शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डवरी समाजाचा अकराव्या दिवशी ठिय्या

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

धरणे आंदोलन : अतिक्रमण काढण्यात कायदेशीर अडचणी

कोल्हापूर : सायबर चौकाजवळील डवरी समाजाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यामुळे बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अतिक्रमण काढून डवरी समाजाला जागेचा ताबा देणे शक्य होण्याची चिन्हे नाही. त्यामुळे अकरा कुटुंबीयांसमवेत सुरू असलेले बेमुदत धरणे सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. अतिक्रमण हटवून जागेचा ताबा दिल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार केलेल्या डवरी समाजातील १०० हून अधिक कुटुंबांनी आपला संसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला आहे. गेले दहा दिवस ही सर्व कुटुंबे येथे ठिय्या मारून आहेत. बहुजन परिवर्तन पक्षप्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. या धरणे आंदोलनाबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन डवरी समाजाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली होती. त्यावेळी करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्याशी चर्चा करून १२ फेब्रुवारीला या जागेतील अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी चव्हाण तसेच खरमाटे यांची या अनुषंगाने चर्चा झाली. त्यावेळी ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे, त्या सातजणांपैकी चारजणांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळविली असल्याची बाब समोर आली. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल, असे डॉ. खरमाटे यांनी सांगितले. सायबर चौकाजवळील सर्व्हे क्रमांक ४८७ ब येथील अठरा गुंठे जागा यशवंतनगर गृहनिर्माण संस्थेला सरकारने दिली आहे. त्यावेळी त्या जागेवर काही लोकांनी आधीच अतिक्रमण केले होते. ही जागा मोकळी करून द्यावी असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना १९८७ मध्ये दिले होते; परंतु तेव्हापासून कोणीही दखल घेतली नाही. परंतु, आता समाजालाच तेथून उठविण्याचा घाट घातला जात असल्याची आंदोलकांची तक्रार आहे.