शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शेतीला पाणी बंद

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

बावड्यातील ६०० एकरांतील ऊस वाळणार : शेतकऱ्यांना करावी लागणार स्वत:ची ‘पाण्याची स्कीम’

रमेश पाटील- कसबा बावडा-कदमवाडी रोडवरील नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र ‘एसटीपी’ नुकतेच सुरू झाल्याने जुना ‘एसटीपी’ बंद करण्यात आला आहे. परिणामी या सांडपाण्यावर १९७४ पासून उसाचे पीक घेणाऱ्या कसबा बावडा, कदमवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचा ६०० एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस पाणी बंद झाल्यामुळे वाळत चालला आहे. भविष्यात या ठिकाणी ऊस पिकवायचा झाल्यास शेतकऱ्यांना स्वत:ची पाण्याची सोय करावी लागणार असल्याची स्थिती आहे. अचानक सांडपाणी देण्याचे महापालिकेने बंद केल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.शहरातील जयंती नाला व कोल्हापूर शहराचे पूर्ण सांडपाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर आणले जाते. १९७४ पासून ते आजतागायत या केंद्रातून फारशी प्रक्रिया न केलेले पाणी शेतकरी आपल्या उसाला देत होते. या दूषित पाण्यामुळे उसाचे तसेच अन्य इतर पिकांचे उत्पन्न कमी मिळत असे; परंतु दूषित का असेना परंतु पाणी मिळते म्हणून शेतकरी हे पाणी पिकाला देत होते. महापालिकेने दूषित पाणी शेतकरी घेतात म्हणून या पाण्याच्या भरवशावर श्रीराम सेवा संस्थेने धरणावरील या क्षेत्राची पाणीपुरवठा स्कीम बंद केली. या भागातील विहिरीचे नैसर्गिक जलस्त्रोतही बंद झाले आहेत.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात महापालिका विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जयंती नाल्यातील १०० टक्के दूषित पाण्याचा उपसा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सुरू झाले आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण काही प्रमाणात थांबले आहे.प्रक्रिया केंद्रातील पाणी आता शेतकऱ्यांना मिळण्याचे बंद झाल्याने बावड्यातील अनेक शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. कारण सांडपाणी बंद झाल्याने अचानक नवीन कोणतीही पाण्याची योजना लगेचच राबवता येणार नाही. केर्लेकर मळा, सरकारी मळा, जामदार मळा, कदमवाडी, बिरंजे पाणंद, वेटाळे मळा, रेडेकर पाणंद, ठोंबरे मळा, प्रिन्स शिवाजी शाळेशेजारील परिसर आदी ठिकाणच्या ऊस क्षेत्रासाठी या सांडपाण्याचा उपयोग शेतकरी करत होते; परंतु आता पाणी पुरवठाच बंद झाल्याने ऊस वाळून जाणार आहे.शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करावीकसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे जुना एसटीपी सुरू करता येणार नाही. शेतीला पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था उभी करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचगंगेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी महापालिका घेत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शेतीसाठी पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही.- मनीष पवार, जलअभियंता, कोल्हापूर महानगरपालिकाआयुक्तांना बावड्यातील शेतकरी भेटणारशेतीसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी मिळावे, म्हणून लवकरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन आयुक्त शिवशंकर यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तसेच प्रसंगी आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. - रवींद्र रेडेकर, शेतकरी, कसबा बावडा