शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

कोल्हापूरला कृषी विद्यापीठाचे स्वप्न अजून प्रस्तावातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे कृषी विद्यापीठ आहे. १९६८ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, ...

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे कृषी विद्यापीठ आहे. १९६८ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या दहा जिल्ह्यांचे आहे. विद्यापीठातंर्गत कृषी महाविद्यालये कार्यरत आहेत. कोल्हापुरातही कृषी महाविद्यालय आहे तथापि राहुरीची कोणत्याही प्रकारची भौगोलिक संलग्नता नसल्यानेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी मिळून कोल्हापुरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ तयार करावे, अशी मागणी पुढे आली.

राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी तर विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी हा प्रश्न उपस्थित करत कोल्हापुरात कृषी विद्यापीठ स्थापन व्हावे असा आग्रह धरला होता. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे हे कृषीच्या आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले होते. त्यावेळीदेखील आबीटकर व खासदार मंडलिक यांनी हा विषय लावून धरला.

चौकट ०१

कोल्हापूरसाठी आग्रह का

राहुरी हे खानदेशात येते, तेथील भौगाेलिक परिस्थिती, शेतीच्या गरजा वेगळ्या आहेत. या तुलनेत कोल्हापूरच्या वेगळ्या आहेत .कोल्हापूर, सांगली, सातारा व साेलापूरमध्ये समृद्ध शेती आहे. शेतीचे नवनवीन प्रयोग केले जातात. पिकांमध्ये विविधता आहे. शेती संशोधनासाठी खूप वाव आहे. विद्यापीठ झाले तर या शेतीतील प्रयोगांना संशोधनाचे बळ मिळणार आहे.

चौकट ०२

उपविभागाचाही प्रस्ताव

कृषीमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानुसार प्रस्ताव झाला. यावर मंत्रालयात व राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा झाली. चर्चेत कृषी विद्यापीठासाठी पायाभूत सुविधा जास्त लागतात, हे खूप खर्चिक असल्याने उपविभाग स्थापन करू, असा प्रस्ताव पुढे आला, पण आबीटकर यांनी तो फेटाळून लावला.

प्रतिक्रीया

मुळातच कोल्हापूर हे राहुरी विद्यापीठाशी जोडणे ही मोठी चूक होती. आता ती सुधारावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरच यावर मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांसमवेत चर्चेला जाणार आहे.

आमदार प्रकाश आबीटकर