शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

‘राष्ट्रवादी’च्या भुदर‘गड’ची पडझड

By admin | Updated: September 18, 2015 23:12 IST

के. जी. नांदेकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार : पश्चिम भागात के. पी. पाटील गटास धक्का

शिवाजी सावंत - गारगोटी  भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागाचे नेते आणि ‘बिद्री’चे विद्यमान संचालक के. जी. केरबा नांदेकर हे राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून, राष्ट्रवादी पक्षाच्या या विभागातील मक्तेदारीस सुरुंग लागणार आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पक्ष सोडणे हे पक्षास परवडणारे नाही. पश्चिम विभागावर के. जी. नांदेकरांचे वर्चस्व हे निर्विवाद आहे. यामुळे माजी आमदार के. पी. पाटील गटास हा मोठा हादरा ठरणार आहे.गेली अनेक वर्षे सत्तेत असणारे के. जी. नांदेकर यांनी राजकीयदृष्ट्या आपले बस्तान चांगलेच बसविले आहे. तालुक्याचा पश्चिम भाग हा दुर्गम आणि डोंगराळ असल्याने अविकसित आहे. या विभागातील जनतेचा व्यक्तिगत आणि सार्वजनिक विकास करण्यास नांदेकर सतत प्रयत्नशील राहिले. लोकांचा प्रचंड संपर्क आणि कामे केल्यामुळे लोकांनी त्यांना ‘कोेकण केसरी’ ही पदवी दिली. गेली अनेक वर्षे ते ‘बिद्री’च्या माध्यमातून सत्तेत आहेत, तर मुलगा बाबा नांदेकर पंचायत समिती विद्यमान सदस्य व माजी सभापती आहेत. पूर्वी ते माजी आमदार दिनकरराव जाधव गटात काँग्रेसचे काम करीत असत; पण २५ मे १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी नांदेकर के. पी. पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले. २००९ साली आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत काम करणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बी. एस. देसाई, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर देसाई यांच्यासह अनेकांनी के. पी. पाटील यांच्याशी फारकत घेतली होती. त्यावेळी पक्षात उभी फू ट पडली होती; पण के. जी. नांदेकर हे के. पीं.च्या सोबत राहिले होते. त्यांच्याकडे पश्चिम भागातील मतांचा असणारा गठ्ठा आणि अधिक उमेदवाऱ्यांमुळे २००९ साली पुन्हा विधानसभा विजयी होण्यात के. पी. यशस्वी झाले; पण २0१४ च्या निवडणुकीत आमदार प्रकाशराव आबिटकर हे प्रचंड मतांनी विजयी झाले. भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीची पकड तशी मजबूत आहे; पण के. जी. यांच्या जाण्याने राष्ट्रवादी अडचणीत येणार आहे. राष्ट्रवादी स्थानिक पातळीवरील नेत्यांना मोडण्यासाठी त्याच गावातील, त्याच शहरातील दोन नंबर फळीतील नेत्याला एखादे पद देऊन एक नंबरला नेल्याने महत्त्व कमी करण्यावर विशेष भर देत. याशिवाय के. जी. नांदेकर यांना ‘बिद्री’चे उपाध्यक्षपद हवे होते, असे कारण समजते. सभापती विलास कांबळे हे के. जी. नांदेकर गटाचे कार्यकर्ते आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत के. जी. यांनी त्यांच्या तिकिटासाठी आग्रह धरून निवडून आणले. त्यानंतर ते सभापती झाले. ‘गोकुळ’चे तिकीट के. पी. पाटील यांनी विलास कांबळे यांना दिले. यामध्ये विलास कांबळे विजयी झाले. येथेच ‘माशी शिंकली’ अशी चर्चा सुरू आहे. तरी के. जी. विरुद्ध के. पी. असा संघर्ष सुरू झाला आहे. मेळावे, प्रतिमेळावे, गाठीभेटी, उणेदुणे जेवणावळी सुरू असून, आपले म्हणणे कसे बरोबर आहे, हे पटविण्यासाठी दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे.नांदेकर यांचे जाणे पक्षाला परवडणारे नाही. कारण आता लवकरच ‘बिद्री’ची निवडणूक जाहीर होणार आहे. नांदेकर नेमके कोणत्या पक्षात जाणार? आमदार आबिटकर हे त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी की, माजी आमदार बजरंग देसाई हे काँग्रेसमध्ये की, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे भाजपमध्ये आणण्यास यशस्वी होणार? हे लवकरच समजेल. याविषयी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.