शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यातील मलमिश्रित पाणी थेट पंचगंगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:23 IST

* नगरपालिकेने बांध दुरुस्त करावा कुरुंदवाड : इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध गेल्या काही दिवसांपासून फुटला आहे. त्यामुळे मलमिश्रित सांडपाणी ...

* नगरपालिकेने बांध दुरुस्त करावा

कुरुंदवाड : इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध गेल्या काही दिवसांपासून फुटला आहे. त्यामुळे मलमिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीला मिसळत असल्याने पंचगंगा नदी दूषित बनले आहे. हा बांध नगरपालिकेने त्वरित दुरुस्त करून थेट जाणारे पाणी अडविणे गरजेचे आहे.

इचलकरंजी शहरातील सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जात असल्याने पंचगंगा नदी वारंवार दूषित होत आहे. याचा फटका शिरोळ तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. डिसेंबर महिन्यात दूषित पाणी आल्याने संतप्त स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांच्यासह स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दूषित पाण्याचा पंचनामा करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावरच दोरखंडाने बांधून घातले होते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न विधानसभेत गाजला होता. अधिकाऱ्यांना बांधून घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य सचिवांनी नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत काळ्या ओढ्यावर ठिकठिकाणी तीन बांध घालून थेट जाणारे पाणी अडविण्याचे आदेश दिले होते.

त्यावेळी नगरपालिकेने काळ्या ओढ्यात वाळूची पोती टाकून दोन बांध घातले होते. गेल्या काही दिवसांपासून ओढ्यावरील एक बांध फुटला आहे. शिवाय ओढ्यावरील मलशुद्धीकरण केंद्र (सी ई टी पी प्रकल्प) बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने शहरातील मलयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सीईटीपी प्रकल्प त्वरित सुरू करण्याबरोबरच ओढ्यातील फुटलेला बांध दुरुस्त केल्यास नदी प्रदूषण काहीअंशी कमी होऊ शकते. त्यासाठी नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष घालण्याची गरज आहे.

कोट - प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान सचिव यांनी इचलकरंजी नगरपालिकेला काळ्या ओढ्यावर ठिकठिकाणी तीन बांध घालण्याचे आदेश दिले होते. नगरपालिकेने दोनच बांध घातले आहेत. शिवाय एक बांध गेल्या आठ दिवसांपासून फुटला आहे. तसेच सीईटीपी प्रकल्प बंद असल्याने सांडपाणी थेट नदीत मिसळून नदी दूषित होत आहे. पालिकेने फुटलेला बांध दुरुस्त करावा. तसेच मलशुद्धीकरण प्रकल्प सुरू होईपर्यंत सांडपाणी टँकरने उचलून त्याची इतरत्र विल्हेवाट लावावी.

- बंडू पाटील, स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष

फोटो - १६०४२०२१-जेएवाय-०५

फोटो - इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध फुटल्याने मलयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.