शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...अन्य जिल्ह्यांतून प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

राज्य शासनाने रविवारी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत काढलेल्या अध्यादेशात केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व उत्तराखंड या राज्यांना कोरोनाचे ...

राज्य शासनाने रविवारी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत काढलेल्या अध्यादेशात केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व उत्तराखंड या राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. त्यानुसार या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना त्या आधी ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्हचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक असून हा रिपोर्ट प्रवाशांना राज्यात प्रवेश करताना किंवा रेल्वेस्थानकावर आल्यावर दाखवावा लागणार आहे. अन्य राज्यांना या निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती करताना राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांना मात्र मुक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांना आपल्या जिल्ह्यात प्रवेश करू न देण्यामुळे त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो याचा अर्थ त्यांच्यावर काहीच बंधने नकोत, असा होत नाही. या प्रकारामुळे जिल्ह्यातील गावागावांत, कोल्हापूर शहरात बिनधास्तपणे हे नागरिक फिरत आहेत. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. हे रोखायचे असेल तर गतवर्षीप्रमाणे रेड झोन किंवा अन्य जिल्ह्यांतील नागरिकांनी कोल्हापुरात प्रवेश करण्यापूर्वी किंवा आल्यानंतर तातडीने त्यांची तपासणी व अलगीकरण महत्त्वाचे आहे.

---

बाधितांमध्ये १५ टक्के रुग्ण अन्य जिल्ह्यांतील

कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून बाधितांची संख्या शेकड्यांनी वाढत असून त्यात २० टक्के प्रमाण हे अन्य जिल्ह्यांतून आलेल्या रुग्णांचे आहे. हे रुग्ण मुख्यत्वे मुंबई, पुणे, सातारा, विदर्भ, मराठवाडासारख्या बाधित जिल्ह्यातील आहेत. या नागरिकांना चाचणी न करता वाट्टेल तिथे फिरण्याची मुभा, त्यांच्यामुळे स्थानिकांना मात्र संसर्गाचा धोका, अशी स्थिती आहे.

---

कुठे गेला ‘कोल्हापूर पॅटर्न’

गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू झाला तेव्हापासून या संसर्गाशी लढण्याची जिल्हा प्रशासनाने व्यूहरचना तयार केली होती. अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची सक्तीने तपासणी करून त्यांची अलगीकरणात रवानगी केली जात होती. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी गावागावांमध्ये यंत्रणा कार्यान्वित होत्या. त्यामुळेच अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरने पहिल्या लाटेवर लवकर नियंत्रण मिळविले. येथील अनेक निर्णयांचे राज्याने अनुकरण केले; पण आता दुसरी लाट उग्र होत असताना कुठे गेला ‘कोल्हापूर पॅटर्न’, अशी म्हणायची वेळ आली आहे.

--

प्रशासनाची कोंडी

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आठवड्यापूर्वी अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या तसेच एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केल्याचा आदेश काढला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. एका गावातून दुसऱ्या गावात जातानादेखील निगेटिव्ह अहवाल असणे अतिशयोक्ती वाटत असले तरी अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्यांसाठी चाचणी बंधनकारक करून त्यांचे गतवर्षीप्रमाणे अलगीकरण केले असते तर सध्या ज्या झपाट्याने संसर्ग वाढत आहे तो वेशीवरच रोखणे शक्य झाले असते. मात्र, निर्णयांच्या पातळीवर प्रशासनाचीच कोंडी होत आहे.

--