शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

ई-कचऱ्याबाबत जागरुकता गरजेची

By admin | Updated: January 14, 2016 00:21 IST

अश्विनी रामाणे : रोटरी क्लब आॅफ करवीर व चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन अभियान’

कोल्हापूर : आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वत्र इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि उपकरणांचा वापर वाढला आहे; पण त्या खराब झाल्यानंतर आपण सर्वजण नेहमीच्या ओल्या कचऱ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कचरा टाकून देतो. त्यामुळे मानवी शरीरारवर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी सर्व समाजाने ई-कचऱ्याबाबत स्वयंस्फूर्तीने जागरूक व्हावे, असे प्रतिपादन महापौर अश्विनी रामाणे यांनी केले. रोटरी क्लब आॅफ करवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधवारी सकाळी संत गाडगेबाबा पुतळा, जोतिबा रोड येथे आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन अभियान’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मुख्य अधिकारी एन. एच. शिवांगे होते. रामाणे म्हणाल्या, आधुनिक जीवनशैलीमुळे सगळीकडे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती व खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही कालावधीनंतर या वस्तू खराब होतात. मग आपण सर्वजण हा कचरा नेहमीच्या कचऱ्यामध्ये टाकून देतो. या वस्तूंचे कचऱ्यात विघटन होत नसल्याने त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांनी या ई-कचरा संकलन अभियानात सहभागी होऊन शहराला प्रदूषणमुक्त करावे. रोटरी क्लब आॅफ करवीरचा हा उपक्रम स्तुत्य आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मुख्य अधिकारी एन. एच. शिवांगे म्हणाले, मोबाईल, टी.व्ही., विविध घरगुती वापरांकरिता लागणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत. पण, ती खराब झाल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावणे अवघड होते. हा ई-कचरा नेहमीच्या कचऱ्यात सहज मिसळत नाही. त्याचे विघटन होत नाही. म्हणून हा ई-कचरा नेहमीप्रमाणे कचऱ्यात न टाकता तो पुरून नष्ट करावा. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. रोटरी क्लब आॅफ करवीर चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक असा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे अशा कचऱ्याचे संकलन करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ई-कचरा अभियान अध्यक्ष एस. एन. पाटील यांनी संकल्पना स्पष्ट केली. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी जयंत कदम, रोटरी क्लब आॅफ करवीरचे निशिकांत नलवडे, शंकर शिंदे, हरिश पटेल, मच्छिंद्र चौगुले, प्रमोद चौगुले, मुख्याध्यापिका प्रेरणा जाधव यांच्यासह इंदुमती गर्ल्स हायस्कूल व इंदिरा गांधी विद्यानिकेतनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.