शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडी तालुक्यातील अठराशे शेतकरी अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

अनिल पाटील सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील आयकर भरणारे ६८९ व शासनाच्या ...

अनिल पाटील

सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील आयकर भरणारे ६८९ व शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या, तसेच चुकीची माहिती सादर करणाऱ्या ११११ अशा एकूण १८०० शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. या सर्व अपात्र शेतकऱ्यांना त्यांनी लाभ घेतलेल्या सुमारे ८६ लाख २२ हजार रु. रकमेच्या वसुलीच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.

केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०१९ मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रु. अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नावावर कृषी क्षेत्र असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपले अर्ज शासनाकडे सादर करून या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली होती. परंतु शासनाच्या वतीने नुकतीच लाभार्थी शेतकऱ्यांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये नियमित आयकर भरणाऱ्या तालुक्यातील ६८९ आणि संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, आदी यासारख्या शासनांच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसह, दोन लाखांपेक्षा जादा उत्पन्न असणाऱ्या व एक लाखाहून जास्त पेन्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांना, तसेच अर्जाद्वारे चुकीची माहिती सादर करणाऱ्या ११११ अशा एकूण १८०० शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच यापूर्वी या सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतलेली सुमारे ८६ लाख २२ हजार रु. वसुलीच्या नोटिसाही तालुक्यातील संबंधित अपात्र शेतकऱ्यांना लागू करण्यात आल्या आहेत.

x चौकट X

शाहूवाडी तालुक्यातील सर्व अपात्र शेतकऱ्यांना त्यांनी लाभ घेतलेली रक्कम शासन जमा करण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. सदरची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित अपात्र शेतकऱ्यास महसूल वसुली प्रमाणपत्राद्वारे थकबाकीदार घोषित करून ही रक्कम कायदेशीर मार्गाने सक्तीने वसूल करण्यात येईल.

= गुरू बिराजदार, तहसीलदार शाहूवाडी

= तालुक्यातील ६८९ आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ६४ लाख, तर चुकीची माहिती सादर करणाऱ्या इतर ११११ अपात्र शेतकऱ्यांकडून २२ लाख २२ हजार अशा एकूण ८६ लाख २२ हजार रु. ची वसुली करण्यात येणार आहे.