शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

‘एनए’ अट रद्दमुळे उद्योगवाढीला बळ

By admin | Updated: January 22, 2016 00:53 IST

उद्योगक्षेत्रातून स्वागत : निमशहरी, ग्रामीण भागांत वाढणार विस्तार

कोल्हापूर : नवीन उद्योग अथवा पूर्वीच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी जमीन मिळविताना विविध अडचणींना उद्योजकांना तोंड द्यावे लागत होते. यातील बिनशेती परवानगीची (एनए) अट अधिक त्रासदायक ठरत होती. मात्र, आता नागरी क्षेत्रातील विकास योजनेतील जमीन किंवा शेतजमिनीवर उद्योग उभारण्यासाठीची बिनशेती परवानगीची अट शिथिल करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात उद्योगवाढीला बळ मिळणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय उद्योगांना चालना देणार असल्याची प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.राज्यातील बहुतांश औद्योगिक वसाहती सध्या उद्योगांना अपुऱ्या पडत आहेत. नवीन, प्रास्तावित औद्योगिक वसाहतींच्या उभारणीला फारशी गती नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत गरज आणि क्षमता असूनही अनेक उद्योगांना त्यांचा विस्तार अथवा काही उद्योजकांना त्यांचा नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करण्यात जमिनीची अनुपलब्धता अडचणीची ठरत होती. ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध व्हायची, तेथे बिनशेती परवानगीची अट अडथळा ठरत होती. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील उद्योगवाढीला खीळ बसली होती. यावर बिनशेती परवानगीची अट शिथिल करून सरकारने राज्यातील उद्योगवाढीला बळ देण्याची भूमिका घेतली आहे. तिचे उद्योजकांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)3‘एनए’ची अट शिथिल केल्याने उद्योगवाढीला बळ मिळेल. शिवाय उद्योगासाठी घेतलेल्या जमिनीवर बँकांकडून कर्जदेखील मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. उद्योगांसाठी जमिनी मिळविताना अनेक अडचणींपैकी एक व अधिक त्रासदायक अशी ‘एनए’ची अट होती; पण आता ती शिथिल करण्याचा निर्णय झाल्याने पडजमिनीवर उद्योग उभारणे शक्य होणार आहे. सरकारने चांगला आणि धाडसी निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. - उदय दुधाणे, उद्योजकउद्योगक्षेत्राला ताकद देणारे निर्णय सरकार घेत आहे. सध्याच्या औद्योगिक वसाहतींमध्ये जागेची कमतरता आहे. त्यामुळे उद्योग विस्तार आणि नवीन उद्योग उभारणीत अडचणी येत आहेत. परंतु, ‘एनए’ची अट शिथिल झाल्याने संबंधित अडचण दूर झाली आहे. उद्योगांना निश्चितपणे चालना मिळेल.- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनउद्योगांच्या विकासाच्या मार्गातील ‘एनए’चा महत्त्वाचा अडथळा सरकारने दूर केला आहे. या निर्णयामुळे उद्योगविस्तार आणि वाढीचे एक पाऊल पुढे पडणार आहे. केवळ उद्योजकांनाच नव्हे, तर शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीमध्ये कृषिपूरक उद्योगांची उभारणी करता येणार आहे. त्यासह मेट्रोसिटीमधील उद्योगांचा विस्तार निमशहरी, ग्रामीण परिसरातही होईल.- देवेंद्र दिवाण, अध्यक्ष, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन