शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पर्वताचा कडा कोसळला... आणि काळजाचा ठोका चुकला!

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

नेपाळमधील थरकाप : गिर्यारोहणासाठी गेलेले सांगलीचे चौघे सुखरूप परतले

अंजर अथणीकर / सांगली गिर्यारोहणाचा आनंद घेत असतानाच अचानक पर्वत हलू लागला... काही कळायच्या आत एक मोठा बर्फाचा कडा विजेच्या कडकडाटासारखा आवाज करीत कोसळला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला... गाईडनेच भूकंप झाल्याचे सांगितले आणि आम्ही सर्वांनी जीव मुठीत धरून परतीचा मार्ग धरला... असे अनुभव शनिवारी दुपारी नेपाळहून सांगलीला परतलेले डॉ. सचिन उदगावे यांनी सांगितले. १५ एप्रिलरोजी सांगलीहून डॉ. उदगावे, अमोल पाटील, स्वप्नील कुंभार व त्यांच्या पत्नी मानसी कुंभार हे चौघे एव्हरेस्टवर ट्रेकिंगसाठी गेले होते. एव्हरेस्टच्या दुसऱ्या कॅम्पवर आरोग्य बिघडल्याने कुंभार दाम्पत्य मागे परतले. अमोल पाटील आणखी दोन कॅम्पवरून श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने तेही लोबोची येथील एका हॉटेलमध्ये उतरले. डॉ. उदगावे मात्र एव्हरेस्टच्या कॅम्पपर्यंत गेले. मित्र आजारी असल्यामुळे त्यांनी परतीचा मार्ग वेगाने सुरु केला. चार तासाचे अंतर केवळ दीड तासात पार करून तुघला येथे ते आले. त्यानंतरचा अनुभव सांगताना डॉ. उदगावे म्हणाले की, येथे जगातील सर्वाच उंच स्मशानभूमी आहे. एव्हरेस्ट चढताना मृत्युमुखी पडलेल्यांना येथे पुरले जाते. याठिकाणी आलो असताना ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मला वाटले, मला चक्कर येत आहे. त्यानंतर जोरदार आवाज होऊन आम्ही चार तासापूर्वी सोडलेल्या कॅम्पवर बर्फाचा कडा कोसळला. भराभर चालत आल्यानेच मी आणि माझे सहकारी वाचलो, अन्यथा आमचे मृतदेहही सापडले नसते. देवाचे आभार मानून आम्ही परत फिरलो. मित्रांची काळजी वाटू लागली. अमोल पाटील हे ज्या हॉटेलमधून पाच तासांपूर्वी जेवण करून बाहेर पडले होते, ते हॉटेल पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. शेवटी त्याच्याशी व्हॉटस् अ‍ॅपवरून संपर्क झाल्याने खूप मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवसाचा भूकंप मात्र पूर्वकल्पना देऊन झाला होता. यावेळी आम्ही मोकळ्या मैदानात होतो. आमच्या ‘त्या’ चार दिवसात जवळपास शंभरहून अधिक भूकंप झाले. आम्ही चौघेही लोबोची येथे भेटलो. त्यानंतर परतण्यासाठी खूपच त्रास झाला. तरीही भूकंपाच्या इतक्या मोठ्या संकटातून सर्वांचे प्राण वाचल्याचे मोठे समाधान होते. त्यामुळे हे अनुभव घेऊन आम्ही सांगलीला परतलो. चार तासांपूर्वी सोडलेले हॉटेल कोसळले एव्हरेस्टवर गिर्यारोहणासाठी सांगलीचे अमोल पाटील सहकाऱ्यांसमवेत गेले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ते एव्हरेस्टची मोहीम मध्येच सोडून परतले. परतीच्यावेळी रात्र झाल्याने त्यांनी फेरीच्या गावातील ‘हिमालयीन’ या हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी उठून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. सकाळी अकराच्या सुमारास भूकंप झाला आणि चार तासांपूर्वी सोडलेले हिमालयीन हॉटेल पूर्णपणे भुईसपाट झाले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी, दहा ते बाराजण गंभीर जखमी झाले. डॉ. उदगावे या ठिकाणी पोहोचले. याच ठिकाणी त्यांना अमोल पाटील येथून निघून गेल्याचे कळाले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.