शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दोन मुलांसह पत्नीच्या अपंगत्वामुळे वृद्धाची दमछाक

By admin | Updated: August 10, 2015 21:11 IST

आमजाई व्हरवडे येथील कुटुंब : वयाच्या सत्तराव्या वर्षी कुटुंबाच्या अपंगत्वाचे ओझे अंगावर घेऊन हाकत आहेत संसाराचा गाडा

शिरोळ तालुका : दानोळी, उमळवाड, उदगावात स्वतंत्र पद भरण्याची गरजजयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या गावात गेल्या दहा वर्षांपासून पोलीसपाटील पदे रिक्त आहेत. कोथळी येथील एका पोलीसपाटलावर ६० हजार लोकसंख्येचा ताण असून दानोळी, उदगांव, उमळवाड गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची वारंवार मागणी होत आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.तालुक्यातील दानोळी, उदगांव, उमळवाड, कोथळी या चार गावांची लोकसंख्या सुमारे ६० हजारांपर्यंत आहे. राजकीय व सामाजिक घडामोडीत अग्रेसर असणाऱ्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे गोपनीय कामकाज पोलीसपाटलांमार्फत होत असते. तसेच गावातील छोटे-मोठे तंटे सोडविण्याचे काम पोलीस पाटील यांच्याकडे असते. मात्र, शासनाने पोलीस पाटील रिक्त जागा भरण्याच्या कामात दिरंगाई केली आहे.कोथळी येथील पोलीसपाटील उत्तम तिवडे यांच्यावर सध्या प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या लोकसंख्येची गावे नेमून दिली आहेत. त्यामध्ये दानोळी २० हजार, उदगाव २२ हजार, कोथळी १२ हजार, उमळवाड ८ हजार या गावांतील जबाबदारी त्यांच्यावर आहे. या चार गावांचे पोलीसपाटीलकी करताना त्यांची मोठी दमछाक होत आहे. शासनाकडून त्यांना एका कोथळी गावाचे मानधन मिळते व यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले उदगांव, दानोळी ही गावे मोठी असून या गावात स्वतंत्र पोलीसपाटील पद भरणे गरजेचे आहे. एकाच पोलीसपाटलांमुळे चार गावांतील छोटे-मोठे तंटे मिटविण्यासाठी भेटी देणे शक्य होत नाही. त्यामुळे गावामध्ये होणारे तंटे रौद्ररूपधारक केल्यानंतरच पोलीस ठाण्याला समजते. त्यामुळे गावातील शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील तरुणांना नोकरीच्या कामासाठी लागणारा वर्तणुकीचा दाखला, घातपाताची नोंद, पंचनामे व विविध दाखले यासाठी तीन गावांतील नागरिकांना कोथळी पोलीसपाटील तिवडे किंवा जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जावे लागते. (प्रतिनिधी) संवेदनशील गावेदानोळी हे संवेदनशील गाव असून याठिकाणी वारंवार वादावादीचे प्रकार घडत असतात, तर उदगाव येथेही वाळूच्या कारणामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या दोन गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. जयसिंगपूर पोलीस ठाणेअंतर्गत उदगाव व दानोळी येथे पोलीस चौकीची गरज आहे.