शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

दुष्काळी भाग ढबूकडे, पण दराने मोडले कंबरडे

By admin | Updated: September 20, 2015 23:27 IST

उत्पादनात वाढ : दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या हाती भोपळाच; बाजारातील आवक वाढली

गजानन पाटील -- संख---डाळिंब, द्राक्षे व इतर भाजीपाला पिकांऐवजी कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ढबू मिरची उत्पादनाकडे वाढला आहे. हे अधिक उत्पन्न देणारे पीक असल्याने यावर्षी उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्याने बाजारात मोठी आवक झाल्याने ढबू मिरचीचा दर दहा रुपयांपर्यंत घसरला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात नीचांकी दर आहे. औषधे, खते, मशागतीचा खर्च, मजूर यांचा खर्च वजा जाता, उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कोणतीही पिके न करता विहीर, कूपनलिकेतील पाण्यावर ढबू मिरचीची लागण केलेली आहे. बाजारात गेल्या चार वर्षापासून दर चांगला मिळाला आहे. पारंपरिक पिके न घेता नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन देणारी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या दावण्या, बिब्ब्या या रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष, डाळिंब फळबागा धोक्यात आल्या आहेत. बेदाण्याला योग्य दर मिळत नाही. द्राक्षाचा उत्पादन खर्च वाढला. पण दर तोच राहिल्याने द्राक्षशेती न परवडणारी बनली आहे. त्यामुळे शेतकरी इतर भाजीपाला पिकाकडे वळला आहे.तालुक्यातील रामपूर, सोन्याळ, दरीकोणूर, कोळगिरी, खलाटी, माडग्याळ, जत, शेगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब आदी पिकांच्या शेतीला पर्याय म्हणून ढबू मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. इंदिरा, आयेशा, इंडस या जातीच्या ढबू मिरचीचे उत्पादन घेतले जाते. रोहिणी हंगामात ढबू मिरचीची लागण केली जाते. पाच महिन्यांमध्ये उत्पादन येते. अनुकूल वातावरणामुळे चांगले उत्पादन आले आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी सेंद्रीय, रासायनिक खते, महागड्या औषधांचा वापर केला आहे. चांगली दर्जेदार व गुणकारी अशी बायो ३०३ आर, केवर कवच, आॅट्रा, जंप आदी महागड्या औषधांची फवारणी करण्यात आली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन मिळाले आहे. एक एकर ढबूची लागण करण्यासाठी मल्चिंग पेपर, ठिंबक संच, तार, बांबूच्या काठ्या, बेड मारणे, बांधणी, सुतळी याचा दीड लाखापर्यंत खर्च येतो. तसेच मजूर, महागडी औषधे, सेंद्रीय व रासायनिक खते यांचा सुमारे एक लाखापर्यंत खर्च जातो. असा एकरास अडीच लाख रुपये खर्च येतो. मात्र आता मिळणारा ढबूचा दर पाहता, ढबू उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न पडला आहे. माल पॅकिंग करून पाठविला जातो. साधारणत: ३० किलोचा बॉक्स असतो. हा माल मुंबई, पुणे, दिल्ली, बेळगाव, नागपूर, कोलकाता, जबलपूर आदी ठिकाणी ट्रान्स्पोर्टमार्फत पाठविला जातो.शेतकऱ्यांनी हिमतीने भरघोस उत्पादन आणले आहे. पण बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दराची घसरण झालेली आहे. गेल्या चार वर्षातील हा सर्वात नीचांकी दर आहे. जुलैमध्ये २० रुपये किलो असणारा दर आता ९ रुपयांवर आला आहे. १ ते ८ आॅगस्टपर्यंत २० रुपये, ८ ते ११ आॅगस्टपर्यंत १९ रुपये, १९ ते २१ आॅगस्ट १२, २१ ते २८ आॅगस्टअखेर ९ रुपये, १ ते १५ सप्टेंबरअखेर १० ते १२ रुपये प्रति किलो असा दर घसरला आहे. बॉक्स पॅकिंग, मजूर, मशागती, वाहतूक खर्च वगळता शेतकऱ्याच्या हाती ४ ते ५ रुपये येतात.यावर्षी मोठ्या कष्टाने, मेहनतीने ढबू मिरचीचे भरघोस उत्पादन आणले आहे. उन्हाळ्यात इतर कोणतेही पीक न करता ढबू मिरची केली आहे. उभारणीसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत. शेवटपर्यंत असाच दर मिळाला, तर जेमतेम पैसे मिळणार आहेत. खर्च पण निघणार नाही. कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आहे.- अशोक मिसाळ, ढबू उत्पादक शेतकरी, दरीकोणूरपाकिस्तानात निर्यातबंदीढबू मिरचीची निर्यात पाकिस्तानलाही केली जाते. मात्र पाकिस्तान व भारत यांच्यातील बैठक फिसकटल्याने आॅगस्टपासून भारत व पाकिस्तान यांच्यात निर्यातबंदी आहे. त्यामुळे मालाचा उठाव होत नाही. याचा फटकाही ढबू उत्पादकांना बसला आहे, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.