शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
2
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
3
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
4
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
5
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
6
सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
7
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
8
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
9
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
10
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
11
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
12
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
13
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
14
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
15
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
16
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
17
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
18
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
19
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
20
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

आळवेचा पर्यावरणपूरक मातीचा गणपती

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

शंभर वर्षांची परंपरा : गौरी-शंकराच्या मुखवट्यांसाठी अळूच्या पानांचा वापर

किरण मस्कर- क ोतोली --कासारी नदीच्या काठावरील दोनशे उंबऱ्याचे आळवे (ता. पन्हाळा) गाव. या गावाने आजच्या झगमगटाच्या गणेशोत्सवात आपली पर्र्यावरणपूरक गणेशोत्सवाची १०० वर्षांची परंपरा जपली आहे. गावातील प्रत्येक घरात तसेच सर्व ११ तरुण मंडळे गेली १०० वर्षे केवळ मातीच्या (कोणत्याही रंग व शाडू किंवा प्लास्टर विरहित) मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत. गणेशोत्सवाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असले तरी सध्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टर, केमिकल्सयुक्त रंग तसेच निर्माल्य यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटनासह प्रशासनानेही याकडे लक्ष वेधत जनजागृतीसाठी कंबर कसली आहे. मात्र, आळवे गाव मात्र या साऱ्या प्रदूषणापासून कोसो दूर आहे. कारण येथील गणेशमूर्ती पूर्णपणे प्रदूषणविरहित आहेत. येथील कुंभार समाज गेली शंभर वर्षे गावातीलच मातीपासून एक फुटापासून ते पाच ते सात फुटांपर्यंत गणेशमूर्ती तयार करतात. प्रत्येक घरात तसेच गावातील ११ तरुण मंडळांत या मूर्तींची मोठ्या भक्तीभावाने व धुमधडाक्यात प्रतिष्ठापना केली जाते. फक्त मातीपासून तयार केलेल्या या मूर्तीमुळे गाव प्रदूषणमुक्त राहते. तसेच गौरी-शंकराचेही मुखवटे कुठेही गावात पाहावयास मिळत नाहीत. मुखवट्यांऐवजी अळूचे पान बांधून त्यावर पांढऱ्या रंगाने चेहऱ्याचे रूप दिले जाते व गौराई-शंकराचे पूजन केले जाते. या मातीच्या गणपतीच्या आदर्शवत परंपरेमुळे आळवे गाव गेली कित्येक वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे.