शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

कार्याध्यक्षाविना कोरडवाहू शेती अभियान

By admin | Updated: May 19, 2015 00:21 IST

कामांवर परिणाम : यशवंत थोरात यांचा सहा महिन्यापूर्वीच राजीनामा

विश्वास पाटील- कोल्हापूर -काँग्रेस आघाडीच्या काळात राज्यातील कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘कोरडवाहू शेती अभियाना’च्या कार्याध्यक्षपदाचा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ.यशवंत थोरात व मार्गदर्शक डॉ. राजाराम देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी नवीन सरकार सत्तेत आल्यावरच दिला असून त्यानंतर मात्र गेल्या सहा महिन्यांत या पदांवर कोणाचीच नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे अभियानाच्या दैनंदिन कामावरही परिणाम झाला आहे. औरंगाबाद येथील कार्यालयही जवळपास गुंडाळण्यात आले आहे.नवे सरकार सत्तेत आले की मागच्या सरकारच्या योजना गुंडाळून ठेवण्यात येतात, असाच अनुभव या अभियानाच्या बाबतीत शेतकऱ्यांना येत आहे. राज्यात ‘कोरडवाहू अभियान २०१३’ मध्ये सुरू झाले. तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यास गती यावी व या शेतीच्या प्रश्नांकडे कुणी तरी बारकाईने व आत्मियतेने पाहणारा असावा म्हणून शासनाने डॉ. थोरात व राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांची या अभियानावर नियुक्ती केली. त्यांनी आपल्या कालावधीत गावांच्या विकासाचा आराखडा निश्चित केला. त्यानुसार कोरडवाहू शेती विकासाची कामे सुरू झाली परंतु तोपर्यंत आॅक्टोबरमध्ये राज्यात सत्तांतर झाले. आपली नियुक्ती काँग्रेस सरकारने केली होती. त्यामुळे सरकार बदलल्यानंतर त्या पदाला चिकटून राहणे योग्य नाही म्हणून या दोघांनीही लगेचच राजीनामे दिले; परंतु त्याबाबत सरकारकडून पुढे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. जी गावे निवडली होती, तिथे जुजबी कामे सुरू आहेत परंतु त्याचा दैनंदिन पाठपुरावा करणारे फारसे कुणी नसल्याने कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. नव्या सरकारने आता ‘जलयुक्त शिवार योजने’स प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती अभियानातील कामे कितपत गांभीर्याने होणार याबद्दलच साशंकता व्यक्त होत आहे.सरकार बदलल्यानंतर मी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याचे पुढे काय झाले हे मला आतापर्यंत समजलेले नाही. हे अभियान चांगले चालावे यासाठी मी कायम उपलब्ध आहे. कारण कोरडवाहू शेतीविकासाचे काम गोरगरीब शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. - डॉ. यशवंत थोरात, माजी कार्याध्यक्ष, कोरडवाहू शेती अभियानदृष्टीक्षेपात अभियानराज्यात एकूण तालुके : ३५२निवडलेली गावे : ४०३गावविकासाचा कालावधी : तीन वर्षेखर्च झालेला निधी : २०१३-१४ - ८० कोटी (खर्च)२०१४-१५ - ११२ कोटी (खर्च)२०१५-१६ - ५० कोटी (तरतूद)