शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

योग्य किमतीसाठी दुहेरी कर हवा

By admin | Updated: March 4, 2015 00:46 IST

बुधाजीराव मुळीक : इतिहास विभागाच्या ‘शेती विकास’ चर्चासत्राला प्रारंभ

कोल्हापूर : शेतीला केंद्रस्थानी ठेवून आपल्या अर्थव्यवस्थेची आणि धोरणांची फेरमांडणी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनांची योग्य किंमत देण्यासाठी दुहेरी दर आकारणीचे धोरण आपल्याला आज ना उद्या स्वीकारावे लागेल. शेतीला प्राधान्य दिल्याखेरीज भारताला भवितव्य नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी येथे केले. कार्यक्रम संपल्यानंतर वृत्तवाहिनीवर संवाद साधताना डॉ. मुळीक यांनी, शेतकऱ्यांनी आता आत्महत्या नव्हे, तर त्यासाठी त्यांना प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेची हत्या केली पाहिजे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे आयोजित ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील शेतीविकास’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बीजभाषण करताना ते बोलत होते. ‘महाराष्ट्रातील शेती : काल, आज व उद्या’ असा त्यांच्या भाषणाचा विषय होता. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. माधव पाटील होते.डॉ. मुळीक म्हणाले, हरित, धवल, नीलक्रांती आणि हॉर्टिकल्चरद्वारे सप्तरंगी क्रांती अशा टप्प्यांनी शेतीचा विकास झाला. मात्र, हे क्षेत्र असंघटित राहिल्याने शेती व्यवसाय मागे पडला. शेती हा प्रत्येक घटकाचा आधार आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन, प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. ते झाले नाही तर आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेची शेतकऱ्यांनी हत्या केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया डॉ. मुळीक यांनी व्यक्त केली.डॉ. पाटील म्हणाले, ज्ञान, संपत्ती आणि प्रसिद्धी ही प्रगतीच्या मोजमापाची भौतिक साधने आहेत; पण प्रगतीचे खरे मोजमाप मानवतावादी मूल्यांच्या वृद्धीतून अधोरेखित होते. त्या दृष्टिकोनातूनच शेतीकडे पाहण्याची गरज आहे. यावेळी डॉ. राजन गवस, रणधीर शिंदे, ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, पद्मजा पाटील, नंदा पारेकर, आदी उपस्थित होते. अवनीश पाटील यांनी स्वागत केले. नीलांबरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. एम. ए. लोहार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘रोबोटिक्स’ हे शेतीचे भवितव्य‘रोबोटिक्स’ हे भारतीय शेतीचे भवितव्य असणार आहे. प्रीसिजन फार्मिंगद्वारे प्रत्येक रोप हे युनिट मानून त्याला द्यावयाच्या खतांची, पाण्याची मात्रा निश्चित केली जाईल. जनावरांची धार यंत्रमानव काढतील. या सर्व गोष्टींसाठी आपली मानसिक, सामाजिक आणि राजकीय मनोभूमिका स्वीकारार्ह बनविण्याची गरज आहे, असे डॉ. मुळीक यांनी सांगितले.