शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

डवरी समाजाचा अकराव्या दिवशी ठिय्या

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

धरणे आंदोलन : अतिक्रमण काढण्यात कायदेशीर अडचणी

कोल्हापूर : सायबर चौकाजवळील डवरी समाजाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यामुळे बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अतिक्रमण काढून डवरी समाजाला जागेचा ताबा देणे शक्य होण्याची चिन्हे नाही. त्यामुळे अकरा कुटुंबीयांसमवेत सुरू असलेले बेमुदत धरणे सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. अतिक्रमण हटवून जागेचा ताबा दिल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार केलेल्या डवरी समाजातील १०० हून अधिक कुटुंबांनी आपला संसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला आहे. गेले दहा दिवस ही सर्व कुटुंबे येथे ठिय्या मारून आहेत. बहुजन परिवर्तन पक्षप्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. या धरणे आंदोलनाबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन डवरी समाजाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली होती. त्यावेळी करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्याशी चर्चा करून १२ फेब्रुवारीला या जागेतील अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी चव्हाण तसेच खरमाटे यांची या अनुषंगाने चर्चा झाली. त्यावेळी ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे, त्या सातजणांपैकी चारजणांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळविली असल्याची बाब समोर आली. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल, असे डॉ. खरमाटे यांनी सांगितले. सायबर चौकाजवळील सर्व्हे क्रमांक ४८७ ब येथील अठरा गुंठे जागा यशवंतनगर गृहनिर्माण संस्थेला सरकारने दिली आहे. त्यावेळी त्या जागेवर काही लोकांनी आधीच अतिक्रमण केले होते. ही जागा मोकळी करून द्यावी असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना १९८७ मध्ये दिले होते; परंतु तेव्हापासून कोणीही दखल घेतली नाही. परंतु, आता समाजालाच तेथून उठविण्याचा घाट घातला जात असल्याची आंदोलकांची तक्रार आहे.