शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

कार्याध्यक्षाविना कोरडवाहू शेती अभियान

By admin | Updated: May 19, 2015 00:21 IST

कामांवर परिणाम : यशवंत थोरात यांचा सहा महिन्यापूर्वीच राजीनामा

विश्वास पाटील- कोल्हापूर -काँग्रेस आघाडीच्या काळात राज्यातील कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘कोरडवाहू शेती अभियाना’च्या कार्याध्यक्षपदाचा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ.यशवंत थोरात व मार्गदर्शक डॉ. राजाराम देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी नवीन सरकार सत्तेत आल्यावरच दिला असून त्यानंतर मात्र गेल्या सहा महिन्यांत या पदांवर कोणाचीच नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे अभियानाच्या दैनंदिन कामावरही परिणाम झाला आहे. औरंगाबाद येथील कार्यालयही जवळपास गुंडाळण्यात आले आहे.नवे सरकार सत्तेत आले की मागच्या सरकारच्या योजना गुंडाळून ठेवण्यात येतात, असाच अनुभव या अभियानाच्या बाबतीत शेतकऱ्यांना येत आहे. राज्यात ‘कोरडवाहू अभियान २०१३’ मध्ये सुरू झाले. तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यास गती यावी व या शेतीच्या प्रश्नांकडे कुणी तरी बारकाईने व आत्मियतेने पाहणारा असावा म्हणून शासनाने डॉ. थोरात व राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांची या अभियानावर नियुक्ती केली. त्यांनी आपल्या कालावधीत गावांच्या विकासाचा आराखडा निश्चित केला. त्यानुसार कोरडवाहू शेती विकासाची कामे सुरू झाली परंतु तोपर्यंत आॅक्टोबरमध्ये राज्यात सत्तांतर झाले. आपली नियुक्ती काँग्रेस सरकारने केली होती. त्यामुळे सरकार बदलल्यानंतर त्या पदाला चिकटून राहणे योग्य नाही म्हणून या दोघांनीही लगेचच राजीनामे दिले; परंतु त्याबाबत सरकारकडून पुढे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. जी गावे निवडली होती, तिथे जुजबी कामे सुरू आहेत परंतु त्याचा दैनंदिन पाठपुरावा करणारे फारसे कुणी नसल्याने कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. नव्या सरकारने आता ‘जलयुक्त शिवार योजने’स प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती अभियानातील कामे कितपत गांभीर्याने होणार याबद्दलच साशंकता व्यक्त होत आहे.सरकार बदलल्यानंतर मी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याचे पुढे काय झाले हे मला आतापर्यंत समजलेले नाही. हे अभियान चांगले चालावे यासाठी मी कायम उपलब्ध आहे. कारण कोरडवाहू शेतीविकासाचे काम गोरगरीब शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. - डॉ. यशवंत थोरात, माजी कार्याध्यक्ष, कोरडवाहू शेती अभियानदृष्टीक्षेपात अभियानराज्यात एकूण तालुके : ३५२निवडलेली गावे : ४०३गावविकासाचा कालावधी : तीन वर्षेखर्च झालेला निधी : २०१३-१४ - ८० कोटी (खर्च)२०१४-१५ - ११२ कोटी (खर्च)२०१५-१६ - ५० कोटी (तरतूद)