शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांसह पत्नीच्या अपंगत्वामुळे वृद्धाची दमछाक

By admin | Updated: August 10, 2015 21:11 IST

आमजाई व्हरवडे येथील कुटुंब : वयाच्या सत्तराव्या वर्षी कुटुंबाच्या अपंगत्वाचे ओझे अंगावर घेऊन हाकत आहेत संसाराचा गाडा

शिरोळ तालुका : दानोळी, उमळवाड, उदगावात स्वतंत्र पद भरण्याची गरजजयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या गावात गेल्या दहा वर्षांपासून पोलीसपाटील पदे रिक्त आहेत. कोथळी येथील एका पोलीसपाटलावर ६० हजार लोकसंख्येचा ताण असून दानोळी, उदगांव, उमळवाड गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची वारंवार मागणी होत आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.तालुक्यातील दानोळी, उदगांव, उमळवाड, कोथळी या चार गावांची लोकसंख्या सुमारे ६० हजारांपर्यंत आहे. राजकीय व सामाजिक घडामोडीत अग्रेसर असणाऱ्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे गोपनीय कामकाज पोलीसपाटलांमार्फत होत असते. तसेच गावातील छोटे-मोठे तंटे सोडविण्याचे काम पोलीस पाटील यांच्याकडे असते. मात्र, शासनाने पोलीस पाटील रिक्त जागा भरण्याच्या कामात दिरंगाई केली आहे.कोथळी येथील पोलीसपाटील उत्तम तिवडे यांच्यावर सध्या प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या लोकसंख्येची गावे नेमून दिली आहेत. त्यामध्ये दानोळी २० हजार, उदगाव २२ हजार, कोथळी १२ हजार, उमळवाड ८ हजार या गावांतील जबाबदारी त्यांच्यावर आहे. या चार गावांचे पोलीसपाटीलकी करताना त्यांची मोठी दमछाक होत आहे. शासनाकडून त्यांना एका कोथळी गावाचे मानधन मिळते व यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले उदगांव, दानोळी ही गावे मोठी असून या गावात स्वतंत्र पोलीसपाटील पद भरणे गरजेचे आहे. एकाच पोलीसपाटलांमुळे चार गावांतील छोटे-मोठे तंटे मिटविण्यासाठी भेटी देणे शक्य होत नाही. त्यामुळे गावामध्ये होणारे तंटे रौद्ररूपधारक केल्यानंतरच पोलीस ठाण्याला समजते. त्यामुळे गावातील शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील तरुणांना नोकरीच्या कामासाठी लागणारा वर्तणुकीचा दाखला, घातपाताची नोंद, पंचनामे व विविध दाखले यासाठी तीन गावांतील नागरिकांना कोथळी पोलीसपाटील तिवडे किंवा जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जावे लागते. (प्रतिनिधी) संवेदनशील गावेदानोळी हे संवेदनशील गाव असून याठिकाणी वारंवार वादावादीचे प्रकार घडत असतात, तर उदगाव येथेही वाळूच्या कारणामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या दोन गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. जयसिंगपूर पोलीस ठाणेअंतर्गत उदगाव व दानोळी येथे पोलीस चौकीची गरज आहे.