शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

‘राष्ट्रवादी’च्या भुदर‘गड’ची पडझड

By admin | Updated: September 18, 2015 23:12 IST

के. जी. नांदेकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार : पश्चिम भागात के. पी. पाटील गटास धक्का

शिवाजी सावंत - गारगोटी  भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागाचे नेते आणि ‘बिद्री’चे विद्यमान संचालक के. जी. केरबा नांदेकर हे राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून, राष्ट्रवादी पक्षाच्या या विभागातील मक्तेदारीस सुरुंग लागणार आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पक्ष सोडणे हे पक्षास परवडणारे नाही. पश्चिम विभागावर के. जी. नांदेकरांचे वर्चस्व हे निर्विवाद आहे. यामुळे माजी आमदार के. पी. पाटील गटास हा मोठा हादरा ठरणार आहे.गेली अनेक वर्षे सत्तेत असणारे के. जी. नांदेकर यांनी राजकीयदृष्ट्या आपले बस्तान चांगलेच बसविले आहे. तालुक्याचा पश्चिम भाग हा दुर्गम आणि डोंगराळ असल्याने अविकसित आहे. या विभागातील जनतेचा व्यक्तिगत आणि सार्वजनिक विकास करण्यास नांदेकर सतत प्रयत्नशील राहिले. लोकांचा प्रचंड संपर्क आणि कामे केल्यामुळे लोकांनी त्यांना ‘कोेकण केसरी’ ही पदवी दिली. गेली अनेक वर्षे ते ‘बिद्री’च्या माध्यमातून सत्तेत आहेत, तर मुलगा बाबा नांदेकर पंचायत समिती विद्यमान सदस्य व माजी सभापती आहेत. पूर्वी ते माजी आमदार दिनकरराव जाधव गटात काँग्रेसचे काम करीत असत; पण २५ मे १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी नांदेकर के. पी. पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले. २००९ साली आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत काम करणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बी. एस. देसाई, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर देसाई यांच्यासह अनेकांनी के. पी. पाटील यांच्याशी फारकत घेतली होती. त्यावेळी पक्षात उभी फू ट पडली होती; पण के. जी. नांदेकर हे के. पीं.च्या सोबत राहिले होते. त्यांच्याकडे पश्चिम भागातील मतांचा असणारा गठ्ठा आणि अधिक उमेदवाऱ्यांमुळे २००९ साली पुन्हा विधानसभा विजयी होण्यात के. पी. यशस्वी झाले; पण २0१४ च्या निवडणुकीत आमदार प्रकाशराव आबिटकर हे प्रचंड मतांनी विजयी झाले. भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीची पकड तशी मजबूत आहे; पण के. जी. यांच्या जाण्याने राष्ट्रवादी अडचणीत येणार आहे. राष्ट्रवादी स्थानिक पातळीवरील नेत्यांना मोडण्यासाठी त्याच गावातील, त्याच शहरातील दोन नंबर फळीतील नेत्याला एखादे पद देऊन एक नंबरला नेल्याने महत्त्व कमी करण्यावर विशेष भर देत. याशिवाय के. जी. नांदेकर यांना ‘बिद्री’चे उपाध्यक्षपद हवे होते, असे कारण समजते. सभापती विलास कांबळे हे के. जी. नांदेकर गटाचे कार्यकर्ते आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत के. जी. यांनी त्यांच्या तिकिटासाठी आग्रह धरून निवडून आणले. त्यानंतर ते सभापती झाले. ‘गोकुळ’चे तिकीट के. पी. पाटील यांनी विलास कांबळे यांना दिले. यामध्ये विलास कांबळे विजयी झाले. येथेच ‘माशी शिंकली’ अशी चर्चा सुरू आहे. तरी के. जी. विरुद्ध के. पी. असा संघर्ष सुरू झाला आहे. मेळावे, प्रतिमेळावे, गाठीभेटी, उणेदुणे जेवणावळी सुरू असून, आपले म्हणणे कसे बरोबर आहे, हे पटविण्यासाठी दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे.नांदेकर यांचे जाणे पक्षाला परवडणारे नाही. कारण आता लवकरच ‘बिद्री’ची निवडणूक जाहीर होणार आहे. नांदेकर नेमके कोणत्या पक्षात जाणार? आमदार आबिटकर हे त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी की, माजी आमदार बजरंग देसाई हे काँग्रेसमध्ये की, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे भाजपमध्ये आणण्यास यशस्वी होणार? हे लवकरच समजेल. याविषयी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.