शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

योग्य किमतीसाठी दुहेरी कर हवा

By admin | Updated: March 4, 2015 00:46 IST

बुधाजीराव मुळीक : इतिहास विभागाच्या ‘शेती विकास’ चर्चासत्राला प्रारंभ

कोल्हापूर : शेतीला केंद्रस्थानी ठेवून आपल्या अर्थव्यवस्थेची आणि धोरणांची फेरमांडणी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनांची योग्य किंमत देण्यासाठी दुहेरी दर आकारणीचे धोरण आपल्याला आज ना उद्या स्वीकारावे लागेल. शेतीला प्राधान्य दिल्याखेरीज भारताला भवितव्य नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी येथे केले. कार्यक्रम संपल्यानंतर वृत्तवाहिनीवर संवाद साधताना डॉ. मुळीक यांनी, शेतकऱ्यांनी आता आत्महत्या नव्हे, तर त्यासाठी त्यांना प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेची हत्या केली पाहिजे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे आयोजित ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील शेतीविकास’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बीजभाषण करताना ते बोलत होते. ‘महाराष्ट्रातील शेती : काल, आज व उद्या’ असा त्यांच्या भाषणाचा विषय होता. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. माधव पाटील होते.डॉ. मुळीक म्हणाले, हरित, धवल, नीलक्रांती आणि हॉर्टिकल्चरद्वारे सप्तरंगी क्रांती अशा टप्प्यांनी शेतीचा विकास झाला. मात्र, हे क्षेत्र असंघटित राहिल्याने शेती व्यवसाय मागे पडला. शेती हा प्रत्येक घटकाचा आधार आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन, प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. ते झाले नाही तर आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेची शेतकऱ्यांनी हत्या केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया डॉ. मुळीक यांनी व्यक्त केली.डॉ. पाटील म्हणाले, ज्ञान, संपत्ती आणि प्रसिद्धी ही प्रगतीच्या मोजमापाची भौतिक साधने आहेत; पण प्रगतीचे खरे मोजमाप मानवतावादी मूल्यांच्या वृद्धीतून अधोरेखित होते. त्या दृष्टिकोनातूनच शेतीकडे पाहण्याची गरज आहे. यावेळी डॉ. राजन गवस, रणधीर शिंदे, ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, पद्मजा पाटील, नंदा पारेकर, आदी उपस्थित होते. अवनीश पाटील यांनी स्वागत केले. नीलांबरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. एम. ए. लोहार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘रोबोटिक्स’ हे शेतीचे भवितव्य‘रोबोटिक्स’ हे भारतीय शेतीचे भवितव्य असणार आहे. प्रीसिजन फार्मिंगद्वारे प्रत्येक रोप हे युनिट मानून त्याला द्यावयाच्या खतांची, पाण्याची मात्रा निश्चित केली जाईल. जनावरांची धार यंत्रमानव काढतील. या सर्व गोष्टींसाठी आपली मानसिक, सामाजिक आणि राजकीय मनोभूमिका स्वीकारार्ह बनविण्याची गरज आहे, असे डॉ. मुळीक यांनी सांगितले.