शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

गोकूळमध्येही जिल्हा परिषदेचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST

कोल्हापूर : मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेचा गावपातळीवरील राजकारणात किती दबदबा आहे, हे गोकूळ निवडणुकीने पुन्हा एकदा दाखवून दिले ...

कोल्हापूर : मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेचा गावपातळीवरील राजकारणात किती दबदबा आहे, हे गोकूळ निवडणुकीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. विजयी झालेले २१ पैकी तब्बल ७ संचालक हे जिल्हा परिषदेचे आजी माजी पदाधिकारी आहेत. त्यातही शाहू आघाडीतील चार विजेत्यांपैकी तीन जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी आहेत. आता सत्तेत आलेल्या शाहू शेतकरी आघाडीचे चार शिलेदार जिल्हा परिषद गाजवणारेच आहेत. उर्वरित तीन नेत्यांच्या वारसदारांना जिल्हा परिषदेत पहिल्या प्रयत्नात हुकलेला गुलाल गोकुळने मिळवून देत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषद ही कायमच नवे नेतृत्व घडवणारी शाळा राहिली आहे. येथे सदस्य म्हणून आलेले पुढे खासदार, आमदार, मंत्री झाले. जिल्ह्याच्या, तालुक्याच्या राजकारणात स्वत:चा दबदबा तयार करत अनेक संस्थांमध्ये वर्चस्वही मिळवले. गोकुळ दूध संघ तर जिल्हा परिषद गाजवणाऱ्या आजी, माजी सदस्यांना कायमच खुणावत राहिला. त्यांचे नेटवर्कही उत्तम असल्याने नेत्यांनाही असे सदस्य सोबत असणे महत्त्वाचे ठरते. त्यातूनच यावर्षी उमेदवारी मागताना आजी माजी सदस्यांची रांगच दोन्ही आघाड्यांकडे लागली होती. त्यातून निवडकांना आणि नेत्यांच्या वारसदारांनाच संधी मिळाली. यात आजी, माजी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेल्यांपैकी ९ जणांना प्रत्यक्ष उमेदवारी मिळाली. त्यात सात जणांना यश मिळाले. आता विरोधी बाकावर बसलेल्या आघाडीत निवडून आलेल्या चारपैकी तिघे संचालक हे जिल्हा परिषदेशी संबंधित आहेत. त्यातही शौमिका महाडिक, अंबरीश घाटगे हे जिल्हा परिषदेत विद्यमान सदस्य असून मागील अडीच वर्षांच्या काळात त्यांनी अध्यक्ष आणि शिक्षण सभापतीपद भूषवले आहे. बाळासाहेब खाडे दुसऱ्यांदा संचालक झाले आहेत, तत्पूर्वी ते जिल्हा परिषदेत सभापती होते. आता सत्ताधारी बनलेले एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, अंजना रेडेकर, अमरसिंह पाटील यांनी जिल्हा परिषदेत एक काळ गाजवला आहे. अमर पाटील व तायशेटे हे दोघेही शिक्षण सभापती होते. एस. आर. पाटील व रेडेकर हे सदस्य होते.

चौकट

जिल्हा परिषदेने नाकारले, गोकुळने स्वीकारले

चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील या तिघांनी चार वर्षांपूर्वी एकाचवेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती; पण नेत्यांचे वारसदार म्हणून झालेल्या अपप्रचारामुळे पराभव स्वीकारावा लागला होता; पण हेच तिघे वारसदार एकाच वेळी गोकुळचे संचालक झाले आहेत.

चौकट

समान धागा....सभापतीपदाचा

जिल्हा परिषदेची पार्श्वभूमी असलेले आणि गोकुळमध्ये संचालक झालेले अमर पाटील, बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे, अभिजीत तायशेटे यांच्यात एक समान धागा आहे. हे चौघेही जिल्हा परिषदेत अर्थ व शिक्षण सभापती होते. अर्थ सभापती या नात्याने जिल्हा परिषदेच्या आर्थिक चाव्याच त्यांच्या हातात होत्या.