शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शेतीला पाणी बंद

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

बावड्यातील ६०० एकरांतील ऊस वाळणार : शेतकऱ्यांना करावी लागणार स्वत:ची ‘पाण्याची स्कीम’

रमेश पाटील- कसबा बावडा-कदमवाडी रोडवरील नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र ‘एसटीपी’ नुकतेच सुरू झाल्याने जुना ‘एसटीपी’ बंद करण्यात आला आहे. परिणामी या सांडपाण्यावर १९७४ पासून उसाचे पीक घेणाऱ्या कसबा बावडा, कदमवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचा ६०० एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस पाणी बंद झाल्यामुळे वाळत चालला आहे. भविष्यात या ठिकाणी ऊस पिकवायचा झाल्यास शेतकऱ्यांना स्वत:ची पाण्याची सोय करावी लागणार असल्याची स्थिती आहे. अचानक सांडपाणी देण्याचे महापालिकेने बंद केल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.शहरातील जयंती नाला व कोल्हापूर शहराचे पूर्ण सांडपाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर आणले जाते. १९७४ पासून ते आजतागायत या केंद्रातून फारशी प्रक्रिया न केलेले पाणी शेतकरी आपल्या उसाला देत होते. या दूषित पाण्यामुळे उसाचे तसेच अन्य इतर पिकांचे उत्पन्न कमी मिळत असे; परंतु दूषित का असेना परंतु पाणी मिळते म्हणून शेतकरी हे पाणी पिकाला देत होते. महापालिकेने दूषित पाणी शेतकरी घेतात म्हणून या पाण्याच्या भरवशावर श्रीराम सेवा संस्थेने धरणावरील या क्षेत्राची पाणीपुरवठा स्कीम बंद केली. या भागातील विहिरीचे नैसर्गिक जलस्त्रोतही बंद झाले आहेत.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात महापालिका विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जयंती नाल्यातील १०० टक्के दूषित पाण्याचा उपसा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सुरू झाले आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण काही प्रमाणात थांबले आहे.प्रक्रिया केंद्रातील पाणी आता शेतकऱ्यांना मिळण्याचे बंद झाल्याने बावड्यातील अनेक शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. कारण सांडपाणी बंद झाल्याने अचानक नवीन कोणतीही पाण्याची योजना लगेचच राबवता येणार नाही. केर्लेकर मळा, सरकारी मळा, जामदार मळा, कदमवाडी, बिरंजे पाणंद, वेटाळे मळा, रेडेकर पाणंद, ठोंबरे मळा, प्रिन्स शिवाजी शाळेशेजारील परिसर आदी ठिकाणच्या ऊस क्षेत्रासाठी या सांडपाण्याचा उपयोग शेतकरी करत होते; परंतु आता पाणी पुरवठाच बंद झाल्याने ऊस वाळून जाणार आहे.शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करावीकसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे जुना एसटीपी सुरू करता येणार नाही. शेतीला पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था उभी करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचगंगेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी महापालिका घेत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शेतीसाठी पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही.- मनीष पवार, जलअभियंता, कोल्हापूर महानगरपालिकाआयुक्तांना बावड्यातील शेतकरी भेटणारशेतीसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी मिळावे, म्हणून लवकरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन आयुक्त शिवशंकर यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तसेच प्रसंगी आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. - रवींद्र रेडेकर, शेतकरी, कसबा बावडा