शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्येच अडकला स्वयंचलितचा आराखडा

By admin | Updated: December 29, 2015 01:06 IST

हिप्परगी धरणाचा पॅटर्न : अडीच वर्षे झाली तरी अद्याप कोणतीही कार्यवाही नाही

संदीप बावचे - शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याला पर्याय देण्यासाठी कर्नाटकातील हिप्परगी धरणाचा पॅटर्न वापरून हायड्रोलिक (स्वयंचलित) पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी हालचाली झाल्या होत्या. हायड्रोलिक पद्धतीच्या बंधाऱ्याचे डिझाईन (रेखाचित्र) करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नाशिक येथील कंपनीकडे आराखडा पाठविण्यात आला आहे. तब्बल अडीच वर्षे उलटले तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसून, हायड्रोलिक बंधाऱ्याचा आराखडा नाशिकमध्ये अडकला आहे.तालुक्यातील २२ गावांना गेल्या ३५ वर्षांपासून बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचे पाणी नागरिकांना जीवनदायी, तर शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे बहुतांशी दगड निखळून गेल्याने बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. ऐन उन्हाळ्यात पाणी गळतीमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. बंधाऱ्याची तात्पूर्ती दुरुस्ती होत असली तरी ३५ वर्षे पूर्ण झालेला बंधारा कितपत टिकणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. सध्या असलेला बंधारा कोल्हापूर पद्धतीचा आहे. ही संकल्पना आता कालबाह्य झाल्याने आधुनिक यांत्रिकी (हायड्रोलिक) पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाने अडीच वर्षांपूर्वी हालचाली सुरू केल्या होत्या. कर्नाटक हद्दीतील हिप्परगी पॅटर्नप्रमाणे राजापूरचा बंधारा उभारण्यासाठी हायड्रोलिक पद्धतीच्या बंधाऱ्याचे नियोजन करण्यात आले. याचे डिझाईन (रेखाचित्र) करण्यासाठी नाशिक येथील कंपनीकडे त्याचा आराखडा पाठविण्यात आला होता. डिझाईन मंजुरीनंतर या बंधाऱ्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे, हे समजणार होते. त्यानंतर असा बंधारा उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार होता. अशा पद्धतीच्या स्वयंचलित बंधाऱ्यामुळे दरवर्षी बरगे घालण्याचा जो प्रश्न निर्माण होतो, तो कायमस्वरूपी मिटावा या हेतूनेच सध्या अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्याला पर्याय देण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, तब्बल अडीच वर्षांचा कालावधी उलटला तरी याबाबतची कोणतीही कार्यवाही अजूनपर्यंत झालेली दिसत नाही.रेखाचित्र तयार : माहिती कागदावरचतत्कालीन आमदार स्व. डॉ. सा. रे. पाटील यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या मागणीनुसार राजापूर बंधाऱ्याला पर्याय म्हणून हायड्रोलिक पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून हालचाली झाल्या होत्या. दरम्यान, नाशिक येथील कंपनीकडून राज्यातील बंधाऱ्यांची रेखाचित्रे (डिझाईन) तयार केली जातात. राजापूर बंधाऱ्याचेही रेखाचित्र करण्यासाठी माहिती पुरविण्यात आली आहे, ती कागदावरच राहिली आहे.