शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

आळवेचा पर्यावरणपूरक मातीचा गणपती

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

शंभर वर्षांची परंपरा : गौरी-शंकराच्या मुखवट्यांसाठी अळूच्या पानांचा वापर

किरण मस्कर- क ोतोली --कासारी नदीच्या काठावरील दोनशे उंबऱ्याचे आळवे (ता. पन्हाळा) गाव. या गावाने आजच्या झगमगटाच्या गणेशोत्सवात आपली पर्र्यावरणपूरक गणेशोत्सवाची १०० वर्षांची परंपरा जपली आहे. गावातील प्रत्येक घरात तसेच सर्व ११ तरुण मंडळे गेली १०० वर्षे केवळ मातीच्या (कोणत्याही रंग व शाडू किंवा प्लास्टर विरहित) मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत. गणेशोत्सवाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असले तरी सध्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टर, केमिकल्सयुक्त रंग तसेच निर्माल्य यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटनासह प्रशासनानेही याकडे लक्ष वेधत जनजागृतीसाठी कंबर कसली आहे. मात्र, आळवे गाव मात्र या साऱ्या प्रदूषणापासून कोसो दूर आहे. कारण येथील गणेशमूर्ती पूर्णपणे प्रदूषणविरहित आहेत. येथील कुंभार समाज गेली शंभर वर्षे गावातीलच मातीपासून एक फुटापासून ते पाच ते सात फुटांपर्यंत गणेशमूर्ती तयार करतात. प्रत्येक घरात तसेच गावातील ११ तरुण मंडळांत या मूर्तींची मोठ्या भक्तीभावाने व धुमधडाक्यात प्रतिष्ठापना केली जाते. फक्त मातीपासून तयार केलेल्या या मूर्तीमुळे गाव प्रदूषणमुक्त राहते. तसेच गौरी-शंकराचेही मुखवटे कुठेही गावात पाहावयास मिळत नाहीत. मुखवट्यांऐवजी अळूचे पान बांधून त्यावर पांढऱ्या रंगाने चेहऱ्याचे रूप दिले जाते व गौराई-शंकराचे पूजन केले जाते. या मातीच्या गणपतीच्या आदर्शवत परंपरेमुळे आळवे गाव गेली कित्येक वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे.