शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 11, 2017 00:54 IST

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आतापर्यंत ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी गेल्या आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अद्याप नसले तरी सांगली व सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी पट्ट्यात मात्र हे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक आढाव्यानुसार सांगली व सातारा जिल्ह्णांत सुमारे ३६०० हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बळिराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्णात यंदा ‘रोहिणी’ नक्षत्र काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप पेरणीस गती आली; पण ‘मृग’ नक्षत्र कोरडे गेल्याने काही ठिकाणी उगवणी झाल्या नव्हत्या. ‘आर्द्रा’ नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने या काळात काही भागातील प्रलंबित पेरण्या पूर्ण झाल्या. पिकांची उगवणही चांगली झाली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार हेक्टरवर (५७ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यातील भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या असून भाताच्या १ लाख ८ हजारपैकी ६० हजार हेक्टर तर नागलीच्या २१ हजारांपैकी केवळ १५०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी दुबार पेरणीसारखे संकट येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व व त्यानंतरच्या काळात पाऊस जोरदार झाल्याने मशागत लवकर सुरू होऊन गतवर्षीच्या तुलनेत पेरण्यांना गती मिळाली. २ लाख ७८ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर (४७ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १५ दिवसांत २९३ मिलीमीटर (५० टक्के) पाऊस झाल्याने खरिपाची उगवण चांगली झाली आहे. महाबळेश्वरमुळे जिल्ह्याची पावसाची टक्केवारी वाढत असली तरी यंदा विशेषत: माण, खटाव, कोरेगावचा दुष्काळी पट्टा या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ४० टक्क्यांपेक्षा कमीच पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरण्या चांगल्या झाल्या आहेत पण गेले दहा दिवस आकाश कोरडे पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. माण, खटाव तालुक्यात खरीप ज्वारी व बाजरीचे क्षेत्र येथे जास्त असून पावसाअभावी पेरण्या थांबल्या आहेत. ज्या पिकांची उगवण झाली ती पाण्याअभावी करपू लागल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे आहे. सांगली जिल्ह्यात यंदा २ लाख ९१ हजारांपैकी १ लाख २९ हजार हेक्टरवर (४४ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. ‘आर्द्रा’ नक्षत्र काळात शिराळा, वाळवा, मिरज, जत, आटपाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने खरिपाची उगवणही झाली. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी दहा दिवसांत १०५ मिलीमीटर (२७ टक्के) पाऊस झाला आहे. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वच तालुक्यांतील पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून पलूस, तासगांव , आटपाडी ,खानापूर,कडेगाव तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. एकंदरीत पावसाने हुलकावणी दिल्याने तिन्ही जिल्ह्णांतील पिकांचा जीव गळ्यापर्यंत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्णात दुबार पेरणीचे अद्याप संकट नसले तरी भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या आहेत. सांगली व सातारा जिल्ह्णांत मात्र दुबार पेरणीचे संकट दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तिन्ही जिल्ह्णांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा सध्यातरी पुरेशा असल्याने पाणीटंचाईचे संकट फारसे दिसत नाही. उसावर किडीचा प्रादुर्भाव!कोल्हापूर विभागात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून ३ लाख ४ हजार हेक्टरवर ऊस आहे. अद्याप पाऊस चांगला असल्याने पिके जोमात असली तरी उघडिपीमुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीस पोषक असे वातावरण असल्याने माव्यासह तांबेऱ्याने उसाची पाने भरली आहेत. जिल्हा पेरणी हेक्टर पाऊस मिलीमीटर कोल्हापूर १ लाख ५१ हजार ३५०.९सांगली १ लाख २९ हजार १०५.६सातारा १ लाख ३२ हजार २९३.०