शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट

By admin | Updated: November 19, 2014 23:13 IST

मनमानी भाडे : प्रवास रद्दचे पैसे परत देण्यास नकार

घन:शाम कुंभार- यड्राव -प्रवासासाठी एस.टी., रेल्वेपेक्षा खासगी प्रवासास सध्या प्राधान्य मिळत आहे. याचा गैरफायदा घेत मनमानी प्रवास भाडे, प्रवास रद्दचे पैसे परत देण्यास नकार, पुरेशा सुविधा उपलब्ध नसणे, आदींमुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे, तर बोटांवर मोजणारे प्रवासी ग्राहक न्यायालयात गेल्याने त्यांना नुकसानभरपाई व प्रवासी कंपन्यांना दंड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रवासी व ट्रॅव्हल्स कंपनी यांच्यात योग्य समन्वय झाल्यास उद्योगवाढीस पूरक ठरणार आहे. याची दखल घेणे गरजेचे आहे.इचलकरंजी परिसरात चार-पाच ट्रॅव्हल्स एजन्सी कार्यरत आहेत. त्यापैकी एका एजन्सीमधून पुणे येथे जाण्यासाठी एका महिलेने पैसे भरून तिकीट काढले होते; परंतु मुलगा अचानक आजारी पडल्याने बस सुटण्याच्या आधी सुमारे तीन तास प्रवास रद्द करण्याची विनंती एजन्सीकडे केली. त्यावेळी कंपनीकडून बदली प्रवासी मिळाले, तर तिकीट रद्द केले जाईल, असे सांगितले व तिकीट रद्द करण्यास नकार दिला. पुन्हा एजन्सीबरोबर संपर्क साधला असता बसमधील सीट रिकामी गेली. बदली प्रवासी मिळाले नसल्याने प्रवासाचे पैसे परत देण्यास नकार दिला.इचलकरंजी येथून शिर्डी, नगर, पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह पंधरा ते वीस प्रमुख शहरांमध्ये सहा प्रवासी बसेसची वाहतूक होते; परंतु संबंधित एजन्सीच्या कार्यालयात कोणत्या शहरासाठी किती प्रवास भाडे याचा तक्ता लावला नाही. तेथील व्यक्ती सांगेल ते भाडे असते. प्रवासाची गरज असल्याने हा नाहक प्रकार प्रवाशांना सहन करावा लागतो.आराम बसमध्ये कोणतीही सीट रिकामी ठेवून बसचालक वाहतूक करत नाहीत, तर चालक केबीनमध्येही प्रवासी घेऊन बेकायदा वाहतूक होते. अशा परिस्थितीत संबंधित कंपनी इचलकरंजी ते पुणे या प्रवासात मोकळ्या सीटवर प्रवासी न घेता जाईल कशी? त्यामुळे प्रवास करणाऱ्यांचेही भाडे व प्रवास रद्द करणाऱ्यांचेही भाडे कंपनीस मिळते. ही एक प्रकारची लूटच आहे. बऱ्याच प्रवाशांना अशा प्रकारचा नाहक त्रास होतो; परंतु सजग प्रवासी ग्राहक न्यायालयाचे दार ठोठावतात. त्यामुळे प्रवाशांना सोयी-सुविधा न पुरविलेल्या प्रवासी कंपन्यांना दंड होऊन प्रवाशांना नुकसानभरपाई मिळाल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. प्रवाशांनी कोणत्या कारणास्तव व कोणत्या परिस्थितीत प्रवास रद्द केला, हे सहानुभूतीपूर्वक पाहणे, तसेच योग्य प्रवास भाडे (सतत न बदलता) घेतल्यास प्रवाशांना सोयीचे व ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या उद्योगवाढीस पूरक ठरेल.