शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शेतीला पाणी बंद

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

बावड्यातील ६०० एकरांतील ऊस वाळणार : शेतकऱ्यांना करावी लागणार स्वत:ची ‘पाण्याची स्कीम’

रमेश पाटील- कसबा बावडा-कदमवाडी रोडवरील नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र ‘एसटीपी’ नुकतेच सुरू झाल्याने जुना ‘एसटीपी’ बंद करण्यात आला आहे. परिणामी या सांडपाण्यावर १९७४ पासून उसाचे पीक घेणाऱ्या कसबा बावडा, कदमवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचा ६०० एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस पाणी बंद झाल्यामुळे वाळत चालला आहे. भविष्यात या ठिकाणी ऊस पिकवायचा झाल्यास शेतकऱ्यांना स्वत:ची पाण्याची सोय करावी लागणार असल्याची स्थिती आहे. अचानक सांडपाणी देण्याचे महापालिकेने बंद केल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.शहरातील जयंती नाला व कोल्हापूर शहराचे पूर्ण सांडपाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर आणले जाते. १९७४ पासून ते आजतागायत या केंद्रातून फारशी प्रक्रिया न केलेले पाणी शेतकरी आपल्या उसाला देत होते. या दूषित पाण्यामुळे उसाचे तसेच अन्य इतर पिकांचे उत्पन्न कमी मिळत असे; परंतु दूषित का असेना परंतु पाणी मिळते म्हणून शेतकरी हे पाणी पिकाला देत होते. महापालिकेने दूषित पाणी शेतकरी घेतात म्हणून या पाण्याच्या भरवशावर श्रीराम सेवा संस्थेने धरणावरील या क्षेत्राची पाणीपुरवठा स्कीम बंद केली. या भागातील विहिरीचे नैसर्गिक जलस्त्रोतही बंद झाले आहेत.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात महापालिका विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जयंती नाल्यातील १०० टक्के दूषित पाण्याचा उपसा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सुरू झाले आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण काही प्रमाणात थांबले आहे.प्रक्रिया केंद्रातील पाणी आता शेतकऱ्यांना मिळण्याचे बंद झाल्याने बावड्यातील अनेक शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. कारण सांडपाणी बंद झाल्याने अचानक नवीन कोणतीही पाण्याची योजना लगेचच राबवता येणार नाही. केर्लेकर मळा, सरकारी मळा, जामदार मळा, कदमवाडी, बिरंजे पाणंद, वेटाळे मळा, रेडेकर पाणंद, ठोंबरे मळा, प्रिन्स शिवाजी शाळेशेजारील परिसर आदी ठिकाणच्या ऊस क्षेत्रासाठी या सांडपाण्याचा उपयोग शेतकरी करत होते; परंतु आता पाणी पुरवठाच बंद झाल्याने ऊस वाळून जाणार आहे.शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करावीकसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे जुना एसटीपी सुरू करता येणार नाही. शेतीला पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था उभी करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचगंगेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी महापालिका घेत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शेतीसाठी पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही.- मनीष पवार, जलअभियंता, कोल्हापूर महानगरपालिकाआयुक्तांना बावड्यातील शेतकरी भेटणारशेतीसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी मिळावे, म्हणून लवकरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन आयुक्त शिवशंकर यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तसेच प्रसंगी आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. - रवींद्र रेडेकर, शेतकरी, कसबा बावडा