शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

घरात पाणी येण्याची वाट बघू नका, स्थलांतरित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून, बुधवारी रात्रीपासून नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तरी नागरिकांनी घरात पाणी येण्याची ...

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून, बुधवारी रात्रीपासून नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तरी नागरिकांनी घरात पाणी येण्याची वाट बघू नये, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीकाठचे नागरिक, पुरामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांनी स्थलांतरित व्हावे व सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी केले.

जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेले रस्ते नागरिकांनी ओलांडू नयेत, तसेच याठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेडस्‌ काढण्याचा प्रयत्न करून स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नये. गर्भवती महिला, कोरोनाचे रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक, तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे.

नागरिकांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची आवश्यक ती व्यवस्था केली आहे, तरी नागरिकांनी सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

----

स्थलांतरित होताना ही काळजी घ्या

- महत्त्वाची कागदपत्रे, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मौल्यवान वस्तू, औषधे, स्वत:चे साहित्य जसे साबण, ब्रश, पेस्ट, मोबाइल चार्जर, आवश्यक कपडे, दोरी आदी साहित्य सोबत घ्यावे.

-घर सोडताना अवजड किमती साहित्य जसे धान्य, सोफा, टीव्ही कपाटे इ. घरातील सर्वांत उंच ठिकाणी ठेवावे. घरातील लाइटचा मेन स्विच, गॅस सिलिंडर बंद करावेत.

---