांसह ६० जागा होत्या. डावे पक्षही कमकुवत झाले आहेत. त्यामानाने प्रादेशिक पक्षाची (बिजू जनता दल, द्रमुक, तेलगू देसम, आदी) संख्या चांगली आहे. ही निवडणूक पाच वर्षे पूर्ण करणाºया व सलग पुढील पन्नास वर्षे सत्तेवर राहण्याचा आत्मविश्वास बाळगणाºया मोदी यांच्या यशापयशाची आहे. कॉँग्रेस पुन्हा कितपत बळकट होईल व प्रादेशिक पक्षांची स्थिती काय राहते हे देखील ही निवडणूक ठरविणार आहे.पंतप्रधान मोदी यांनी ‘अच्छे दिन आने वाले है!’ असे घोषवाक्य घेऊन विकासाचे स्वप्न मांडले होते. जात-जमातवाद, दहशतवादाचा नायनाट करण्याचा निर्धार केला होता. डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांच्या काळात राबविलेल्याच सर्व योजना नावे बदलून आणि थोडी फार सुधारणा करून पुढे आणल्या आहेत. अर्थनीतीमध्ये मुलभूत बदल नाही. मात्र, नोटाबंदीचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. काळा पैसा ही भ्रष्टाचाराची मोठी समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून नोटाबंदीचा आघात केला. त्याला किती यश मिळाले, हे सत्ताधारीही सांगू शकत नाहीत. परदेशातील काळा पैसा आणण्याचेही प्रयत्न झाले नाहीत. याउलट बँकांना फसवून परदेशात निघून जाण्याची मोठी प्रकरणे घडली. या सर्वांचा रोजगार निर्मितीवर मोठा फटका बसला आहे. शेती-शेतकरीवर्गाला दिलासा देणारी कोणतीही नवी योजना अंमलात आली नाही. परिणामी कर्जबाजारीपणा वाढला, आत्महत्या वाढल्या. महागाई रोखण्याचा दावा केला असला तरी तो शेतमालाचे दर मातीमोल करणारा ठरला आहे. तेलाच्या किमती वाढल्याने महागाईचा चटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते आहे. ‘राफेल’सारखी प्रकरणे गाजली. विविध जाती-जमातींमध्ये आरक्षणावरून गोंधळाची स्थिती आहे. या सर्वांवर उपाययोजना करण्यात सरकारला यश आले; असे म्हणणे धाडसाचे होईल तरीदेखील दावे-प्रतिदावे चालू आहेत. कॉँग्रेसने आघाडीचे राजकारण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी आक्रमक पद्धतीने राजकारण करत पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार करून विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या यशापयशाची ही निवडणूक ठरणार आहे. मतदार त्यापैकी कोणाला पसंती देतात, हे २३ मे रोजी स्पष्ट होईल. (समाप्त)