शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शाहूकालीन हत्ती पैदास केंद्र वनविभाग पुन्हा चालू करण्याच्या प्रयत्नात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील तीन गावांना राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून, प्रामुख्याने शाहूकालीन हत्ती पैदास केंद्र असलेल्या पन्हाळा ...

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील तीन गावांना राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून, प्रामुख्याने शाहूकालीन हत्ती पैदास केंद्र असलेल्या पन्हाळा वनविभागातील मानवाड येथे हत्ती पैदास केंद्र पुन्हा सुरू करता येते का, याची माहिती घेत असल्याचे वनअधिकारी प्रियांका दळवी यांनी सांगितले. राज्य वन्यजीव मंडळाच्या १६ व्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, कोल्हापूरमधील अन्य तालुक्यांबरोबरच पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील मानवाड, कोलीक, वाशी येथील वनक्षेत्रांना राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. या प्रस्तावाला त्या परिसरातील राखीव वनक्षेत्राचा समावेश करण्यात आल्याची माहिती पन्हाळा वनअधिकारी प्रियांका दळवी यांनी दिली. राखीव वनक्षेत्रामधील मानवाड, वाशी, कोलीक या जागा वन कायद्याअंतर्गत संरक्षित होणार आहेत. पन्हाळा वन विभागातील मानवाड या गावातील वनहद्दीत शाहूकालीन हत्ती पैदास केंद्र होते ते पुन्हा सुरू करता येते का याची माहिती घेतली जात असून, हे यशस्वी झाल्यास सह्याद्रीच्या डोंगररांगेतील हे पुन्हा आश्चर्य ठरणार आहे. राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण या ठिकाणी मिळणार असून, या ठिकाणच्या पारंपरिक वृक्षसंपदेतील दुर्मीळ वृक्षांचे संगोपन होणार आहे. यात मोडी, अडका, खुरी, कुंभळ, अंजन ही झाडे आहेत. तेथील स्थानिकांचे हक्क अबाधित राहणार असून वन्यजीव भ्रमणमार्ग आजरा, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, पेंडाखळे, मलकापूर, शिराळा असा सहा तालुक्यांतील डोंगररांगेतील घनदाट जंगलाचा राहणार आहे. यात प्रामुख्याने हत्ती, गवा, बिबट्या, वाघ या प्राण्यांचा समावेश आहे. घोषित झालेल्या राखीव जंगलाचा ताबा सध्या वनविभागाकडेच राहणार असून, वन्यजीव प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यावेळेस हस्तांतर होणार आहे.