शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दुष्काळी भाग ढबूकडे, पण दराने मोडले कंबरडे

By admin | Updated: September 20, 2015 23:27 IST

उत्पादनात वाढ : दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या हाती भोपळाच; बाजारातील आवक वाढली

गजानन पाटील -- संख---डाळिंब, द्राक्षे व इतर भाजीपाला पिकांऐवजी कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ढबू मिरची उत्पादनाकडे वाढला आहे. हे अधिक उत्पन्न देणारे पीक असल्याने यावर्षी उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्याने बाजारात मोठी आवक झाल्याने ढबू मिरचीचा दर दहा रुपयांपर्यंत घसरला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात नीचांकी दर आहे. औषधे, खते, मशागतीचा खर्च, मजूर यांचा खर्च वजा जाता, उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कोणतीही पिके न करता विहीर, कूपनलिकेतील पाण्यावर ढबू मिरचीची लागण केलेली आहे. बाजारात गेल्या चार वर्षापासून दर चांगला मिळाला आहे. पारंपरिक पिके न घेता नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन देणारी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या दावण्या, बिब्ब्या या रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष, डाळिंब फळबागा धोक्यात आल्या आहेत. बेदाण्याला योग्य दर मिळत नाही. द्राक्षाचा उत्पादन खर्च वाढला. पण दर तोच राहिल्याने द्राक्षशेती न परवडणारी बनली आहे. त्यामुळे शेतकरी इतर भाजीपाला पिकाकडे वळला आहे.तालुक्यातील रामपूर, सोन्याळ, दरीकोणूर, कोळगिरी, खलाटी, माडग्याळ, जत, शेगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब आदी पिकांच्या शेतीला पर्याय म्हणून ढबू मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. इंदिरा, आयेशा, इंडस या जातीच्या ढबू मिरचीचे उत्पादन घेतले जाते. रोहिणी हंगामात ढबू मिरचीची लागण केली जाते. पाच महिन्यांमध्ये उत्पादन येते. अनुकूल वातावरणामुळे चांगले उत्पादन आले आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी सेंद्रीय, रासायनिक खते, महागड्या औषधांचा वापर केला आहे. चांगली दर्जेदार व गुणकारी अशी बायो ३०३ आर, केवर कवच, आॅट्रा, जंप आदी महागड्या औषधांची फवारणी करण्यात आली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन मिळाले आहे. एक एकर ढबूची लागण करण्यासाठी मल्चिंग पेपर, ठिंबक संच, तार, बांबूच्या काठ्या, बेड मारणे, बांधणी, सुतळी याचा दीड लाखापर्यंत खर्च येतो. तसेच मजूर, महागडी औषधे, सेंद्रीय व रासायनिक खते यांचा सुमारे एक लाखापर्यंत खर्च जातो. असा एकरास अडीच लाख रुपये खर्च येतो. मात्र आता मिळणारा ढबूचा दर पाहता, ढबू उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न पडला आहे. माल पॅकिंग करून पाठविला जातो. साधारणत: ३० किलोचा बॉक्स असतो. हा माल मुंबई, पुणे, दिल्ली, बेळगाव, नागपूर, कोलकाता, जबलपूर आदी ठिकाणी ट्रान्स्पोर्टमार्फत पाठविला जातो.शेतकऱ्यांनी हिमतीने भरघोस उत्पादन आणले आहे. पण बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दराची घसरण झालेली आहे. गेल्या चार वर्षातील हा सर्वात नीचांकी दर आहे. जुलैमध्ये २० रुपये किलो असणारा दर आता ९ रुपयांवर आला आहे. १ ते ८ आॅगस्टपर्यंत २० रुपये, ८ ते ११ आॅगस्टपर्यंत १९ रुपये, १९ ते २१ आॅगस्ट १२, २१ ते २८ आॅगस्टअखेर ९ रुपये, १ ते १५ सप्टेंबरअखेर १० ते १२ रुपये प्रति किलो असा दर घसरला आहे. बॉक्स पॅकिंग, मजूर, मशागती, वाहतूक खर्च वगळता शेतकऱ्याच्या हाती ४ ते ५ रुपये येतात.यावर्षी मोठ्या कष्टाने, मेहनतीने ढबू मिरचीचे भरघोस उत्पादन आणले आहे. उन्हाळ्यात इतर कोणतेही पीक न करता ढबू मिरची केली आहे. उभारणीसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत. शेवटपर्यंत असाच दर मिळाला, तर जेमतेम पैसे मिळणार आहेत. खर्च पण निघणार नाही. कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आहे.- अशोक मिसाळ, ढबू उत्पादक शेतकरी, दरीकोणूरपाकिस्तानात निर्यातबंदीढबू मिरचीची निर्यात पाकिस्तानलाही केली जाते. मात्र पाकिस्तान व भारत यांच्यातील बैठक फिसकटल्याने आॅगस्टपासून भारत व पाकिस्तान यांच्यात निर्यातबंदी आहे. त्यामुळे मालाचा उठाव होत नाही. याचा फटकाही ढबू उत्पादकांना बसला आहे, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.