शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक आणि नारळी पौर्णिमेमुळे एस. टी.ला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST

कोल्हापूर : अनलॉक झाल्याने बऱ्यापैकी व्यवहार सुरु झाले आहेत. आता तोंडावर नारळी पाैर्णिमा आल्याने एस. टी.ने हा हंगाम ‘कॅच’ ...

कोल्हापूर : अनलॉक झाल्याने बऱ्यापैकी व्यवहार सुरु झाले आहेत. आता तोंडावर नारळी पाैर्णिमा आल्याने एस. टी.ने हा हंगाम ‘कॅच’ करण्यासाठी तयारी केली आहे. जिल्ह्यातील १२ आगारांतून ४० जादा गाड्या सोडण्याची तयारी महामंडळाने केली आहे. ज्योतिबा रोड सुरु झाल्यास या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

कोरोनामुळे एस. टी. प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. पण सोमवारपासून दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने बऱ्यापैकी व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. यामुळे लोकांचे येणे-जाणेही वाढले आहे. लोक कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी सेवांनीदेखील गती घेतली आहे.

एस. टी.मध्ये ५० टक्के प्रवासी वाहतुकीचे निर्बंध असल्याने त्याचे पालन करुन निम्म्या प्रवासी संख्येवर गाड्या धावत आहेत. एका एस. टी.मध्ये २५ प्रवासी बसवले जात आहे. मास्क आणि सॅनिटायझरची सक्ती मात्र कायम आहे.

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणासाठी ये-जा वाढणार आहे. अजून मंदिरे बंद असली तरी बाहेरुन दर्शन घेण्याची लोकांची मानसिकता आहे. जिल्ह्यात नारळी पौर्णिमेला नृसिंहवाडी आणि गगनबावड्याला जाणाऱ्या प्रवासी भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच या मार्गांवर जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

प्रवाशांची गर्दी

अनलॉक झाल्यानंतर एस. टी.च्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज ५२५ बसेसच्या पंधराशेच्यावर फेऱ्या होत असल्याने बसस्थानके पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. रोज ४० हजारांवर प्रवासी एस. टी.मधून प्रवास करत आहेत.

या मार्गांवर वाढणार फेऱ्या

कोल्हापूर ते इचलकरंजी

कोल्हापूर ते नृसिंहवाडी

कोल्हापूर ते सांगली मिरज

कोल्हापूर ते गगनबावडा

कोल्हापूर ते ज्योतिबा

कोल्हापूर ते सोलापूर

कोल्हापूर ते पुणे

प्रतिक्रिया

गगनबावडा व नृसिंहवाडीला जाणाऱ्या प्रवासी भाविकांची संख्या जास्त असल्यानेच या मार्गांवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची सर्वप्रकारची काळजी महामंडळाकडून घेतली जात आहे. जशी मागणी वाढेल तशी फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे.

- शिवराज जाधव, वाहतूक अधिकारी, कोल्हापूर आगार