शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 11, 2017 00:54 IST

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आतापर्यंत ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी गेल्या आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अद्याप नसले तरी सांगली व सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी पट्ट्यात मात्र हे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक आढाव्यानुसार सांगली व सातारा जिल्ह्णांत सुमारे ३६०० हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बळिराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्णात यंदा ‘रोहिणी’ नक्षत्र काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप पेरणीस गती आली; पण ‘मृग’ नक्षत्र कोरडे गेल्याने काही ठिकाणी उगवणी झाल्या नव्हत्या. ‘आर्द्रा’ नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने या काळात काही भागातील प्रलंबित पेरण्या पूर्ण झाल्या. पिकांची उगवणही चांगली झाली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार हेक्टरवर (५७ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यातील भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या असून भाताच्या १ लाख ८ हजारपैकी ६० हजार हेक्टर तर नागलीच्या २१ हजारांपैकी केवळ १५०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी दुबार पेरणीसारखे संकट येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व व त्यानंतरच्या काळात पाऊस जोरदार झाल्याने मशागत लवकर सुरू होऊन गतवर्षीच्या तुलनेत पेरण्यांना गती मिळाली. २ लाख ७८ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर (४७ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १५ दिवसांत २९३ मिलीमीटर (५० टक्के) पाऊस झाल्याने खरिपाची उगवण चांगली झाली आहे. महाबळेश्वरमुळे जिल्ह्याची पावसाची टक्केवारी वाढत असली तरी यंदा विशेषत: माण, खटाव, कोरेगावचा दुष्काळी पट्टा या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ४० टक्क्यांपेक्षा कमीच पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरण्या चांगल्या झाल्या आहेत पण गेले दहा दिवस आकाश कोरडे पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. माण, खटाव तालुक्यात खरीप ज्वारी व बाजरीचे क्षेत्र येथे जास्त असून पावसाअभावी पेरण्या थांबल्या आहेत. ज्या पिकांची उगवण झाली ती पाण्याअभावी करपू लागल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे आहे. सांगली जिल्ह्यात यंदा २ लाख ९१ हजारांपैकी १ लाख २९ हजार हेक्टरवर (४४ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. ‘आर्द्रा’ नक्षत्र काळात शिराळा, वाळवा, मिरज, जत, आटपाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने खरिपाची उगवणही झाली. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी दहा दिवसांत १०५ मिलीमीटर (२७ टक्के) पाऊस झाला आहे. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वच तालुक्यांतील पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून पलूस, तासगांव , आटपाडी ,खानापूर,कडेगाव तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. एकंदरीत पावसाने हुलकावणी दिल्याने तिन्ही जिल्ह्णांतील पिकांचा जीव गळ्यापर्यंत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्णात दुबार पेरणीचे अद्याप संकट नसले तरी भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या आहेत. सांगली व सातारा जिल्ह्णांत मात्र दुबार पेरणीचे संकट दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तिन्ही जिल्ह्णांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा सध्यातरी पुरेशा असल्याने पाणीटंचाईचे संकट फारसे दिसत नाही. उसावर किडीचा प्रादुर्भाव!कोल्हापूर विभागात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून ३ लाख ४ हजार हेक्टरवर ऊस आहे. अद्याप पाऊस चांगला असल्याने पिके जोमात असली तरी उघडिपीमुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीस पोषक असे वातावरण असल्याने माव्यासह तांबेऱ्याने उसाची पाने भरली आहेत. जिल्हा पेरणी हेक्टर पाऊस मिलीमीटर कोल्हापूर १ लाख ५१ हजार ३५०.९सांगली १ लाख २९ हजार १०५.६सातारा १ लाख ३२ हजार २९३.०