शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वारणा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे शेतीचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

गेले दोन- तीन दिवस वारणा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खाली गेल्याने नदीवरील विद्युत मोटर पंप उघडे पडले आहेत. ...

गेले दोन- तीन दिवस वारणा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खाली गेल्याने नदीवरील विद्युत मोटर पंप उघडे पडले आहेत.

मार्च अखेरीस व मेच्या पहिल्या आठवड्यात असे दुसऱ्यांदा ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असताना वारणा नदीतील पाणीपातळी खालावून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंप उघडे पडले असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. साहजिकच शेतीस पाणी पुरवठा लांबल्याने जवळपास पंधरा दिवस पाण्याचा फेर लांबणार आहेत. याचा फटका माळभागच्या व मोठ्या पाणीपुरवठा योजनेखालील असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी भीती व्यक्त करीत असून, धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त असूनसुद्धा पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत कोडोली येथील वारणा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता धरणक्षेत्राजवळील पाॅवरहाऊसमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी पाणी सोडणे थांबविण्यात आले होते. एक-दोन दिवसांत पाणीपातळी पूर्ववत होईल असे सहायक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी सांगितले.

धरण क्षेत्रात पाणी साठा असतानाही केवळ पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारणा नदी काठावरील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने याविरोधात वरिष्ठांच्या दाद मागण्याचा इशारा जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील (किणीकर) यांनी दिला आहे.

..... फोटो ओळी. ऐन उन्हाळ्यात वारणा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे विद्युत मोटार पंप उघडे पडले आहेत.