शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या माहितीसाठी दुष्काळमुक्ती वेबसाईट

By admin | Updated: December 3, 2015 23:49 IST

विवेक सावंत : बीड येथे १० डिसेंबर रोजी ‘एमकेसीएल’च्या सेंटरला प्रारंभ

कऱ्हाड : ‘एमकेसीएल’च्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी दुष्काळ निर्मूलन अभियान हाती घेण्यात आले असून, ‘एमकेसीएल’ने नुकतीच दुष्काळमुक्ती ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून दुष्काळी भागातील रोजगार हमी योजनेसह अन्य योजनांची माहिती गरजूंना मोफत मिळवून देण्यात येणार आहे. यासाठी ही मोफत माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यात बीड येथे गुरुवार, दि. १० डिसेंबरला दुष्काळमुक्ती सेंटर सुरू करणार असल्याची माहिती ‘एमकेसीएल’चे कार्यकारी संचालक प्रा. विवेक सावंत यांनी दिली. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘सनबीम’चे डायरेक्टर सारंग पाटील उपस्थित होते.प्रा. सावंत म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांपासूून अवर्षण, पावसाची अनियमितता आणि गारपीट अशा लागोपाठ झालेल्या नैसर्गिक आघातामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील शेतीची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांच्याच चरितार्थाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. यातून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी एम. के. सी. एल. ने दुष्काळमुक्ती ही नवीन वेबसाईड सुरू केली आहे. प्रत्यक्षात अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे याच लाभ गरजूंपर्यंत पोहोचू शकत नाही. यातील वस्तुस्थिती लोकांकडून समजून घेण्यासाठी वेबसाईडची खूप मदत होणार आहे. यातून जॉबकार्ड, त्याचे नंबर, रोजगार हमीच्या कामांचा तपशील, त्यांचे पैसे यांची अद्ययावत माहिती वेबसाईडच्या माध्यमातून मिळणार आहे.‘एमकेसीएल’च्या माध्यमातून २५ लाख जणांना संगणक साक्षरता प्राप्त झाली असून, गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या किल्क डिप्लोमाच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना जगभरातून विविध रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दोन लाख विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी ‘एमकेसीएल’ने सुमारे ५ हजार केंद्रांच्या माध्यमातून स्वखर्चाने ४ हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे २ लाख विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आहे. (प्रतिनिधी)दुष्काळाची तीव्रता कमीतीन वर्षांपूर्वी दुष्काळी भागातील तलावांमधील गाळ काढण्याचे काम सनबीम समूह व एमकेसीएल यांच्या वतीने हाती घेण्यात आले होते. त्या काळीत सुमारे २० ठिकाणी हे काम करण्यात आले होते. त्याचा फायदा यंदा झाल्याचे दिसत आहेत. कमी पर्जन्यमान असतानाही संबंधित गावात तलाव पाण्याने भरले असूनही त्याठिकाणी दुष्काळाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवत असल्याचे चित्र आहे, असेही प्रा. विवेक सावंत यांनी सांगितले.