शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

निधीअभावी सर्वच बचतगट ‘मॉल’ अर्धवट

By admin | Updated: May 1, 2017 00:38 IST

निधीअभावी सर्वच बचतगट ‘मॉल’ अर्धवट

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूरजिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी एकाही तालुक्यातील महिला बचतगट विक्री केंद्र (मॉल) सुरू नसून, सात तालुक्यांत केवळ इमारतींचे सांगाडे उभे करून ठेवले आहेत. योजना आखून दहा वर्षे झाली तरी निधीअभावी या विक्री केंद्रांची दुरवस्था सुरू असून, पाच महिने झाले निधीचा पाठविलेला प्रस्ताव धूळ खात मंत्रालयात पडून आहे. ही केवळ कोल्हापूर जिल्ह्याचीच अवस्था नसून संपूर्ण राज्यात बचतगट विक्री केंद्रे ेअशी अर्धवट अवस्थेत पडली आहेत. शहरातील एका बचतगट महोत्सवाचे उद्घाटन करताना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरातील महिला बचतगट विक्री केंद्रांसाठी ‘नियोजन’मधून निधी देण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिला बचतगट विक्री केंद्रांच्या कामांचा आढावा घेतला असता एकाही तालुक्यात इमारत पूर्ण नसल्याचे वास्तव समोर आले आहे. महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंसाठी राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याची योजना दहा वर्षांपूर्वी आखण्यात आली. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले. शानदार कार्यक्रम करून पायाखुदाई करण्यात आली. महिलांच्या सबलीकरणाबाबत भाषणेही झाली; परंतु २०१३/२०१४ ला कंत्राटदारांच्या कामाची मुदतही संपली. तरीही बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने अधिक निधीसाठीच्या प्रस्तावाला ‘केराची टोपली’ दाखविली गेल्याने इमारती उभ्या राहिल्या; परंतु तेथील अपुऱ्या कामांमुळे महिला बचतगटांचा बाजार काही भरविता येईना, अशी अवस्था निर्माण झाली आहे. या केंद्रांसाठी २०१०/२०११चे बांधकाम दर गृहीत धरून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. काम सुरू झाल्यानंतर २० टक्के जादा दराप्रमाणे प्रत्येक केंद्रासाठी दहा लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. दरम्यान, या केंद्रांच्या निधीवर जे व्याज जमा झाले आहे त्यातील ४३ लाख ८२ हजार रुपये या सात केंद्रांसाठी वापरण्यास मंजुरी मिळाली आहे. ६ जून २०१६ रोजी ग्रामविकास राज्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत पूर्ण होण्याच्या स्थितीत असलेली केंद्रे तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गारगोटी, करवीर, शाहूवाडी तालुक्यांत जागाच मिळेना कागल, कबनूर (ता. हातकणंगले), गडहिंग्लज, बाजारभोगाव (ता. पन्हाळा), आजरा, तुर्केवाडी (ता. चंदगड), गगनबावडा या सात ठिकाणी जागा मिळाल्यानुसार पन्नास लाखांच्या इमारती उभ्या राहिल्या; परंतु आतील फर्निचर आणि अनुषंगिक कामांसाठी निधी मिळालेला नाही. राधानगरी आणि शिरोळसाठी आता जागा मिळाली आहे. तसे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, गारगोटी, करवीर, शाहूवाडी या तीन तालुका विक्री केंद्रांना सुयोग्य जागा मिळाली नसल्याने या तालुक्यांचा प्रत्येकी ५८ लाखांचा निधी पडून आहे. अशी परस्परविरोधी अवस्था कोल्हापूर जिल्ह्यात दिसून येत आहे. इमारती लागल्या सडायलागेले तीन चार वर्षे या सात ठिकाणच्या इमारती उभ्या आहेत. मात्र, आतील कामे न झाल्याने पडून आहेत. येथे बचतगटांच्या मालाच्या विक्रीला अजूनही सुरुवात झालेली नाही; परंतु वापरच नसल्याने, खिडक्या नसल्याने, आहेत त्या खिडक्यांचा काचा फुटल्याने पावसाचे पाणी आत येऊन, वापर नसल्याने आता या इमारती उभ्या उभ्याच सडायला सुरुवात झाली आहे. शासनाच्या निधीची अशा पद्धतीने विल्हेवाट लागत असल्याचे चित्र समोर आहे. केसरकर गेले, भुसे आले पण निधी नाहीयाआधी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे या निधीबाबतची मागणी करण्यात आली, नंतर त्यांच्या जागी दादा भुसे मंत्री झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेत ते आल्यानंतर त्यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली. त्यांच्या कार्यालयात याबाबतचा प्रस्ताव आहे; मात्र निधी काही मंजूर झालेला नाही.