शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

अनलॉक आणि नारळी पौर्णिमेमुळे एस. टी.ला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST

कोल्हापूर : अनलॉक झाल्याने बऱ्यापैकी व्यवहार सुरु झाले आहेत. आता तोंडावर नारळी पाैर्णिमा आल्याने एस. टी.ने हा हंगाम ‘कॅच’ ...

कोल्हापूर : अनलॉक झाल्याने बऱ्यापैकी व्यवहार सुरु झाले आहेत. आता तोंडावर नारळी पाैर्णिमा आल्याने एस. टी.ने हा हंगाम ‘कॅच’ करण्यासाठी तयारी केली आहे. जिल्ह्यातील १२ आगारांतून ४० जादा गाड्या सोडण्याची तयारी महामंडळाने केली आहे. ज्योतिबा रोड सुरु झाल्यास या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

कोरोनामुळे एस. टी. प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. पण सोमवारपासून दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने बऱ्यापैकी व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. यामुळे लोकांचे येणे-जाणेही वाढले आहे. लोक कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी सेवांनीदेखील गती घेतली आहे.

एस. टी.मध्ये ५० टक्के प्रवासी वाहतुकीचे निर्बंध असल्याने त्याचे पालन करुन निम्म्या प्रवासी संख्येवर गाड्या धावत आहेत. एका एस. टी.मध्ये २५ प्रवासी बसवले जात आहे. मास्क आणि सॅनिटायझरची सक्ती मात्र कायम आहे.

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणासाठी ये-जा वाढणार आहे. अजून मंदिरे बंद असली तरी बाहेरुन दर्शन घेण्याची लोकांची मानसिकता आहे. जिल्ह्यात नारळी पौर्णिमेला नृसिंहवाडी आणि गगनबावड्याला जाणाऱ्या प्रवासी भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच या मार्गांवर जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

प्रवाशांची गर्दी

अनलॉक झाल्यानंतर एस. टी.च्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज ५२५ बसेसच्या पंधराशेच्यावर फेऱ्या होत असल्याने बसस्थानके पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. रोज ४० हजारांवर प्रवासी एस. टी.मधून प्रवास करत आहेत.

या मार्गांवर वाढणार फेऱ्या

कोल्हापूर ते इचलकरंजी

कोल्हापूर ते नृसिंहवाडी

कोल्हापूर ते सांगली मिरज

कोल्हापूर ते गगनबावडा

कोल्हापूर ते ज्योतिबा

कोल्हापूर ते सोलापूर

कोल्हापूर ते पुणे

प्रतिक्रिया

गगनबावडा व नृसिंहवाडीला जाणाऱ्या प्रवासी भाविकांची संख्या जास्त असल्यानेच या मार्गांवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची सर्वप्रकारची काळजी महामंडळाकडून घेतली जात आहे. जशी मागणी वाढेल तशी फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे.

- शिवराज जाधव, वाहतूक अधिकारी, कोल्हापूर आगार