शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

रोजगाराच्या माहितीसाठी दुष्काळमुक्ती वेबसाईट

By admin | Updated: December 3, 2015 23:49 IST

विवेक सावंत : बीड येथे १० डिसेंबर रोजी ‘एमकेसीएल’च्या सेंटरला प्रारंभ

कऱ्हाड : ‘एमकेसीएल’च्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी दुष्काळ निर्मूलन अभियान हाती घेण्यात आले असून, ‘एमकेसीएल’ने नुकतीच दुष्काळमुक्ती ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून दुष्काळी भागातील रोजगार हमी योजनेसह अन्य योजनांची माहिती गरजूंना मोफत मिळवून देण्यात येणार आहे. यासाठी ही मोफत माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यात बीड येथे गुरुवार, दि. १० डिसेंबरला दुष्काळमुक्ती सेंटर सुरू करणार असल्याची माहिती ‘एमकेसीएल’चे कार्यकारी संचालक प्रा. विवेक सावंत यांनी दिली. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘सनबीम’चे डायरेक्टर सारंग पाटील उपस्थित होते.प्रा. सावंत म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांपासूून अवर्षण, पावसाची अनियमितता आणि गारपीट अशा लागोपाठ झालेल्या नैसर्गिक आघातामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील शेतीची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांच्याच चरितार्थाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. यातून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी एम. के. सी. एल. ने दुष्काळमुक्ती ही नवीन वेबसाईड सुरू केली आहे. प्रत्यक्षात अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे याच लाभ गरजूंपर्यंत पोहोचू शकत नाही. यातील वस्तुस्थिती लोकांकडून समजून घेण्यासाठी वेबसाईडची खूप मदत होणार आहे. यातून जॉबकार्ड, त्याचे नंबर, रोजगार हमीच्या कामांचा तपशील, त्यांचे पैसे यांची अद्ययावत माहिती वेबसाईडच्या माध्यमातून मिळणार आहे.‘एमकेसीएल’च्या माध्यमातून २५ लाख जणांना संगणक साक्षरता प्राप्त झाली असून, गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या किल्क डिप्लोमाच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना जगभरातून विविध रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दोन लाख विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी ‘एमकेसीएल’ने सुमारे ५ हजार केंद्रांच्या माध्यमातून स्वखर्चाने ४ हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे २ लाख विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आहे. (प्रतिनिधी)दुष्काळाची तीव्रता कमीतीन वर्षांपूर्वी दुष्काळी भागातील तलावांमधील गाळ काढण्याचे काम सनबीम समूह व एमकेसीएल यांच्या वतीने हाती घेण्यात आले होते. त्या काळीत सुमारे २० ठिकाणी हे काम करण्यात आले होते. त्याचा फायदा यंदा झाल्याचे दिसत आहेत. कमी पर्जन्यमान असतानाही संबंधित गावात तलाव पाण्याने भरले असूनही त्याठिकाणी दुष्काळाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवत असल्याचे चित्र आहे, असेही प्रा. विवेक सावंत यांनी सांगितले.