शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यातील मलमिश्रित पाणी थेट पंचगंगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:23 IST

* नगरपालिकेने बांध दुरुस्त करावा कुरुंदवाड : इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध गेल्या काही दिवसांपासून फुटला आहे. त्यामुळे मलमिश्रित सांडपाणी ...

* नगरपालिकेने बांध दुरुस्त करावा

कुरुंदवाड : इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध गेल्या काही दिवसांपासून फुटला आहे. त्यामुळे मलमिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीला मिसळत असल्याने पंचगंगा नदी दूषित बनले आहे. हा बांध नगरपालिकेने त्वरित दुरुस्त करून थेट जाणारे पाणी अडविणे गरजेचे आहे.

इचलकरंजी शहरातील सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जात असल्याने पंचगंगा नदी वारंवार दूषित होत आहे. याचा फटका शिरोळ तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. डिसेंबर महिन्यात दूषित पाणी आल्याने संतप्त स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांच्यासह स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दूषित पाण्याचा पंचनामा करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावरच दोरखंडाने बांधून घातले होते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न विधानसभेत गाजला होता. अधिकाऱ्यांना बांधून घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य सचिवांनी नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत काळ्या ओढ्यावर ठिकठिकाणी तीन बांध घालून थेट जाणारे पाणी अडविण्याचे आदेश दिले होते.

त्यावेळी नगरपालिकेने काळ्या ओढ्यात वाळूची पोती टाकून दोन बांध घातले होते. गेल्या काही दिवसांपासून ओढ्यावरील एक बांध फुटला आहे. शिवाय ओढ्यावरील मलशुद्धीकरण केंद्र (सी ई टी पी प्रकल्प) बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने शहरातील मलयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सीईटीपी प्रकल्प त्वरित सुरू करण्याबरोबरच ओढ्यातील फुटलेला बांध दुरुस्त केल्यास नदी प्रदूषण काहीअंशी कमी होऊ शकते. त्यासाठी नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष घालण्याची गरज आहे.

कोट - प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान सचिव यांनी इचलकरंजी नगरपालिकेला काळ्या ओढ्यावर ठिकठिकाणी तीन बांध घालण्याचे आदेश दिले होते. नगरपालिकेने दोनच बांध घातले आहेत. शिवाय एक बांध गेल्या आठ दिवसांपासून फुटला आहे. तसेच सीईटीपी प्रकल्प बंद असल्याने सांडपाणी थेट नदीत मिसळून नदी दूषित होत आहे. पालिकेने फुटलेला बांध दुरुस्त करावा. तसेच मलशुद्धीकरण प्रकल्प सुरू होईपर्यंत सांडपाणी टँकरने उचलून त्याची इतरत्र विल्हेवाट लावावी.

- बंडू पाटील, स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष

फोटो - १६०४२०२१-जेएवाय-०५

फोटो - इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध फुटल्याने मलयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.