शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

दोन मुलांसह पत्नीच्या अपंगत्वामुळे वृद्धाची दमछाक

By admin | Updated: August 10, 2015 21:11 IST

आमजाई व्हरवडे येथील कुटुंब : वयाच्या सत्तराव्या वर्षी कुटुंबाच्या अपंगत्वाचे ओझे अंगावर घेऊन हाकत आहेत संसाराचा गाडा

शिरोळ तालुका : दानोळी, उमळवाड, उदगावात स्वतंत्र पद भरण्याची गरजजयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या गावात गेल्या दहा वर्षांपासून पोलीसपाटील पदे रिक्त आहेत. कोथळी येथील एका पोलीसपाटलावर ६० हजार लोकसंख्येचा ताण असून दानोळी, उदगांव, उमळवाड गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची वारंवार मागणी होत आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.तालुक्यातील दानोळी, उदगांव, उमळवाड, कोथळी या चार गावांची लोकसंख्या सुमारे ६० हजारांपर्यंत आहे. राजकीय व सामाजिक घडामोडीत अग्रेसर असणाऱ्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे गोपनीय कामकाज पोलीसपाटलांमार्फत होत असते. तसेच गावातील छोटे-मोठे तंटे सोडविण्याचे काम पोलीस पाटील यांच्याकडे असते. मात्र, शासनाने पोलीस पाटील रिक्त जागा भरण्याच्या कामात दिरंगाई केली आहे.कोथळी येथील पोलीसपाटील उत्तम तिवडे यांच्यावर सध्या प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या लोकसंख्येची गावे नेमून दिली आहेत. त्यामध्ये दानोळी २० हजार, उदगाव २२ हजार, कोथळी १२ हजार, उमळवाड ८ हजार या गावांतील जबाबदारी त्यांच्यावर आहे. या चार गावांचे पोलीसपाटीलकी करताना त्यांची मोठी दमछाक होत आहे. शासनाकडून त्यांना एका कोथळी गावाचे मानधन मिळते व यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले उदगांव, दानोळी ही गावे मोठी असून या गावात स्वतंत्र पोलीसपाटील पद भरणे गरजेचे आहे. एकाच पोलीसपाटलांमुळे चार गावांतील छोटे-मोठे तंटे मिटविण्यासाठी भेटी देणे शक्य होत नाही. त्यामुळे गावामध्ये होणारे तंटे रौद्ररूपधारक केल्यानंतरच पोलीस ठाण्याला समजते. त्यामुळे गावातील शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील तरुणांना नोकरीच्या कामासाठी लागणारा वर्तणुकीचा दाखला, घातपाताची नोंद, पंचनामे व विविध दाखले यासाठी तीन गावांतील नागरिकांना कोथळी पोलीसपाटील तिवडे किंवा जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जावे लागते. (प्रतिनिधी) संवेदनशील गावेदानोळी हे संवेदनशील गाव असून याठिकाणी वारंवार वादावादीचे प्रकार घडत असतात, तर उदगाव येथेही वाळूच्या कारणामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या दोन गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. जयसिंगपूर पोलीस ठाणेअंतर्गत उदगाव व दानोळी येथे पोलीस चौकीची गरज आहे.