शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

पर्वताचा कडा कोसळला... आणि काळजाचा ठोका चुकला!

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

नेपाळमधील थरकाप : गिर्यारोहणासाठी गेलेले सांगलीचे चौघे सुखरूप परतले

अंजर अथणीकर / सांगली गिर्यारोहणाचा आनंद घेत असतानाच अचानक पर्वत हलू लागला... काही कळायच्या आत एक मोठा बर्फाचा कडा विजेच्या कडकडाटासारखा आवाज करीत कोसळला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला... गाईडनेच भूकंप झाल्याचे सांगितले आणि आम्ही सर्वांनी जीव मुठीत धरून परतीचा मार्ग धरला... असे अनुभव शनिवारी दुपारी नेपाळहून सांगलीला परतलेले डॉ. सचिन उदगावे यांनी सांगितले. १५ एप्रिलरोजी सांगलीहून डॉ. उदगावे, अमोल पाटील, स्वप्नील कुंभार व त्यांच्या पत्नी मानसी कुंभार हे चौघे एव्हरेस्टवर ट्रेकिंगसाठी गेले होते. एव्हरेस्टच्या दुसऱ्या कॅम्पवर आरोग्य बिघडल्याने कुंभार दाम्पत्य मागे परतले. अमोल पाटील आणखी दोन कॅम्पवरून श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने तेही लोबोची येथील एका हॉटेलमध्ये उतरले. डॉ. उदगावे मात्र एव्हरेस्टच्या कॅम्पपर्यंत गेले. मित्र आजारी असल्यामुळे त्यांनी परतीचा मार्ग वेगाने सुरु केला. चार तासाचे अंतर केवळ दीड तासात पार करून तुघला येथे ते आले. त्यानंतरचा अनुभव सांगताना डॉ. उदगावे म्हणाले की, येथे जगातील सर्वाच उंच स्मशानभूमी आहे. एव्हरेस्ट चढताना मृत्युमुखी पडलेल्यांना येथे पुरले जाते. याठिकाणी आलो असताना ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मला वाटले, मला चक्कर येत आहे. त्यानंतर जोरदार आवाज होऊन आम्ही चार तासापूर्वी सोडलेल्या कॅम्पवर बर्फाचा कडा कोसळला. भराभर चालत आल्यानेच मी आणि माझे सहकारी वाचलो, अन्यथा आमचे मृतदेहही सापडले नसते. देवाचे आभार मानून आम्ही परत फिरलो. मित्रांची काळजी वाटू लागली. अमोल पाटील हे ज्या हॉटेलमधून पाच तासांपूर्वी जेवण करून बाहेर पडले होते, ते हॉटेल पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. शेवटी त्याच्याशी व्हॉटस् अ‍ॅपवरून संपर्क झाल्याने खूप मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवसाचा भूकंप मात्र पूर्वकल्पना देऊन झाला होता. यावेळी आम्ही मोकळ्या मैदानात होतो. आमच्या ‘त्या’ चार दिवसात जवळपास शंभरहून अधिक भूकंप झाले. आम्ही चौघेही लोबोची येथे भेटलो. त्यानंतर परतण्यासाठी खूपच त्रास झाला. तरीही भूकंपाच्या इतक्या मोठ्या संकटातून सर्वांचे प्राण वाचल्याचे मोठे समाधान होते. त्यामुळे हे अनुभव घेऊन आम्ही सांगलीला परतलो. चार तासांपूर्वी सोडलेले हॉटेल कोसळले एव्हरेस्टवर गिर्यारोहणासाठी सांगलीचे अमोल पाटील सहकाऱ्यांसमवेत गेले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ते एव्हरेस्टची मोहीम मध्येच सोडून परतले. परतीच्यावेळी रात्र झाल्याने त्यांनी फेरीच्या गावातील ‘हिमालयीन’ या हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी उठून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. सकाळी अकराच्या सुमारास भूकंप झाला आणि चार तासांपूर्वी सोडलेले हिमालयीन हॉटेल पूर्णपणे भुईसपाट झाले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी, दहा ते बाराजण गंभीर जखमी झाले. डॉ. उदगावे या ठिकाणी पोहोचले. याच ठिकाणी त्यांना अमोल पाटील येथून निघून गेल्याचे कळाले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.